शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

दिग्रसमध्ये गुणवंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2019 22:28 IST

येथील पत्रकार व शिवसेना, युवासेना, विद्यार्थी सेना तथा महिला आघाडीतर्फे तालुक्यातील दहावी आणि बारावीतील गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी गुणवंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन त्यांना पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहित केले.

ठळक मुद्देसंजय राठोड यांची उपस्थिती : शिवसेना, युवासेना, विद्यार्थी सेनेचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : येथील पत्रकार व शिवसेना, युवासेना, विद्यार्थी सेना तथा महिला आघाडीतर्फे तालुक्यातील दहावी आणि बारावीतील गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी गुणवंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन त्यांना पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहित केले.गेल्या अनेक वर्षांपासून दहावी व बारावीतील गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा आयोजित केला जातो. यावर्षी मल्लीकार्जुन महादेव संस्थान सभागृहात कार्यक्रम झाला. ना.संजय राठोड अध्यक्षस्थानी होते. नगराध्यक्ष सदफजहा मोहम्मद जावेद, पंचायत समिती सभापती विनोद जाधव, उपसभापती केशव राठोड, सुधीर देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. शिवचरित्र व्याख्याता प्रा.नितीन बानगुडे पाटील प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.याप्रसंगी विद्यार्थ्यांसह पालकांचा भेटवस्तू व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. ३५० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थी व पालकांची ना.राठोड यांनी विचारपूस करून खूप शिका मोठे व्हा, अशी कौतुकाची थाप दिली.याप्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख राजकुमार वानखेडे, शहर प्रमुख संजय कुकडी, उपनगराध्यक्ष अजिंक्य मात्रे, आरोग्य सभापती केतन रत्नपारखी, नगरसेवक बाळू जाधव, नगरसेविका वैशाली दुधे, उत्तम ठवकर, राहुल शिंदे, दिनेश महिंद्रे, जाधव, गावंडे, अजय भोयर, रमाकांत काळे, मिलिंद मानकर, विनायक दुधे, अतुल राठोड, हनुमान रामावत, अक्षय जयस्वाल, युवा सेना शहर प्रमुख आनंद जाधव, दिनेश खाडे, ओम वºहाडे, महेश कदम, यश अवझाडे, स्वप्निल बदुकले, ललित राठोड, शुभम राठोड, महिला आघाडीच्या संजीवनी शेरे आदी उपस्थित होत्या. प्रास्ताविक अभय इंगळे, संचालन सुरेंद्रा मिश्रा व सुरेश चिरडे यांनी केले.विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करा - नितीन बानगुडेशिव व्याख्याते प्रा.नितीन बानगुडे पाटील यांनी विद्यार्थ्यांना प्रथम आयुष्याचे ध्येय निश्चित करा, असे सांगितले. ध्येय निश्चित केले की यश हमखास मिळते. मग परिस्थिती गरीब असो की श्रीमंत. यशाच्या मार्गात कोणतीही बाधा येत नाही. गुणांवरून परीक्षेतील यशापयश ठरत असले, तरी जीवनात यशस्वी होण्यासाठी निश्चित ध्येय, आत्मविश्वास आणि जगण्याचा दृष्टिकोन अत्यावश्यक आहे. नापास झालेल्यांनी आपल्या सुप्त गुणांना ओळखून त्या दिशेने प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :Sanjay Rathodसंजय राठोड