शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांवर सुपीक माती विकण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2018 23:48 IST

आस्मानी आणि सुलतानी संकटाने शेतकरी पुर्ता मेटाकुटीस आला आहे. आता विकायलाही काही नसल्याने अनेक शेतकरी आपल्या शेतातील सुपीक माती विटभट्टी चालकांना विकत असल्याचे महागाव तालुक्यातील बिजोरा परिसरात दिसत आहे.

ठळक मुद्दे दुष्काळाच्या झळा : विटभट्टी चालकांकडून मातीला मागणी

सदानंद लाहेवार ।लोकमत न्यूज नेटवर्कबिजोरा : आस्मानी आणि सुलतानी संकटाने शेतकरी पुर्ता मेटाकुटीस आला आहे. आता विकायलाही काही नसल्याने अनेक शेतकरी आपल्या शेतातील सुपीक माती विटभट्टी चालकांना विकत असल्याचे महागाव तालुक्यातील बिजोरा परिसरात दिसत आहे. शेतकऱ्यांच्या अडचणीचा फायदा घेत अनेक विटभट्टीचालक कमी दराने माती खरेदी करीत आहे.महागाव तालुक्यावर गत पाच वर्षापासून दुष्काळाचे सावट आहे. कधी अतिवृष्टीमुळे तर कधी अपूूऱ्या पावसाने शेती उद्धस्त होत आहे. दुसरीकडे कर्जाचा डोंगर वाढत आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत मुलांच्या शिक्षणासाठी अनेक घर खर्चासाठी अनेक शेतकºयांनी आपल्याकडील दागदागिणे विकले आहे. अनेक शेतकऱ्यांजवळ आता विकायलाही काहीच शिल्लक नाही. अशा परिस्थितीत काळ्या आईची सेवा करणाºया शेतकºयावर शेतातील माती विकण्याची वेळ आली आहे. महागाव तालुक्यातील बिजोरा परिसरातील अनेक शेतकरी विट भट्टीचालकांना माती विकत आहे. शेतकऱ्यांच्या या गरजेचा फायदा घेत अनेक माती वाहतूक करणारे ठेकेदार तयार झाले आहे. शेतकऱ्यांकडून कमी किंमतीत माती विकत घेऊन विट्टभट्टी चालकांना ज्यादा दरात विकली जात आहे. हा प्रकार सर्रास सुरु असून नाईलाजाने माती विकावी लागत आहे.शेतात निर्जीव माती शिल्लकआर्थिक विपन्नावस्थेमुळे शेतकरी आपल्या शेतातील माती विकत आहे. विटभट्टी चालक शेतातील सुपिक मातीचा वरचा थर घेऊन जात आहे. त्यामुळे निर्जिव माती शेतात शिल्लक राहते. या मातीत कोणतेही अन्नद्रव्य राहात नसल्याने पीक येण्याची सुतराम शक्यता नसते. त्यामुळे शेतकऱ्यांना आगामी काळात मोठ्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे.