शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

आश्रमशाळा कर्मचार्‍यांवर उपासमारीची वेळ

By admin | Updated: May 22, 2014 01:31 IST

जिल्ह्यातील ५९ विमुक्त जाती भटक्या जमाती आश्रमशाळेतील कर्मचार्‍यांना गेल्या चार महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही.

ढाणकी : जिल्ह्यातील ५९ विमुक्त जाती भटक्या जमाती आश्रमशाळेतील कर्मचार्‍यांना गेल्या चार महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. त्यामुळे या शाळातील कर्मचार्‍यांवर उपासमारीची वेळ आली आहे.

जिल्ह्यात समाजकल्याण विभागातर्फे विमुक्त जाती-भटक्या जमातीतील मुला-मुलींसाठी आश्रमशाळा चालविल्या जातात. प्राथमिक ३७ आणि माध्यमिक २२ अशा ५९ आश्रमशाळा जिल्ह्यात आहेत. या आश्रमशाळेत मुख्याध्यापक, शिक्षक, लिपिक, सेवक, स्वयंपाकी, कामठी, अधीक्षक असे शेकडो कर्मचारी कार्यरत आहेत. परंतु या कर्मचार्‍यांना फेब्रुवारी २0१४ पासून पगारच मिळालेला नाही. त्यामुळे या कर्मचार्‍यांवर आर्थिक संकट ओढवले आहे.

या आश्रमशाळांतील कर्मचार्‍याचे पगार विशेष समाज कल्याण अधिकार्‍यांकडून होतात. कर्मचार्‍यांच्या पगारासाठी ‘ग्रॅन्ट’ नसल्याने पगार झाले नाहीत. या महिन्यात पगारासाठी एक कोटी रुपये प्राप्त झाले. परंतु थकीत पगाराची रक्कम यापेक्षा कितीतरी अधिक आहे. पगारासाठी निधीची तरतूद नसल्यास ‘मायनस’ मधून पगार काढण्यात येतात. परंतु तसे करण्यास समाजकल्याण विभागाच्या संचालकांनी संमती दिली नाही. त्यामुळे आश्रमशाळातील शेकडो कर्मचार्‍यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.

आश्रमशाळातील कर्मचार्‍यांनी विविध बँका, पतसंस्थांकडून घरबांधणी, मुलांचे शिक्षण, आजारपण, लग्नकार्य इत्यादीसाठी कज्रे काढली आहेत. चार-चार महिने होत नसल्याने या कर्मचार्‍यांना व्याजाचा भूर्दंड विनाकारण सहन करावा लागत आहे. याशिवाय विम्याचे हप्ते थकीत झाल्याने एखादी अनुचित घटना घडल्यास विम्याच्या लाभापासून वंचित होण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. आश्रमशाळा कर्मचार्‍यांना अनियमित पगाराला वारंवार तोंड द्यावे लागते हे विशेष.

चार महिन्याच्या थकीत पगाराबाबत समाजकल्याण अधिकार्‍यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता ते पुण्याला असल्याचे समजले. ‘मायनस’ मधून पगार करण्याचा आदेश निघाल्याचे परंतु अद्याप यवतमाळ समाज कल्याण विभागास प्राप्त न झाल्याचे एका अधिकार्‍याने सांगितले. (वार्ताहर)