शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
3
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
4
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
5
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
6
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
7
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
8
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
9
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
10
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
11
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
12
ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य
13
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
14
ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग
15
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
16
Jasmin Jaffar: बिग बॉस फेम जास्मीन जाफरने श्रीकृष्ण मंदिरातील तलावात धुतले पाय; व्हिडीओ व्हायरल, लोक भडकले
17
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
18
Tanya Mittal : १२ वी पास आहे तान्या मित्तल; ५०० रुपयांपासून सुरू केला बिझनेस, आता कोट्यवधींची मालकीण
19
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
20
आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर मोठी सूट, किंमत पाहून ग्राहकांचा आनंद गगनात मावेना!

दिग्रसमध्ये गुणवंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2019 22:28 IST

येथील पत्रकार व शिवसेना, युवासेना, विद्यार्थी सेना तथा महिला आघाडीतर्फे तालुक्यातील दहावी आणि बारावीतील गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी गुणवंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन त्यांना पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहित केले.

ठळक मुद्देसंजय राठोड यांची उपस्थिती : शिवसेना, युवासेना, विद्यार्थी सेनेचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : येथील पत्रकार व शिवसेना, युवासेना, विद्यार्थी सेना तथा महिला आघाडीतर्फे तालुक्यातील दहावी आणि बारावीतील गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी गुणवंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन त्यांना पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहित केले.गेल्या अनेक वर्षांपासून दहावी व बारावीतील गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा आयोजित केला जातो. यावर्षी मल्लीकार्जुन महादेव संस्थान सभागृहात कार्यक्रम झाला. ना.संजय राठोड अध्यक्षस्थानी होते. नगराध्यक्ष सदफजहा मोहम्मद जावेद, पंचायत समिती सभापती विनोद जाधव, उपसभापती केशव राठोड, सुधीर देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. शिवचरित्र व्याख्याता प्रा.नितीन बानगुडे पाटील प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.याप्रसंगी विद्यार्थ्यांसह पालकांचा भेटवस्तू व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. ३५० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थी व पालकांची ना.राठोड यांनी विचारपूस करून खूप शिका मोठे व्हा, अशी कौतुकाची थाप दिली.याप्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख राजकुमार वानखेडे, शहर प्रमुख संजय कुकडी, उपनगराध्यक्ष अजिंक्य मात्रे, आरोग्य सभापती केतन रत्नपारखी, नगरसेवक बाळू जाधव, नगरसेविका वैशाली दुधे, उत्तम ठवकर, राहुल शिंदे, दिनेश महिंद्रे, जाधव, गावंडे, अजय भोयर, रमाकांत काळे, मिलिंद मानकर, विनायक दुधे, अतुल राठोड, हनुमान रामावत, अक्षय जयस्वाल, युवा सेना शहर प्रमुख आनंद जाधव, दिनेश खाडे, ओम वºहाडे, महेश कदम, यश अवझाडे, स्वप्निल बदुकले, ललित राठोड, शुभम राठोड, महिला आघाडीच्या संजीवनी शेरे आदी उपस्थित होत्या. प्रास्ताविक अभय इंगळे, संचालन सुरेंद्रा मिश्रा व सुरेश चिरडे यांनी केले.विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करा - नितीन बानगुडेशिव व्याख्याते प्रा.नितीन बानगुडे पाटील यांनी विद्यार्थ्यांना प्रथम आयुष्याचे ध्येय निश्चित करा, असे सांगितले. ध्येय निश्चित केले की यश हमखास मिळते. मग परिस्थिती गरीब असो की श्रीमंत. यशाच्या मार्गात कोणतीही बाधा येत नाही. गुणांवरून परीक्षेतील यशापयश ठरत असले, तरी जीवनात यशस्वी होण्यासाठी निश्चित ध्येय, आत्मविश्वास आणि जगण्याचा दृष्टिकोन अत्यावश्यक आहे. नापास झालेल्यांनी आपल्या सुप्त गुणांना ओळखून त्या दिशेने प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :Sanjay Rathodसंजय राठोड