शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

टिपेश्वर अभयारण्यात १४ वाघांचे वास्तव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 22:20 IST

तालुक्यात पर्यटनाचे एकमेव स्थळ असलेल्या टिपेश्वर अभयारण्यात हमखास व्याघ्रदर्शन होत असल्याने मागील १५ दिवसांपासून या अभयारण्यात पर्यटकांची गर्दी वाढली आहे. अत्यंत दुर्लक्षित असलेल्या या जंगलाला १९९८ मध्ये अभयारण्याचा दर्जा मिळाला.

ठळक मुद्देहमखास व्याघ्रदर्शन : गुलाबी थंडीत पर्यटकांची गर्दी वाढली

नरेश मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : तालुक्यात पर्यटनाचे एकमेव स्थळ असलेल्या टिपेश्वर अभयारण्यात हमखास व्याघ्रदर्शन होत असल्याने मागील १५ दिवसांपासून या अभयारण्यात पर्यटकांची गर्दी वाढली आहे.अत्यंत दुर्लक्षित असलेल्या या जंगलाला १९९८ मध्ये अभयारण्याचा दर्जा मिळाला. अभयारण्यात १४ पट्टेदार वाघाचे वास्तव्य असून यामध्ये एक नर वाघ, चार वाघिण आणि नऊ बछड्यांचा समावेश आहे. अभयारण्यात याशिवाय रोही, रानगायी, मोर, लांडोर, सांबर आदी विविध प्राणीसुद्धा या अभयारण्यात मोठ्या प्रमाणावर आहेत. नैैसर्गिक वनसंपत्तीने नटलेल्या व १५ हजार हेक्टरचा विस्तीर्ण परिसर असलेल्या या अभयारण्यात हमखास व्याघ्रदर्शन होत असल्याने संपूर्ण विदर्भातील पर्यटक या अभयारण्यात सफारीसाठी येत आहेत. सफारी करताना वाघासह अनेक प्राणीसुद्धा पहावयास मिळत असल्याने पर्यटक आनंदून जात आहेत. दक्षिण विदर्भात एकमेव असलेल्या या अभयारण्याला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देण्यात यावा, अशी वन्यजीवप्रेमींची मागणी आहे. यादृष्टीने सर्वस्तरातून प्रयत्नदेखील सुरू आहेत. टिपेश्वर अभयारण्यातील क्षेत्र हे वाघाच्यादृष्टीने अतिशय महत्वाचे व सुरक्षित असे क्षेत्र आहे. निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेल्या या अभयारण्यात पर्यटकांना सफारी करताना सोयीचे जावे, यासाठी अंतर्गत रस्त्यांची दुरूस्ती करण्यात आली आहे. पर्यटकांसाठी मेनगेटपासून व मादनी गेटपासून जीप्सी गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असून पर्यटक जंगल सफारीचा आनंद घेत आहेत.सफारीसाठी आॅनलाईन बुकींगची व्यवस्था करण्यात आली आहे. टिपाईदेवी मंदिर परिसर, विविध पाणवठे, पिलखान नर्सरी या भागात आतापर्यंत अनेक पर्यटकांना वाघाचे दर्शन झाले आहे. वाघांची संख्या मोठी असल्याने दिवसेंदिवस या अभयारण्यात पर्यटकांची गर्दी वाढत आहे. पर्यटकांना आणखी आवश्यक सोईसुविधांची गरज असल्याचे वन्यजीवप्रेमींना वाटते.अभयारण्य मानवी हस्तक्षेपापासून दूरटिपेश्वर अभयारण्याच्या शेजारी असलेल्या गावातील रहिवासी वाघाच्या अधिवासात हस्तक्षेप करीत नाहीत. त्यामुळे या भागात वाघ व मानवामध्ये संघर्ष होताना दिसत नाही. प रंतु अभयारण्यात वास्तव्याला असलेल्या वाघिणींचे बछडे आता मोठे झाल्यामुळे ते जंगलाबाहेर निघू शकतात. त्यामुळे सुरक्षेच्यादृष्टीने उपाययोजना करण्याची गरज असल्याचे वन्यजीवप्रेमींचे म्हणणे आहे.

टॅग्स :Tipeshwar Sancturyटिपेश्वर अभयारण्यTigerवाघ