शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

टिपेश्वरमधील तीन वाघांनी मराठवाड्यात केली घुसखोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 05:00 IST

किनवट तालुक्यात वनविभागाने लावलेल्या कॅमेऱ्यामध्ये हे वाघ ट्रॅप झाले आहेत. एक महिन्यापूर्वीच हे वाघ टिपेश्वर अभयारण्यातून बाहेर पडले असल्याची माहिती मिळाली. यापूर्वी टी-१ सी-१ हा तीन वर्षांचा नर वाघ बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा वन्यजीव अभयारण्यात दिसून आला होता. जून २०१९ पासून पाच महिन्यांत या वाघाने दोन अभयारण्यातील एक हजार ३०० किलोमीटर अंतर पार केले होते. दोन राज्यातील सहा जिल्ह्यांतून शेकडो गावे ओलांडून टी-१ सी -१ ने हा प्रवास केला होता.

नरेश मानकरलोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : टिपेश्वर अभयारण्यातील तीन वाघ मराठवाड्यातील किनवट परिसरात पोहोचले असून जंगलात भ्रमंती करीत असल्याचे आढळून आले आहे. यापैकी खरबी भागात दोन तर किनवट नजीकच्या मांडवा भागात एक वाघ आढळून आला. अंदाजे तीन ते चार वर्षे वय असलेल्या या वाघाने पहिल्यांदाच पाळीव जनावरावर हल्ला केल्याची माहिती आहे. किनवट तालुक्यात वनविभागाने लावलेल्या कॅमेऱ्यामध्ये हे वाघ ट्रॅप झाले आहेत. एक महिन्यापूर्वीच हे वाघ टिपेश्वर अभयारण्यातून बाहेर पडले असल्याची माहिती मिळाली. यापूर्वी टी-१ सी-१ हा तीन वर्षांचा नर वाघ बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा वन्यजीव अभयारण्यात दिसून आला होता. जून २०१९ पासून पाच महिन्यांत या वाघाने दोन अभयारण्यातील एक हजार ३०० किलोमीटर अंतर पार केले होते. दोन राज्यातील सहा जिल्ह्यांतून शेकडो गावे ओलांडून टी-१ सी -१ ने हा प्रवास केला होता. त्यानंतर टी -३ सी-१ हा वाघसुद्धा औरंगाबाद जिल्ह्यातील गौताळा औट्रम घाट अभयारण्यात गेल्या मार्चमध्ये आढळून आला होता. आजही त्याचे वास्तव्य तिथेच आहे .पांढरकवडा तालुक्याचे वैभव असलेल्या टिपेश्वर अभयारण्यात वनविभागाच्या रेकॉर्डला १८ ते १९ वाघांची नोंद असली तरी प्रत्यक्षात ३० ते ३२ वाघ असल्याचे सांगितले जाते. वाघांची ही संख्या अभयारण्याच्या क्षेत्राच्या चौपट असल्याचे दिसून येते. वन्यजीव तज्ज्ञांच्या मतानुसार, अधिवासासाठी नर वाघाला किमान ८० चौरस किलोमीटर तर मादी वाघाला २० चौरस किलोमीटर क्षेत्र लागते. . टिपेश्वर अभयारण्याचे एकूण क्षेत्र १४८ चौरस किलोमीटर एवढे आहे. या ठिकाणी जास्तीत जास्त सात ते आठ वाघ संचार करू शकतात. 

व्याघ्र प्रकल्पासाठी हवी एक हजार चौरस किमी जागा   टिपेश्वर अभयारण्याला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देण्याचे प्रस्तावित असले तरी त्यासाठी किमान एक हजार चौरस किलोमीटर क्षेत्र असणे अपेक्षित आहे. हे क्षेत्र वाढविणे अथवा स्थलांतर करून वाघांची संख्या घटविणे हे पर्याय आहे. तज्ज्ञांच्या मते या अभयारण्यात दोन नर आणि पाच मादी वाघ राहू शकतात. परंतु प्रत्यक्षात वाघांची संख्या यापेक्षा कितीतरी अधिक आहे. 

वाघाच्या संख्येच्या तुलनेत अधिवास क्षेत्र कमी पडते. बछडे साधारणपणे दीड ते दोन वर्षांची झाली की, त्यांची आई त्यांना जवळ ठेवत नाही. विशेषकरून नर वाघ आपले क्षेत्र शोधण्यासाठी बाहेर पडतात.  -सुभाष पुराणिक, उपवन संरक्षक (वन्यजीव), पांढरकवडा.

टिपेश्वरमधील वाघांचा इतरत्र होणारा संचार थांबवायचा असेल, तर या अभयारण्याला टायगर प्रोजेक्टचा दर्जा देणे किंवा अभयारण्याच्या सीमा वाढविणे गरजेचे आहे; अन्यथा आसपासच्या परिसरात वाघांचा उपद्रव वाढेल           -प्रा. धर्मेंद्र तेलगोटे,  वन्यजीव अभ्यासक

 

टॅग्स :Tipeshwar Sancturyटिपेश्वर अभयारण्यTigerवाघ