शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
3
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
4
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
5
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
6
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
7
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
8
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
9
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
10
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
11
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
12
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
13
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
14
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
15
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
19
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
20
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
Daily Top 2Weekly Top 5

टिपेश्वर अभयारण्याचे धिंडवडे

By admin | Updated: May 27, 2015 02:22 IST

टिपेश्वर अभयारण्य हे नावालाच अभयारण्य उरले आहे. वन विभागाचे साधे जंगल टिपेश्वर अभयारण्यापेक्षा सुस्थितीत आहेत़

नरेश मानकर पांढरकवडाटिपेश्वर अभयारण्य हे नावालाच अभयारण्य उरले आहे. वन विभागाचे साधे जंगल टिपेश्वर अभयारण्यापेक्षा सुस्थितीत आहेत़ आर्थिक तरतुदीअभावी या अभयारण्याचे धिंडवडे निघत आहेत़ टिपेश्वरला अभयारण्याचा दर्जा देऊन इतिकर्तव्य संपले, अशी भूमिका घेऊन शासनाने अभयारण्याकडे पाठ फिरवली आहे़टिपेश्वर अभयारण्याकरिता शासनाने कोणतीही आर्थिक तरतूद केली नाही़ जंगलाला अभयारण्याचा दर्जा देण्यापूर्वी १० वर्षांचा व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात येतो़ त्यात दरवर्षी कोणती कामे करावयाची, याचे नियोजन करण्यात येते़ टिपेश्वरबाबत मात्र असे काहीही झाले नाही़ या अभयारण्याकरिता एक वन परीक्षेत्र अधिकारी नियुक्त करण्यात आला आहे़ मात्र अभयारण्याचा सर्व कारभार नागपूर येथील पेंच व्याघ्र प्रकल्पातून चालविला जातो़ पेंच व्याघ्र प्रकल्प असल्यामुळे शासनाचा सर्व निधी तेथेच खर्च करण्यात येतो. त्यामुळे या अभयारण्यात कोणतेही काम होत नाही़ येथील वन परीक्षेत्र अधिकाऱ्यांना प्रत्येक कामासाठी नागपूरला जावे लागते़ त्याचा प्रवास भत्ताही त्यांना वेळेवर मिळत नाही़ त्यामुळे कोणताही अधिकारी या अभयारण्यात यायला तयार नाही़ सुमारे १५ हजार हेक्टरवर पसरलेल्या या अभयारण्याच्या सुरक्षेसाठी केवळ २२ कर्मचारी कार्यरत आहेत़ त्यावर कुणाचेही नियंत्रण नाही़ अभयारण्यात सिमेंट प्लग, नाल्यावर माती बांधाचे काम झालेले नाही़ त्यामुळे उन्हाळ्यात अभयारण्यात वन्य जीवांकरीता पाणी नसते़ पाण्याच्या शोधार्थ वन्यप्राणी नागरी वस्तीत येतात आणि नागरिकांचा बळी घेतात़ नैसर्गिक साधन संपत्तीने नटलेल्या या अभयारण्यात विविध प्रकारचे दुर्मिळ वृक्ष आहेत़ वन औषधीही मोठ्या प्रमाणात आहेत़ जवळपास सात ते आठ पट्टेदार वाघांसह बिबट, रोही, रानगायी, कोल्हे, सारस, मोर, लांडोर आदी प्राणी व विविध प्रकारच्या पक्षांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे़ मात्र अलिकडच्या काळात अवैध वृक्ष तोड आणि वन्यप्राण्यांच्या शिकारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे़ गेल्या चार-पाच वर्षांत अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित धोरणामुळे या अभयारण्यातील तीन पट्टेदार वाघांचा मृत्यू झाला आहे.सुन्ना गावाजवळ एका पट्टेदार वाघाचा विद्युत तारेच्या स्पर्शाने मृत्यू झाला, तर बोथ-बहात्तर गावाजवळ शिकाऱ्याच्या फासात अडकून एक पट्टेदार वाघ मृत्युमुखी पडला़ त्यानंतर अभयारण्यातील पिलखान नर्सरीजवळ एक पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळून आला होता. त्यामुळे या प्राण्यांची सुरक्षा करण्यास पेंच व्याघ्र प्रकल्प पूर्णत: अपयशी ठरल्याचे दिसत आहे. आंध्रप्रदेशाच्या सीमेपर्यंत पसरलेल्या या अभयारण्यात वन्यप्राण्यांची मोठ्या प्रमाणात शिकार केली जात आहे़ पैनगंगा नदी कोरडी पडल्यामुळे नदीतून वन्यप्राणी व मौल्यवान वृक्षांची तस्करी होत आहे. या अभयारण्याच्या चारही बाजूला वन चौक्या असल्या, तरी त्यात किती चौकीदार नियमित उपस्थित राहतात हा संशोधनाचा विषय आहे़ गेल्या काही वर्षात या अभयारण्यातील हजारो सागवान वृक्षांची कत्तल झाल्याचे उघडकीस आले. सागवान तस्करांवर वन कर्मचाऱ्यांनी गोळीबारही केला होता.१४ बिट, २२ अधिकारी, कर्मचारी कार्यरत टिपेश्वर अभयारण्याअंतर्गत एकूण १४ बिट आहेत. एक वन परीक्षेत्राधिकारी, चार राऊंड आॅफिसर, १४ वनरक्षक, तीन स्पेशल ड्युटी गार्ड व काही रोेजंदारी कामगार कार्यान्वीत आहेत़ या अभयारण्याचा संपूर्ण कारभार नागपूरवरून चालत असल्यामुळे येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कुणाचेही नियंत्रण नाही़ वाघाचे अधिवास क्षेत्र असलेल्या या अभयारण्यातून मोठ्या प्रमाणात सागवान तस्करी होत असल्याचे उघडकीस आले असतानाही याकडे गंभीरतेने पाहिले जात नाही़त्यामुळेच अलीकडे अवैध वृक्षतोड व वन्यप्राण्यांच्या शिकारीत वाढ झाली आहे़ंसहायक वनसंरक्षकांचे कार्यालय आवश्यकवन्यजीव विभागाच्या सहायक वन संरक्षकांचे कार्यालय पांढरकवडा किंवा पाटणबोरी येथे होणे आवश्यक आहे़ तसे झाले, तर लहान-मोठ्या कामासाठी नागपूरकडे पाहात बसावे लागणार नाही़ उस्मानाबाद व बीड येथे अशी स्वतंत्र कार्यालये आहेत़ मुख्यत: अभयारण्याकररिता आर्थिक तरतूद होणे आणि तो निधी अभयारण्यातील वन्यप्राण्यांच्या सोयी उपलब्ध करून देण्यासाठी खर्च होणे आवश्यक आहे़ त्यामुळे वन्यजीवांना आपली गरज भागविण्यासाठी अभयारण्याबाहेर पडण्याची वेळ येणार नाही. मात्र १५ वर्षांपेक्षा जादा कालावधी लोटूनही शासनाने या अभयारण्याकडे दुर्लक्षच केले आहे़ परिणामी येथील वन्यप्राण्यांची शिकार होत आहे़ त्याचप्रमाणे तालुक्याच्या वैभवात भर टाकणाऱ्या टिपेश्वर अभयारण्यात मौल्यवान वृक्षांची मोठ्या प्रमाणात कत्तल होत असल्याने निसर्गाचा अनमोल खजाना असलेल्या या अभयारण्याचे सौंदर्य नष्ट होण्याच्या मार्गावर आहे़