शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
2
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
3
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
4
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
5
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
6
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
7
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
8
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
9
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
10
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
11
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
12
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
13
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
14
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
15
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
16
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
17
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
18
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
19
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
Daily Top 2Weekly Top 5

सातत्यपूर्ण मूल्यमापनाचेच ‘मूल्यमापन’ करण्याची वेळ

By admin | Updated: November 22, 2014 23:09 IST

मोठा गाजावाजा करत राज्यभर सर्वंकष सातत्यपूर्ण मूल्यमापन पद्धतीची अंमलबजावणी करण्यात आली. प्राथमिक शिक्षणात अमूलाग्र क्रांती झाली. परीक्षेच्या जोखडामधून अडकलेल्या शिक्षण व्यवस्थेने

चंद्रकांत ठेंगे - पुसद मोठा गाजावाजा करत राज्यभर सर्वंकष सातत्यपूर्ण मूल्यमापन पद्धतीची अंमलबजावणी करण्यात आली. प्राथमिक शिक्षणात अमूलाग्र क्रांती झाली. परीक्षेच्या जोखडामधून अडकलेल्या शिक्षण व्यवस्थेने मोकळा श्वास घेतला. परंतु सद्यस्थितीत अनुधावन कार्यक्रमाचा पत्ताच नाही. त्यामुळे सातत्यपूर्ण मूल्यमापन पद्धतीचा श्वास गुदमरत असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे.अंमलबजावणीनंतर कोणतीही योजना यशस्वी आहे किंवा नाही याकरिता अनुधावन कार्यक्रम राबविला जातो. परंतु त्यादृष्टीने शिक्षण विभागाची हालचाल नसल्याचे दिसून येते. परीक्षा नाही, आठवीपर्यंत कुणी नापास नाही, त्यामुळे अभ्यास करण्याची आवश्यकताच नसल्याचे चित्र निर्माण झाले. त्यामुळे सरकारी व अनुदानित शाळांच्या पालकांमध्ये या पद्धतीबद्दल अविश्वासाचे वातावरण तयार झाले आहे. अद्याप काही शिक्षकांनाही ही योजना पूर्णपणे समजल्याची शास्वती देता येणार नाही. त्यामुळे प्राथमिक शिक्षणाच्या नावाने बोंब मारण्याची वेळ आली आहे.कोणताही शिक्षण प्रयोग दीर्घकालीन असतो. परंतु ताबडतोब रिझल्टच्या जमान्यात संयमित मानसिकता पालकांकडे उरलेली नाही. त्यामुळे खासगी शाळा आणि इंग्रजी शाळांकडे मुलांचा ओढा वाढला आहे. सरकारी शाळा ओस पडत असल्याचे मुख्य कारण हेच आहे. सरकारी शाळा सोडल्या तर खासगी आणि इंग्रजी शाळांमध्ये सर्रास घटक चाचण्या, सत्र परीक्षा घेतल्या जात आहे. दुसरीकडे शिक्षक कृत्रित नोंदी घेण्यातच व्यस्त आहे तर विद्यार्थी मात्र मस्त आहे. परिणामी पालक चिंताग्रस्त असल्याचे चित्र सर्वत्र आहे.कोणत्याही योजनेच्या यशस्वीतेसाठी प्रशासनावर मोठी भिस्त असते. परंतु शिक्षक, केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी, शिक्षणाधिकारी यांचे गुणवत्ता वाढीकडे लक्ष असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर पद्धतीबाबत पुनर्विचार करावा, याबाबत आग्रही मागणी समोर येत आहे. मात्र याकडे शिक्षण तज्ज्ञांचे लक्ष दिसत नाही. केवळ आदेश आहे ना, मग तेवढेच करा, असा सूर असतो.