शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

ठार मारण्याच्या आदेशाने वाघग्रस्तांची अखेर सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 21:49 IST

डझनावर शेतकरी-शेतमजुरांची शिकार करणाऱ्या पट्टेदार वाघाला बेशुद्ध करा व शक्य नसेल तर जीवे ठार मारा, असे आदेश नुकतेच नागपूर वन मुख्यालयातून जारी करण्यात आले होते. त्यावर आता उच्च न्यायालयानेही मोहर उमटविल्याने पांढरकवडा, राळेगाव, कळंब तालुक्यातील हजारो वाघग्रस्तांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

ठळक मुद्देवनखात्याला बळ : पांढरकवडा, राळेगाव, कळंबला दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : डझनावर शेतकरी-शेतमजुरांची शिकार करणाऱ्या पट्टेदार वाघाला बेशुद्ध करा व शक्य नसेल तर जीवे ठार मारा, असे आदेश नुकतेच नागपूर वन मुख्यालयातून जारी करण्यात आले होते. त्यावर आता उच्च न्यायालयानेही मोहर उमटविल्याने पांढरकवडा, राळेगाव, कळंब तालुक्यातील हजारो वाघग्रस्तांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.पट्टेदार वाघीण व तिच्या चार पिलांनी तीन तालुक्यातील नागरिकांना सळो की पळो करून सोडले आहे. आतापर्यंत या वाघाने डझनावर बळी घेतले. त्यात महिला व पुरुष शेतकरी-शेतमजुरांचा समावेश आहे. ठिकठिकाणी व्याघ्र दर्शन होत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. या भीतीपोटी सायंकाळी शेतकरी-शेतमजूर शेतात थांबत नाही. अंधारापूर्वीच घराची वाट धरतात. त्यानंतरही एकट्या-दुकट्याला गाठून वाघ शिकार साधतो आहे. पाठोपाठ शिकारी होत असल्याने नागरिक संतापले आहेत. जीव जात असतानाही वन विभाग काहीच करीत नाही म्हणून नागरिकांचा रोष आहे. वाघाला पकडावे आणि जिल्ह्याच्या हद्दीबाहेर काढावे, अशी नागरिकांची एकमुखी मागणी आहे. वन खात्याने ५० ते ६० अधिकारी-कर्मचाऱ्यांची फौज तैनात करून त्या दृष्टीने प्रयत्नही केले. मात्र अद्याप यश आले नाही. अशातच वन्यजीव विभागाच्या नागपूर येथील प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी या वाघाला बेशुद्ध करून पकडा आणि त्यात यश येत नसेल तर जीवे ठार मारा, असे आदेश नुकतेच जारी केले. त्यावर वन्यजीव प्रेमींनी नाराजी व्यक्त करीत आक्षेप नोंदविला. मात्र वन खात्याचा हा आदेश खुद्द नागपूर उच्च न्यायालयानेही गुरुवारी उचलून धरला. न्यायालयानेसुद्धा वाघ बेशुद्ध करून सापडत नसेल तर त्याला ठार मारणेच नागरिकांच्या हिताचे ठरेल, असा निर्णय दिला. न्यायालयाच्या या निर्णयाची वार्ता वाऱ्या सारखी पसरली. त्यामुळे वाघाच्या दहशतीत असलेल्या पांढरकवडा, राळेगाव, कळंब तालुक्यातील नागरिकांनी जणू सुटकेचा नि:श्वास टाकला. या आदेशाने हे नागरिक ‘रिलॅक्स’ झाले आहेत.नरभक्षक वाघिणीचा थर्मल सेन्सर ड्रोनने शोधहायटेक मोहीम : झुडपांच्या कापणीला सुरुवातलोकमत न्यूज नेटवर्कराळेगाव : दोन वर्षांपासून वनविभागाच्या पथकाला हुलकावणी देणाऱ्या नरभक्षक वाघिणीचा शोध घेण्यासाठी सेन्सर ड्रोनची मागणी करण्यात आली आहे. ३०० हेक्टर क्षेत्रात जंगलातील झुडपे कापण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. राळेगाव, पांढरकवडा, कळंब या परिसरात या वाघिणीची दहशत आहे.सातत्याने वाघिणीच्या हल्ल्यामुळे बळी जात आहेत. १४ जणांना प्राण गमवावा लागला. आता वनविभागाविरोधात प्रचंड जनक्षोभ तयार झाला आहे. वाघिणीचा बंदोबस्त करण्यासाठी शक्य ते सर्वच उपाय अवलंबिले जात आहे. यासाठी मॉनिटरिंग कमिटी स्थापन केली आहे. अमरावती येथील शीघ्र कृती दल, नवेगाव, नागजिरा, पेंच व्याघ्र प्रकल्पातील विशेष पथक, व्याघ्र संरक्षण दलातील जवानांची तुकडी या सर्वांचा या कमिटीमध्ये समावेश आहे. ६० पेक्षा अधिक कर्मचारी वाहनासह वाघिणीचा शोध घेण्यासाठी तैनात केले आहे. वाघपीडित क्षेत्रात शामाप्रसाद मुखर्जी योजना राबविली जात आहे. क्रियान्वयन व त्यास गती देण्याचे प्रयत्न वनविभाग करत आहे. जंगल पावसामुळे हिरवेकंच असून सात हजार हेक्टर क्षेत्रात २५ पेक्षा अधिक गावे या वाघिणीच्या दहशतीत आहे. विस्तीर्ण क्षेत्रामुळे मोहीम राबविताना अनेक अडचणी येत आहे.केली गाईची शिकारवाढोणाबाजार : लगतच्या आंजी येथे वाघाने गाईची शिकार केल्याचे बुधवारी उघडकीस आले. परिसरातील आंजी येथे वन विभागाच्या कंपार्टमेंट ६५३ मध्ये बुधवारी सायंकाळी ५.३० वाजता गुराखी गार्इंचा कळप घेवून घराकडे येत होता. कळपावर वाघाने हल्ला केला. यात गाय ठार झाली. काही दिवसांपूर्वीच या परिसरातील वेडसी येथे एका गुराख्याला ठार मारले होते. वाघ याच परिसरातील आठमुर्डी शिवारात एका निलगाईचा मृतदेह आढळला. या निलगाईचीही वाघानेच शिकार केल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. त्यामुळे शेतकरी, नागरिकांमध्ये दहशत आहे.पट्टेदार वाघिणीचा आधी शोध घेऊन तिला बेशुद्ध करण्याचे अखेरपर्यंत प्रयत्न केले जाणार आहेत. त्यात यश येत नसेल तरच शेवटचा पर्याय म्हणून नाईलाजाने तिला ठार मारण्यात येईल. आता उच्च न्यायालयानेही आज त्यावर शिक्कामोर्तब केले आहे.- सुनील लिमये,अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव, नागपूर)

टॅग्स :Tigerवाघforest departmentवनविभाग