शहरं
Join us  
Trending Stories
1
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
2
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
3
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
4
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
5
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
6
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
7
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
8
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
10
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
11
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
12
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
13
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
14
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
15
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
16
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
17
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
18
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
19
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

आश्रमशाळा कर्मचार्‍यांवर उपासमारीची वेळ

By admin | Updated: May 22, 2014 01:31 IST

जिल्ह्यातील ५९ विमुक्त जाती भटक्या जमाती आश्रमशाळेतील कर्मचार्‍यांना गेल्या चार महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही.

ढाणकी : जिल्ह्यातील ५९ विमुक्त जाती भटक्या जमाती आश्रमशाळेतील कर्मचार्‍यांना गेल्या चार महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. त्यामुळे या शाळातील कर्मचार्‍यांवर उपासमारीची वेळ आली आहे.

जिल्ह्यात समाजकल्याण विभागातर्फे विमुक्त जाती-भटक्या जमातीतील मुला-मुलींसाठी आश्रमशाळा चालविल्या जातात. प्राथमिक ३७ आणि माध्यमिक २२ अशा ५९ आश्रमशाळा जिल्ह्यात आहेत. या आश्रमशाळेत मुख्याध्यापक, शिक्षक, लिपिक, सेवक, स्वयंपाकी, कामठी, अधीक्षक असे शेकडो कर्मचारी कार्यरत आहेत. परंतु या कर्मचार्‍यांना फेब्रुवारी २0१४ पासून पगारच मिळालेला नाही. त्यामुळे या कर्मचार्‍यांवर आर्थिक संकट ओढवले आहे.

या आश्रमशाळांतील कर्मचार्‍याचे पगार विशेष समाज कल्याण अधिकार्‍यांकडून होतात. कर्मचार्‍यांच्या पगारासाठी ‘ग्रॅन्ट’ नसल्याने पगार झाले नाहीत. या महिन्यात पगारासाठी एक कोटी रुपये प्राप्त झाले. परंतु थकीत पगाराची रक्कम यापेक्षा कितीतरी अधिक आहे. पगारासाठी निधीची तरतूद नसल्यास ‘मायनस’ मधून पगार काढण्यात येतात. परंतु तसे करण्यास समाजकल्याण विभागाच्या संचालकांनी संमती दिली नाही. त्यामुळे आश्रमशाळातील शेकडो कर्मचार्‍यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.

आश्रमशाळातील कर्मचार्‍यांनी विविध बँका, पतसंस्थांकडून घरबांधणी, मुलांचे शिक्षण, आजारपण, लग्नकार्य इत्यादीसाठी कज्रे काढली आहेत. चार-चार महिने होत नसल्याने या कर्मचार्‍यांना व्याजाचा भूर्दंड विनाकारण सहन करावा लागत आहे. याशिवाय विम्याचे हप्ते थकीत झाल्याने एखादी अनुचित घटना घडल्यास विम्याच्या लाभापासून वंचित होण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. आश्रमशाळा कर्मचार्‍यांना अनियमित पगाराला वारंवार तोंड द्यावे लागते हे विशेष.

चार महिन्याच्या थकीत पगाराबाबत समाजकल्याण अधिकार्‍यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता ते पुण्याला असल्याचे समजले. ‘मायनस’ मधून पगार करण्याचा आदेश निघाल्याचे परंतु अद्याप यवतमाळ समाज कल्याण विभागास प्राप्त न झाल्याचे एका अधिकार्‍याने सांगितले. (वार्ताहर)