शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

टिपेश्वर अभयारण्याचे धिंडवडे

By admin | Updated: May 27, 2015 02:22 IST

टिपेश्वर अभयारण्य हे नावालाच अभयारण्य उरले आहे. वन विभागाचे साधे जंगल टिपेश्वर अभयारण्यापेक्षा सुस्थितीत आहेत़

नरेश मानकर पांढरकवडाटिपेश्वर अभयारण्य हे नावालाच अभयारण्य उरले आहे. वन विभागाचे साधे जंगल टिपेश्वर अभयारण्यापेक्षा सुस्थितीत आहेत़ आर्थिक तरतुदीअभावी या अभयारण्याचे धिंडवडे निघत आहेत़ टिपेश्वरला अभयारण्याचा दर्जा देऊन इतिकर्तव्य संपले, अशी भूमिका घेऊन शासनाने अभयारण्याकडे पाठ फिरवली आहे़टिपेश्वर अभयारण्याकरिता शासनाने कोणतीही आर्थिक तरतूद केली नाही़ जंगलाला अभयारण्याचा दर्जा देण्यापूर्वी १० वर्षांचा व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात येतो़ त्यात दरवर्षी कोणती कामे करावयाची, याचे नियोजन करण्यात येते़ टिपेश्वरबाबत मात्र असे काहीही झाले नाही़ या अभयारण्याकरिता एक वन परीक्षेत्र अधिकारी नियुक्त करण्यात आला आहे़ मात्र अभयारण्याचा सर्व कारभार नागपूर येथील पेंच व्याघ्र प्रकल्पातून चालविला जातो़ पेंच व्याघ्र प्रकल्प असल्यामुळे शासनाचा सर्व निधी तेथेच खर्च करण्यात येतो. त्यामुळे या अभयारण्यात कोणतेही काम होत नाही़ येथील वन परीक्षेत्र अधिकाऱ्यांना प्रत्येक कामासाठी नागपूरला जावे लागते़ त्याचा प्रवास भत्ताही त्यांना वेळेवर मिळत नाही़ त्यामुळे कोणताही अधिकारी या अभयारण्यात यायला तयार नाही़ सुमारे १५ हजार हेक्टरवर पसरलेल्या या अभयारण्याच्या सुरक्षेसाठी केवळ २२ कर्मचारी कार्यरत आहेत़ त्यावर कुणाचेही नियंत्रण नाही़ अभयारण्यात सिमेंट प्लग, नाल्यावर माती बांधाचे काम झालेले नाही़ त्यामुळे उन्हाळ्यात अभयारण्यात वन्य जीवांकरीता पाणी नसते़ पाण्याच्या शोधार्थ वन्यप्राणी नागरी वस्तीत येतात आणि नागरिकांचा बळी घेतात़ नैसर्गिक साधन संपत्तीने नटलेल्या या अभयारण्यात विविध प्रकारचे दुर्मिळ वृक्ष आहेत़ वन औषधीही मोठ्या प्रमाणात आहेत़ जवळपास सात ते आठ पट्टेदार वाघांसह बिबट, रोही, रानगायी, कोल्हे, सारस, मोर, लांडोर आदी प्राणी व विविध प्रकारच्या पक्षांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे़ मात्र अलिकडच्या काळात अवैध वृक्ष तोड आणि वन्यप्राण्यांच्या शिकारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे़ गेल्या चार-पाच वर्षांत अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित धोरणामुळे या अभयारण्यातील तीन पट्टेदार वाघांचा मृत्यू झाला आहे.सुन्ना गावाजवळ एका पट्टेदार वाघाचा विद्युत तारेच्या स्पर्शाने मृत्यू झाला, तर बोथ-बहात्तर गावाजवळ शिकाऱ्याच्या फासात अडकून एक पट्टेदार वाघ मृत्युमुखी पडला़ त्यानंतर अभयारण्यातील पिलखान नर्सरीजवळ एक पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळून आला होता. त्यामुळे या प्राण्यांची सुरक्षा करण्यास पेंच व्याघ्र प्रकल्प पूर्णत: अपयशी ठरल्याचे दिसत आहे. आंध्रप्रदेशाच्या सीमेपर्यंत पसरलेल्या या अभयारण्यात वन्यप्राण्यांची मोठ्या प्रमाणात शिकार केली जात आहे़ पैनगंगा नदी कोरडी पडल्यामुळे नदीतून वन्यप्राणी व मौल्यवान वृक्षांची तस्करी होत आहे. या अभयारण्याच्या चारही बाजूला वन चौक्या असल्या, तरी त्यात किती चौकीदार नियमित उपस्थित राहतात हा संशोधनाचा विषय आहे़ गेल्या काही वर्षात या अभयारण्यातील हजारो सागवान वृक्षांची कत्तल झाल्याचे उघडकीस आले. सागवान तस्करांवर वन कर्मचाऱ्यांनी गोळीबारही केला होता.१४ बिट, २२ अधिकारी, कर्मचारी कार्यरत टिपेश्वर अभयारण्याअंतर्गत एकूण १४ बिट आहेत. एक वन परीक्षेत्राधिकारी, चार राऊंड आॅफिसर, १४ वनरक्षक, तीन स्पेशल ड्युटी गार्ड व काही रोेजंदारी कामगार कार्यान्वीत आहेत़ या अभयारण्याचा संपूर्ण कारभार नागपूरवरून चालत असल्यामुळे येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कुणाचेही नियंत्रण नाही़ वाघाचे अधिवास क्षेत्र असलेल्या या अभयारण्यातून मोठ्या प्रमाणात सागवान तस्करी होत असल्याचे उघडकीस आले असतानाही याकडे गंभीरतेने पाहिले जात नाही़त्यामुळेच अलीकडे अवैध वृक्षतोड व वन्यप्राण्यांच्या शिकारीत वाढ झाली आहे़ंसहायक वनसंरक्षकांचे कार्यालय आवश्यकवन्यजीव विभागाच्या सहायक वन संरक्षकांचे कार्यालय पांढरकवडा किंवा पाटणबोरी येथे होणे आवश्यक आहे़ तसे झाले, तर लहान-मोठ्या कामासाठी नागपूरकडे पाहात बसावे लागणार नाही़ उस्मानाबाद व बीड येथे अशी स्वतंत्र कार्यालये आहेत़ मुख्यत: अभयारण्याकररिता आर्थिक तरतूद होणे आणि तो निधी अभयारण्यातील वन्यप्राण्यांच्या सोयी उपलब्ध करून देण्यासाठी खर्च होणे आवश्यक आहे़ त्यामुळे वन्यजीवांना आपली गरज भागविण्यासाठी अभयारण्याबाहेर पडण्याची वेळ येणार नाही. मात्र १५ वर्षांपेक्षा जादा कालावधी लोटूनही शासनाने या अभयारण्याकडे दुर्लक्षच केले आहे़ परिणामी येथील वन्यप्राण्यांची शिकार होत आहे़ त्याचप्रमाणे तालुक्याच्या वैभवात भर टाकणाऱ्या टिपेश्वर अभयारण्यात मौल्यवान वृक्षांची मोठ्या प्रमाणात कत्तल होत असल्याने निसर्गाचा अनमोल खजाना असलेल्या या अभयारण्याचे सौंदर्य नष्ट होण्याच्या मार्गावर आहे़