शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
5
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
6
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
7
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
8
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
9
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
10
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
11
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
12
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
13
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
14
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
15
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
16
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
17
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
18
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
19
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
20
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले

सातत्यपूर्ण मूल्यमापनाचेच ‘मूल्यमापन’ करण्याची वेळ

By admin | Updated: November 22, 2014 23:09 IST

मोठा गाजावाजा करत राज्यभर सर्वंकष सातत्यपूर्ण मूल्यमापन पद्धतीची अंमलबजावणी करण्यात आली. प्राथमिक शिक्षणात अमूलाग्र क्रांती झाली. परीक्षेच्या जोखडामधून अडकलेल्या शिक्षण व्यवस्थेने

चंद्रकांत ठेंगे - पुसद मोठा गाजावाजा करत राज्यभर सर्वंकष सातत्यपूर्ण मूल्यमापन पद्धतीची अंमलबजावणी करण्यात आली. प्राथमिक शिक्षणात अमूलाग्र क्रांती झाली. परीक्षेच्या जोखडामधून अडकलेल्या शिक्षण व्यवस्थेने मोकळा श्वास घेतला. परंतु सद्यस्थितीत अनुधावन कार्यक्रमाचा पत्ताच नाही. त्यामुळे सातत्यपूर्ण मूल्यमापन पद्धतीचा श्वास गुदमरत असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे.अंमलबजावणीनंतर कोणतीही योजना यशस्वी आहे किंवा नाही याकरिता अनुधावन कार्यक्रम राबविला जातो. परंतु त्यादृष्टीने शिक्षण विभागाची हालचाल नसल्याचे दिसून येते. परीक्षा नाही, आठवीपर्यंत कुणी नापास नाही, त्यामुळे अभ्यास करण्याची आवश्यकताच नसल्याचे चित्र निर्माण झाले. त्यामुळे सरकारी व अनुदानित शाळांच्या पालकांमध्ये या पद्धतीबद्दल अविश्वासाचे वातावरण तयार झाले आहे. अद्याप काही शिक्षकांनाही ही योजना पूर्णपणे समजल्याची शास्वती देता येणार नाही. त्यामुळे प्राथमिक शिक्षणाच्या नावाने बोंब मारण्याची वेळ आली आहे.कोणताही शिक्षण प्रयोग दीर्घकालीन असतो. परंतु ताबडतोब रिझल्टच्या जमान्यात संयमित मानसिकता पालकांकडे उरलेली नाही. त्यामुळे खासगी शाळा आणि इंग्रजी शाळांकडे मुलांचा ओढा वाढला आहे. सरकारी शाळा ओस पडत असल्याचे मुख्य कारण हेच आहे. सरकारी शाळा सोडल्या तर खासगी आणि इंग्रजी शाळांमध्ये सर्रास घटक चाचण्या, सत्र परीक्षा घेतल्या जात आहे. दुसरीकडे शिक्षक कृत्रित नोंदी घेण्यातच व्यस्त आहे तर विद्यार्थी मात्र मस्त आहे. परिणामी पालक चिंताग्रस्त असल्याचे चित्र सर्वत्र आहे.कोणत्याही योजनेच्या यशस्वीतेसाठी प्रशासनावर मोठी भिस्त असते. परंतु शिक्षक, केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी, शिक्षणाधिकारी यांचे गुणवत्ता वाढीकडे लक्ष असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर पद्धतीबाबत पुनर्विचार करावा, याबाबत आग्रही मागणी समोर येत आहे. मात्र याकडे शिक्षण तज्ज्ञांचे लक्ष दिसत नाही. केवळ आदेश आहे ना, मग तेवढेच करा, असा सूर असतो.