शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

टिपेश्वर अभयारण्यात १४ वाघांचे वास्तव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 22:20 IST

तालुक्यात पर्यटनाचे एकमेव स्थळ असलेल्या टिपेश्वर अभयारण्यात हमखास व्याघ्रदर्शन होत असल्याने मागील १५ दिवसांपासून या अभयारण्यात पर्यटकांची गर्दी वाढली आहे. अत्यंत दुर्लक्षित असलेल्या या जंगलाला १९९८ मध्ये अभयारण्याचा दर्जा मिळाला.

ठळक मुद्देहमखास व्याघ्रदर्शन : गुलाबी थंडीत पर्यटकांची गर्दी वाढली

नरेश मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : तालुक्यात पर्यटनाचे एकमेव स्थळ असलेल्या टिपेश्वर अभयारण्यात हमखास व्याघ्रदर्शन होत असल्याने मागील १५ दिवसांपासून या अभयारण्यात पर्यटकांची गर्दी वाढली आहे.अत्यंत दुर्लक्षित असलेल्या या जंगलाला १९९८ मध्ये अभयारण्याचा दर्जा मिळाला. अभयारण्यात १४ पट्टेदार वाघाचे वास्तव्य असून यामध्ये एक नर वाघ, चार वाघिण आणि नऊ बछड्यांचा समावेश आहे. अभयारण्यात याशिवाय रोही, रानगायी, मोर, लांडोर, सांबर आदी विविध प्राणीसुद्धा या अभयारण्यात मोठ्या प्रमाणावर आहेत. नैैसर्गिक वनसंपत्तीने नटलेल्या व १५ हजार हेक्टरचा विस्तीर्ण परिसर असलेल्या या अभयारण्यात हमखास व्याघ्रदर्शन होत असल्याने संपूर्ण विदर्भातील पर्यटक या अभयारण्यात सफारीसाठी येत आहेत. सफारी करताना वाघासह अनेक प्राणीसुद्धा पहावयास मिळत असल्याने पर्यटक आनंदून जात आहेत. दक्षिण विदर्भात एकमेव असलेल्या या अभयारण्याला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देण्यात यावा, अशी वन्यजीवप्रेमींची मागणी आहे. यादृष्टीने सर्वस्तरातून प्रयत्नदेखील सुरू आहेत. टिपेश्वर अभयारण्यातील क्षेत्र हे वाघाच्यादृष्टीने अतिशय महत्वाचे व सुरक्षित असे क्षेत्र आहे. निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेल्या या अभयारण्यात पर्यटकांना सफारी करताना सोयीचे जावे, यासाठी अंतर्गत रस्त्यांची दुरूस्ती करण्यात आली आहे. पर्यटकांसाठी मेनगेटपासून व मादनी गेटपासून जीप्सी गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असून पर्यटक जंगल सफारीचा आनंद घेत आहेत.सफारीसाठी आॅनलाईन बुकींगची व्यवस्था करण्यात आली आहे. टिपाईदेवी मंदिर परिसर, विविध पाणवठे, पिलखान नर्सरी या भागात आतापर्यंत अनेक पर्यटकांना वाघाचे दर्शन झाले आहे. वाघांची संख्या मोठी असल्याने दिवसेंदिवस या अभयारण्यात पर्यटकांची गर्दी वाढत आहे. पर्यटकांना आणखी आवश्यक सोईसुविधांची गरज असल्याचे वन्यजीवप्रेमींना वाटते.अभयारण्य मानवी हस्तक्षेपापासून दूरटिपेश्वर अभयारण्याच्या शेजारी असलेल्या गावातील रहिवासी वाघाच्या अधिवासात हस्तक्षेप करीत नाहीत. त्यामुळे या भागात वाघ व मानवामध्ये संघर्ष होताना दिसत नाही. प रंतु अभयारण्यात वास्तव्याला असलेल्या वाघिणींचे बछडे आता मोठे झाल्यामुळे ते जंगलाबाहेर निघू शकतात. त्यामुळे सुरक्षेच्यादृष्टीने उपाययोजना करण्याची गरज असल्याचे वन्यजीवप्रेमींचे म्हणणे आहे.

टॅग्स :Tipeshwar Sancturyटिपेश्वर अभयारण्यTigerवाघ