शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
6
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
7
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
8
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
9
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
10
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
11
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
12
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
13
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
14
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
15
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
16
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
17
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
18
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
19
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
20
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी

जिल्ह्यात दिवसभर संततधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 22:01 IST

जिल्ह्यात सोमवारी दिवसभर सर्वदूर संततधार पाऊस बरसत होता. या पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला. तर काही ठिकाणी पुराचे पाणी शेतशिवारात आणि गावात शिरले. तर काही मार्ग ठप्प झाले होते. पुसद तालुक्यातील बान्सी येथे नाल्याच्या पुरात दोघांचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देनदी-नाल्यांंना पूर : दोघांचा वाहून गेल्याने मृत्यू तर एक बेपत्ता

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात सोमवारी दिवसभर सर्वदूर संततधार पाऊस बरसत होता. या पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला. तर काही ठिकाणी पुराचे पाणी शेतशिवारात आणि गावात शिरले. तर काही मार्ग ठप्प झाले होते. पुसद तालुक्यातील बान्सी येथे नाल्याच्या पुरात दोघांचा मृत्यू झाला.गत महिनाभरापासून जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या जिल्हावासीयांना सोमवारी पावसाने क्षणभरही उसंत न घेता अक्षरश: चिंब केले. रात्रीपासूनच पावसाच्या सरीवर सरी कोसळत होत्या. या पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला. अनेक गावांंना या पुराचा फटकाही बसला. पुसद तालुक्यातील बान्सी येथे नाल्याच्या पुरात गुड्डू अनिल आगलावे (१८) आणि विनोद लक्ष्मण शिलार (३५) वाहून गेले. त्यांचे सोमवारी सकाळी प्रेतच आढळून आले. वणी तालुक्यातील पेटूर नाल्यात वाहून गेलेल्या सुनील सुभाष भोयर या तरुणाचा अद्यापही थांगपत्ता लागला नाही.उमरखेड तालुक्यात झालेल्या पावसामुळे पैनगंगा नदी दुथडी भरुन वाहत आहे. रविवारी सुमारे तीन तास दहागाव व पळशी फाट्यावरील नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत होते. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. तसेच पोफाळी येथे वृक्ष कोसळल्याने पुसद-उमरखेड मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.वणी, झरी, मारेगाव, पांढरकवडा तालुक्यालाही पावसाने अक्षरश: झोडपून काढले. मुकुटबन ते पाटणबोरी या मुख्य मार्गावरील वाहतूक बंद होती. पिंप्रडवाडी, बहीलमपूर, राजूर, हिरापूर या गावांशी असलेला संपर्क पुरामुळे तुटला होता. अनेक घरांची पडझड झाली. यवतमाळ शहरातही दिवसभर पाऊस कोसळत होता. या पावसामुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या निळोणा धरण्याच जलपातळीत काही अंश वाढ झाली.२४ तासात २१.१२ मिमी पाऊसरविवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासात यवतमाळ जिल्ह्यात २१.१२ मिमी पावसाची नोंद झाली. सर्वाधिक पाऊस मारेगाव तालुक्यात ५६.८० टक्के नोंदविला गेला. त्या खालोखाल वणी ४१.५०, उमरखेड ४०.५७ टक्के पावसाची नोंद झाली. सर्वात कमी पाऊस दारव्हा, बाभूळगाव या तालुक्यात नोंदविला गेला.