शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
2
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
3
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
4
MS धोनीला कायदेशीर चॅलेंज! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
5
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
6
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर
7
ट्रम्प यांनी १४ देशांवर लावलं टॅरिफ, द.कोरिया-जपानलाही सोडलं नाही; पण भारत-चीनला हातही लावला नाही, कारण काय?
8
Air India विमान अपघाताचे कारण लवकरच समोर येणार; तपास पथकाने सादर केला प्राथमिक अहवाल
9
आता मागणीनुसार बदलणार ओला-उबरचे भाडे! सरकारचे नवीन नियम, आता 'या' गोष्टी बदलणार!
10
तुम्हाला माहिती नसेल... सर्वाधिक पगार कोणत्या देशातील लोकांना मिळतो, तो किती आहे?
11
“विधानसभा निवडणुकीतील दस्तावेज नष्ट करण्याचे निवडणूक आयोगाचे परिपत्रक मतचोरी केल्याचाच पुरावा”
12
लय भारी! एकही पैसा खर्च न करता इन्स्टाग्रामवर कसे वाढवायचे फॉलोअर्स? 'ही' आहे सोपी पद्धत
13
रेखा झुनझुनवालांना ₹१००० कोटींचं नुकसान; Tata Group चा हा शेअर जोरदार आपटला, कारण काय?
14
चोरांवर मोर! दरोडेखोरांनाच घातला गंडा, ७५ लाखांच्या दागिन्यांचे १ लाखच दिले, त्यानंतर घडलं असं काही...
15
एक्सपायर झाल्यानंतर 'ही' १७ औषथे कचऱ्यात टाकण्याऐवजी टॉयलेटमध्ये फ्लश करा, कारण काय?
16
"मी गौरीसोबत लग्न केलंय...", आमिर खानचा मोठा खुलासा, चाहत्यांना आश्चर्याचा धक्का
17
"माझे हात थरथरत होते, ऐश्वर्या रायच्या ब्लाउजचं हूक..."; अभिनेत्रीने सांगितला 'तो' किस्सा
18
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरु स्वामींचे दैवी शिष्यगण, आजही करतात मार्गदर्शन; सार्थक होते जीवन
19
Realme: आवाज ऐकताच फोटो एडीट करून देईल रिअलमीचा 'हा' फोन, लवकरच बाजारात करतोय एन्ट्री!
20
Gold Silver Price 8 July: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; किंमत लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहा नवे दर

दिग्रसमध्ये गुणवंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2019 22:28 IST

येथील पत्रकार व शिवसेना, युवासेना, विद्यार्थी सेना तथा महिला आघाडीतर्फे तालुक्यातील दहावी आणि बारावीतील गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी गुणवंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन त्यांना पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहित केले.

ठळक मुद्देसंजय राठोड यांची उपस्थिती : शिवसेना, युवासेना, विद्यार्थी सेनेचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : येथील पत्रकार व शिवसेना, युवासेना, विद्यार्थी सेना तथा महिला आघाडीतर्फे तालुक्यातील दहावी आणि बारावीतील गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी गुणवंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन त्यांना पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहित केले.गेल्या अनेक वर्षांपासून दहावी व बारावीतील गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा आयोजित केला जातो. यावर्षी मल्लीकार्जुन महादेव संस्थान सभागृहात कार्यक्रम झाला. ना.संजय राठोड अध्यक्षस्थानी होते. नगराध्यक्ष सदफजहा मोहम्मद जावेद, पंचायत समिती सभापती विनोद जाधव, उपसभापती केशव राठोड, सुधीर देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. शिवचरित्र व्याख्याता प्रा.नितीन बानगुडे पाटील प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.याप्रसंगी विद्यार्थ्यांसह पालकांचा भेटवस्तू व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. ३५० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थी व पालकांची ना.राठोड यांनी विचारपूस करून खूप शिका मोठे व्हा, अशी कौतुकाची थाप दिली.याप्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख राजकुमार वानखेडे, शहर प्रमुख संजय कुकडी, उपनगराध्यक्ष अजिंक्य मात्रे, आरोग्य सभापती केतन रत्नपारखी, नगरसेवक बाळू जाधव, नगरसेविका वैशाली दुधे, उत्तम ठवकर, राहुल शिंदे, दिनेश महिंद्रे, जाधव, गावंडे, अजय भोयर, रमाकांत काळे, मिलिंद मानकर, विनायक दुधे, अतुल राठोड, हनुमान रामावत, अक्षय जयस्वाल, युवा सेना शहर प्रमुख आनंद जाधव, दिनेश खाडे, ओम वºहाडे, महेश कदम, यश अवझाडे, स्वप्निल बदुकले, ललित राठोड, शुभम राठोड, महिला आघाडीच्या संजीवनी शेरे आदी उपस्थित होत्या. प्रास्ताविक अभय इंगळे, संचालन सुरेंद्रा मिश्रा व सुरेश चिरडे यांनी केले.विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करा - नितीन बानगुडेशिव व्याख्याते प्रा.नितीन बानगुडे पाटील यांनी विद्यार्थ्यांना प्रथम आयुष्याचे ध्येय निश्चित करा, असे सांगितले. ध्येय निश्चित केले की यश हमखास मिळते. मग परिस्थिती गरीब असो की श्रीमंत. यशाच्या मार्गात कोणतीही बाधा येत नाही. गुणांवरून परीक्षेतील यशापयश ठरत असले, तरी जीवनात यशस्वी होण्यासाठी निश्चित ध्येय, आत्मविश्वास आणि जगण्याचा दृष्टिकोन अत्यावश्यक आहे. नापास झालेल्यांनी आपल्या सुप्त गुणांना ओळखून त्या दिशेने प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :Sanjay Rathodसंजय राठोड