शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
3
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
4
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
5
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
6
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
7
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
8
Travel : मन मोहून टाकतील असे भारतातील 'हिडन' हिल स्टेशन्स; ९०% लोकांना या जागांबद्दल माहितीच नाही!
9
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
10
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
11
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
12
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
13
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
14
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
15
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
16
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...
17
Smartphones: २४ जीबी रॅम, ७५०० mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; जबरदस्त फोन लॉन्च!
18
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
19
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
20
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!

टिपेश्वर अभयारण्यात वाघ वाढले

By admin | Updated: March 21, 2017 00:09 IST

टिपेश्वर अभयारण्य हे वाघाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे संरक्षित क्षेत्र आहे. अभयारण्यात सद्यस्थितीत असलेल्या वाघांची संख्या पाहता ...

सुरक्षेच्या उपाययोजनाच नाही : व्याघ्र प्रकल्प घोषित होण्याची प्रतीक्षा नरेश मानकर पांढरकवडाटिपेश्वर अभयारण्य हे वाघाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे संरक्षित क्षेत्र आहे. अभयारण्यात सद्यस्थितीत असलेल्या वाघांची संख्या पाहता विदर्भातील पेंच, ताडोबा, मेळघाट व्याघ्र प्रकल्पाप्रमाणेच टिपेश्वर अभयारण्यालाही व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्याची गरज निर्माण झाली आहे़ टिपेश्वरला अभयारण्याचा दर्जा देऊन इतीकर्तव्य संपले, अशी भूमिका घेऊन शासनाने अभयारण्याकडे पाठ फिरवली आहे़टिपेश्वर अभयारण्याकरिता शासनाने कोणतीही आर्थिक तरतुद केलेली नाही़ जंगलाला अभयारण्याचा दर्जा देण्यापुर्वी १० वर्षांचा व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात येतो़ त्यात दरवर्षी कोणती कामे करावयाची, याचे नियोजन करण्यात येते़ टिपेश्वरबाबत मात्र असे काहीही करण्यात आले नाही़ अभयारण्याकरिता विभागीय वन अधिकारी, वनपरिक्षेत्र अधिकारी नियुक्त करण्यात आला आहे़ परंतु अभयारण्याचा सर्व कारभार पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूर येथून चालविला जातो़ पेंच व्याघ्र प्रकल्प असल्यामुळे शासनाचा सर्व निधी तिथेच आहे़ पांढरकवडा व घाटंजी तालुक्यात येणारे हे अभयारण्य १४८.२९ चौरस किलोमीटर व्यापले आहे. परंतु एवढ्या मोठ्या अभयारण्याच्या सुरक्षेसाठी केवळ २२ कर्मचारी कार्यरत आहेत़ नैसर्गिक साधन संपत्तीने नटलेल्या या अभयारण्यात वेगवेगळ्या प्रकारचे दुर्मिळ वृक्ष आहेत़ वनऔषधीही मोठ्या प्रमाणावर आहेत़ १२ ते १४ पट्टेदार वाघांसह बिबट, रोही, रानगायी, कोल्हे, सारस, मोर, लांडोर, अस्वल, रानमांजर, नीलगाय, वानरे व इतर प्राण्यांची तसेच विविध प्रकारच्या पक्षांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे़ अनेक ठिकाणी जिवाश्म आढळतात. देशी- परदेशी स्थलांतरीत पक्षीही मोठ्या प्रमाणावर अभयारण्यात येतात. त्यामुळे पर्यटनाची फार मोठी संधीही या ठिकाणी आहे. अभयारण्यातील खास वैशिष्ट्य म्हणजे येथील पट्टेदार वाघ. आतापर्यंत अनेकांना या वाघांनी दर्शन दिले आहे. त्यामुळे पर्यटकांची संख्याही वाढली आहे. या अभयारण्याला लागूनच मोठ्या प्रमाणावर शेती आहे. अनेकदा या शेतात शिरुन वाघांनी गायी व बैलांचा पडशा पाडला आहे. अलिकडच्या गेल्या चार-पाच वर्षात अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित धोरणामुळे या अभयारण्यातील चार पट्टेदार वाघांचा मृत्यु झाला़ सुन्ना गावाजवळ एका पट्टेदार वाघाचा विद्युत तारेच्या स्पर्शाने मृत्यु झाला, तर बोथ बहात्तर या गावाजवळ शिकाऱ्याच्या फासात अडकून एक पट्टेदार वाघ मृत्युमुखी पडला़ त्यानंतर अभयारण्यातील पिलखान नर्सरीजवळ एक पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळून आला़ काही दिवसांपुर्वीच एका पट्टेदार वाघीणीच्या शिकारीचा प्रयत्न झाला होता. यामुळे या प्राण्यांची सुरक्षा करण्यास पेंच व्याघ्र प्रकल्प पुर्णत: अपयशी ठरला आहे़ आंध्रप्रदेशाच्या सिमे पर्यंत पसरलेल्या या अभयारण्यात वन्य प्राण्यांची मोठ्या प्रमाणावर शिकार केल्या जात आहे़अभयारण्याचा विकासच नाही१९७७ पासून आजपर्यंत पाहिजे त्या प्रमाणात अभयारण्याचा विकासच झाला नाही. गेल्या काही वर्षात वाघ आणि इतर प्राण्यांच्या शिकारीचे प्रमाण वाढत आहे. टिपेश्वर अभयारण्यातील वाघांच्या सुरक्षा विषयक उपाययोजना करण्याची नितांत गरज असल्याने टिपेश्वर अभयारण्य व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित होणे गरजेचे झाले आहे. पैनगंगा नदी कोरडी पडल्यामुळे नदीतून वन्य प्राण्यांची व मौल्यवान वृक्षांची तस्करी होत आहेत़ अभयारण्याच्या चारही बाजूला चौक्या असल्या तरी किती चौकीदार उपस्थित राहतात हा संशोधनाचा विषय आहे़. टिपेश्वर अभयारण्याअंतर्गत एकुन १४ बिट आहेत.