शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
3
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
4
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
5
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
6
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
7
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
8
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
9
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
10
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
11
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
12
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
13
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
14
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
15
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
16
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
17
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
18
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
19
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
20
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली

वाघोबाचा आधी बैलावर हल्ला, मग रस्त्यावरच मांडले ठाण...!, वीरकुंड शिवारातील थरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2022 16:56 IST

वाघ दिसताच बैलबंडीत बसून असलेल्या सर्वांचीच भंबेरी उडाली. काही कळायच्या आत वाघाने बैलबंडीच्या मागे बांधून असलेल्या बैलावर हल्ला चढविला.

ठळक मुद्देएकाच रस्त्यावर दोन बैलबंड्या अडविल्या

वणी (यवतमाळ) : सायंकाळी पाच वाजताची वेळ... शेतातील कामे आटोपून एक शेतकरी आपल्या आई-वडिलांना बंडीत बसवून घराकडे परत येण्यासाठी निघाला. यावेळी बंडीच्या मागे एक तिसरा बैल बांधून होता. बंडी वीरकुंड शिवारात पोहोचताच एक ढाण्या वाघ अचानक झुडपातून बाहेर येऊन तो बंडीच्या चाकाजवळ खोळंबला.

वाघ दिसताच बैलबंडीत बसून असलेल्या सर्वांचीच भंबेरी उडाली. काही कळायच्या आत वाघाने बैलबंडीच्या मागे बांधून असलेल्या बैलावर हल्ला चढविला. मात्र, शेतकऱ्याने प्रसंगावधान राखून त्या वाघाला हुसकावून लावले. शेतकऱ्याचे रौद्ररूप पाहून वाघाने किंचित माघार घेतली. मात्र, तो तास दीड तास रस्त्यावरच ठाण मांडून होता. मागाहून पुन्हा आलेल्या एका बैलबंडीलादेखील वाघाने अडवून ठेवले. मंगळवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेची पंचक्रोशीत चांगलीच चर्चा आहे.

मारेगाव कोरंबी येथील सचिन नागतुरे यांचे वीरकुंड शिवारात शेत आहे. सायंकाळी शेतीचे काम आटोपल्यानंतर ते त्यांच्या आई-वडिलांसह बैलबंडीने घराकडे परत येत होते. वीरकुंड शिवारात अचानक त्यांना वाघाने दर्शन दिले. केवळ दर्शनच नाही तर हल्ल्याच्या बेतात असलेल्या या वाघाने बैलबंडीच्या मागे बांधून असलेल्या बैलावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सचिन नागतुरे यांनी मोठ्या धैर्याने उभारीचा धाक दाखवत वाघापासून बैलाचा बचाव केला.

वाघ बैलबंडीपासून २० फूट मागे सरकला. त्यानंतर त्याने त्याच रस्त्यावर ठाण मांडले. अर्ध्या तासानंतर नागपुरे यांच्या पाठोपाठ मारेगाव कोरंबी येथीलच संतोष काकडे हेदेखील त्यांच्या पत्नीसह बैलबंडीने याच मार्गे घराकडे परत येत असताना त्यांनाही या वाघाने दर्शन दिले. बैलबंडीपासून हा वाघ केवळ पाच फुटांवर बसून होता. मात्र, त्याने काही केले नाही. सावधगिरी बाळगत संतोष काकडे यांनी आपली बैलबंडी पुढे नेली आणि सुखरूप घर गाठले. या भागात सातत्याने व्याघ्रदर्शन होत असल्याने शेतीच्या कामावर परिणाम होत आहे.

मारेगाव (कोरंबी) भागात सातत्याने वाघाचा वावर

वणी-घोन्सा मार्गावर वणीपासून १० किलोमीटर अंतरावर असलेल्या मारेगाव (कोरंबी) शेतशिवारात गेल्या काही महिन्यांपासून वेगवेगळ्या भागात वाघाचा वावर आहे. त्यामुळे या परिसरातील गावकरी कायम दहशतीच्या वातावरणात जगत आहेत. एखाद्या भागात वाघ दिसला तर आठवडाभर शेतीची कामे खोळंबतात. त्यामुळे शेतकरी वैतागले आहेत. वाघाचा बंदोबस्त करण्यात यावा, या मागणीसाठी मारेगाव येथील सरपंचांनी वनविभागाला निवेदन दिले होते. मात्र, वनविभागाने वाघाच्या बंदोबस्तासाठी कोणत्याही उपाययोजना केल्या नाही.

टॅग्स :TigerवाघYavatmalयवतमाळenvironmentपर्यावरण