शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

वणी परिसरात वादळाचे थैमान

By admin | Updated: May 27, 2014 01:12 IST

तालुक्यात रविवारी सायंकाळी वादळाने थैमान घातले. यात एक गाय ठार झाली, तर शिंदोला, परमडोह व कोलगाव परिसरातील अनेक घरांची छप्परे उडाली. तालुक्यात रविवारी

वणी : तालुक्यात रविवारी सायंकाळी वादळाने थैमान घातले. यात एक गाय ठार झाली, तर शिंदोला, परमडोह व कोलगाव परिसरातील अनेक घरांची छप्परे उडाली. तालुक्यात रविवारी सायंकाळच्या सुमारास वादळाला सुरूवात झाली. त्यात परमोडह येथील विनोद बावणे, भाऊराव डवरे व देवराव काकडे यांच्या घरांवरील टिनांची छपरे वादळाने उडवून नेल्याने त्यांचा संसार उघड्यावर पडला आहे. सोबतच रोहिणीचा दमदार पाऊस आल्याने घरातील सामानांची झाकाझाक करण्यासाठी कुटुंबाची तारांबळ उडाली़ उडालेली टिनांची छपरे इतर घरावर जाऊन पडल्याने त्यात नजिकच्या काही घरांचे नुकसान झाले़ योगेश शंकर येलेकार यांच्या जर्सी गायीवर टिनाचे छप्पर कोसळल्याने गायीची मानच कापली गेली व २५ हजार रूपये किंमतीची गाय जागीच मृत्यूमुखी पडली़ रविवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास तालुक्यात रोहिणीचा दमदार पाऊस आला. तत्पूर्वी वादळ सुटले होते. सोसाट्याचा वारा वाहत होता. वणी शहरातही वादळाने जनजीवन विस्कळीत झाले. सोबतच विजांचा कडकडाटही सुरू होता. पावसाचे पहिलेच नक्षत्र असलेल्या रोहिणीने शहरात दमदार हजेरी लावली. जवळपास अर्धा तास पाऊस कोसळला. त्यामुळे सर्वांचीच दाणादाण उडाली होती. रात्र झाल्यामुळे रस्त्यांवरील वर्दळ रोडावली होती. मात्र रात्री घरी परतणार्‍या व्यावसायीकांना वादळ आणि पावसाचा तडाखा बसला. या वादळाची महसूल प्रशासनाला माहिती देण्यासाठी परमडोह येथील सुरेश काकडे यांनी तहसीलदार, मंडळ अधिकारी व तलाठ्यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क केला़ मात्र कुणीही त्याची दखल घेतली नसल्याचे काकडे यांनी सांगितले़ या वादळामुळे कोलगाव परिसरातही तारांबळ उडाली. वादळामुळे शिंदोला ते कैलासनगर मार्ग प्रभावीत झाला होता. रा रस्त्यावर काही झाडे पडल्याने वाहतूक ठप्प पडली होती. कोलगाव परिसरातील आठ घरांची पडझड झाली. मोहदा येथील जिल्हा परिषद शाळेवरील तीन खोल्यांचे छप्पर उडाले. त्यात जवळपास दीड लाखांचे नुकसान झाले. नवी सावंगी येथील महादेव धांडकी यांच्या घरावरील टिनपत्रे उडाली. चारगाव चौकी येथील सुनील पिदुरकर यांच्या चहाच्या टपरीवरील छप्परही उडून गेले. वणी शहरालगत लालगुडा परिसरात विद्युत तारा लोंबकळल्याने सरपंचांनी भ्रमणध्वनीवरून महावितरणला माहिती दिली. मात्र महावितरणच्या संबंधित अभियंत्यांनी त्यांनाच उद्धट उत्तर देण्यात आले. त्यामुळे महावितरणप्रती असंतोष खदखदत आहे. या वादळामुळे तालुक्यात सर्वत्र नुकसान झाले. मात्र नुकसानीचा अधिकृत आकडा अद्याप कळला नाही. तथापि किमान पाच लाखांच्यावर नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. महसूलने नुकसानीची पाहणी करून गावकर्‍यांना मदत करावी, अशी मागणी होत आहे़ (स्थानिक प्रतिनिधी)