शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
3
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
4
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
5
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
6
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
7
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
8
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
9
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
10
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
11
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
12
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
13
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
14
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
15
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
16
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
17
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
18
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
19
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
20
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
Daily Top 2Weekly Top 5

वणी, झरी तालुक्यात वाघाची दहशत

By admin | Updated: February 12, 2015 01:52 IST

झरीजामणी तालुक्यातील चिचघाट, पवनार, अडकोली, खडकडोह व वणी तालुक्यातील बोपापूर, गोडगाव, घोन्सा, बोर्डा, मोहोर्ली परिसरात वाघाची दहशत निर्माण झाली आहे़ ..

वणी : झरीजामणी तालुक्यातील चिचघाट, पवनार, अडकोली, खडकडोह व वणी तालुक्यातील बोपापूर, गोडगाव, घोन्सा, बोर्डा, मोहोर्ली परिसरात वाघाची दहशत निर्माण झाली आहे़ गेल्या महिन्यात गोडगाव-इजासन येथील एका वृध्देला वाघाने ठार केल्याने शेतकरी व मजुरांमध्ये अद्याप धास्तीचे वातावरण दिसून येत आहे.या दोनही तालुक्यात घनदाट वनसंपदा आहे. जंगली परिसर मोठा आहे. या जंगलात वाघाचे वास्तव्य आहे. काल सोमवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास झरी-घोन्सा-पाटणच्या बस चालकाला घोन्सानजीक पुलावर या वाघाचे दर्शन घडले. त्यावेळी बसमधील प्रवाशांनीही वाघाला बघण्यासाठी धडपड चालविली होती. गेल्या दोन दिवसांपूर्वीच तालुक्यातील घोन्सा परिसरात सायंकाळच्या सुमारास महिला शेतमजुरांना या वाघाचे दर्शन झाले. त्यामुळे शेतकरी व शेतमजुरांमध्ये पुन्हा एकदा वाघाची प्रचंड दहशत निर्माण झाली आहे़गेल्या दीड वर्षांपूर्वी वणी तालुक्यातील बोपापूर येथील संजय जंगले या युवकाला वाघाने ठार केले होते. त्यानंतर वाघाला लवकरच जेरबंद करण्याचे आश्वासन वन विभागाने दिले होते़ मात्र वन विभागाला अद्यापही वाघ गवसला नाही़ गेल्या महिन्यात बोपापूरलगतच असलेल्या गोडगाव शिवारात जिजाबाई दादाजी बलकी या ५८ वर्षीय महिलेला वाघाने जागीच ठार केले. त्यावेळी ग्रामस्थ व वन विभागाच्या कर्मचाऱ्यांमध्ये मोठा वाद उफाळला होता. हा वाद शमविण्यासाठी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी गावकऱ्यांना टोलवाटोलवीची उत्तरे देऊन केवळ वेळ मारून नेली. त्यामुळे वन विभागाविरूध्द ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे़ या परिसरात वाघाचे पुन्हा आगमन झाल्याने शेतमजूरही शेतात जायला घाबरत आहेत. या परिसरात दररोज कुठे तरी, कुणाला तरी वाघाचे दर्शन घडत आहे़ त्यामुळे या परिसरातील शेतकरी व मजूर वाघाच्या दहशतीत वावरत आहे़ आधीच कोरड्या दुष्काळाच्या छायेत सापडलेल्या शेतकऱ्यांना वाघानेही हैराण करून सोडले आहे. वन विभागाच्या पोकळ आश्वासनावर गावकऱ्यांनी विश्वास ठेवला होता़ मात्र वन अधिकारी, कर्मचारी आता या परिसराकडे फिरकतानाही दिसत नाही़ त्यामुळे कोरड्या दुष्काळाच्या सावटात सापडलेले शेतकरी वाघाच्या दहशतीने हादरले आहेत. शेतकरी आणि मजुरांना शेतात जावे की नाही, असा प्रश्न सतावत आहे़ याकडे लक्ष देऊन वन विभागाने वाघाला त्वरित जेरबंद करावे, अशी या परिसरातील शेतकरी, मजूर व ग्रामस्थांची मागणी आहे़ (कार्यालय प्रतिनिधी)