शहरं
Join us  
Trending Stories
1
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
2
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
3
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
4
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
5
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
6
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
7
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
8
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
9
मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे १७ नोव्हेंबरपासून आंदोलन
10
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
11
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
12
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
13
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
14
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
15
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
16
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
17
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
18
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
19
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
20
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात दिवसभर संततधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 22:01 IST

जिल्ह्यात सोमवारी दिवसभर सर्वदूर संततधार पाऊस बरसत होता. या पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला. तर काही ठिकाणी पुराचे पाणी शेतशिवारात आणि गावात शिरले. तर काही मार्ग ठप्प झाले होते. पुसद तालुक्यातील बान्सी येथे नाल्याच्या पुरात दोघांचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देनदी-नाल्यांंना पूर : दोघांचा वाहून गेल्याने मृत्यू तर एक बेपत्ता

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात सोमवारी दिवसभर सर्वदूर संततधार पाऊस बरसत होता. या पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला. तर काही ठिकाणी पुराचे पाणी शेतशिवारात आणि गावात शिरले. तर काही मार्ग ठप्प झाले होते. पुसद तालुक्यातील बान्सी येथे नाल्याच्या पुरात दोघांचा मृत्यू झाला.गत महिनाभरापासून जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या जिल्हावासीयांना सोमवारी पावसाने क्षणभरही उसंत न घेता अक्षरश: चिंब केले. रात्रीपासूनच पावसाच्या सरीवर सरी कोसळत होत्या. या पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला. अनेक गावांंना या पुराचा फटकाही बसला. पुसद तालुक्यातील बान्सी येथे नाल्याच्या पुरात गुड्डू अनिल आगलावे (१८) आणि विनोद लक्ष्मण शिलार (३५) वाहून गेले. त्यांचे सोमवारी सकाळी प्रेतच आढळून आले. वणी तालुक्यातील पेटूर नाल्यात वाहून गेलेल्या सुनील सुभाष भोयर या तरुणाचा अद्यापही थांगपत्ता लागला नाही.उमरखेड तालुक्यात झालेल्या पावसामुळे पैनगंगा नदी दुथडी भरुन वाहत आहे. रविवारी सुमारे तीन तास दहागाव व पळशी फाट्यावरील नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत होते. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. तसेच पोफाळी येथे वृक्ष कोसळल्याने पुसद-उमरखेड मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.वणी, झरी, मारेगाव, पांढरकवडा तालुक्यालाही पावसाने अक्षरश: झोडपून काढले. मुकुटबन ते पाटणबोरी या मुख्य मार्गावरील वाहतूक बंद होती. पिंप्रडवाडी, बहीलमपूर, राजूर, हिरापूर या गावांशी असलेला संपर्क पुरामुळे तुटला होता. अनेक घरांची पडझड झाली. यवतमाळ शहरातही दिवसभर पाऊस कोसळत होता. या पावसामुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या निळोणा धरण्याच जलपातळीत काही अंश वाढ झाली.२४ तासात २१.१२ मिमी पाऊसरविवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासात यवतमाळ जिल्ह्यात २१.१२ मिमी पावसाची नोंद झाली. सर्वाधिक पाऊस मारेगाव तालुक्यात ५६.८० टक्के नोंदविला गेला. त्या खालोखाल वणी ४१.५०, उमरखेड ४०.५७ टक्के पावसाची नोंद झाली. सर्वात कमी पाऊस दारव्हा, बाभूळगाव या तालुक्यात नोंदविला गेला.