शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
2
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
3
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
4
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
5
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
6
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
7
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
8
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
9
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
10
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
11
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
12
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
13
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
14
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
15
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
16
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
17
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
18
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
19
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
20
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

तीन हजार क्विंटल तूर मार्केटमध्ये पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 22:26 IST

तूर खरेदी बंद करण्यात आल्यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून तीन हजार क्विंटल तूर दारव्हा बाजार समितीच्या यार्डमध्ये पडून आहे. चार हजार २६५ शेतकरी एसएमएस प्रतीक्षेत आहे. त्यामुळे तत्काळ तूर खरेदीची मागणी आहे.

ठळक मुद्दे४२६५ शेतकरी प्रतीक्षेत : खरेदी मुदतवाढीचा आदेशच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : तूर खरेदी बंद करण्यात आल्यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून तीन हजार क्विंटल तूर दारव्हा बाजार समितीच्या यार्डमध्ये पडून आहे. चार हजार २६५ शेतकरी एसएमएस प्रतीक्षेत आहे. त्यामुळे तत्काळ तूर खरेदीची मागणी आहे.दरम्यान, तूर खरेदीला शासनाने १५ मेपर्यंत मुदतवाढ दिली. परंतु खरेदीचे आदेश बाजार समितीला मिळाले नाही. खाली पोते तेवढे पाठविण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. शासनाने नाफेडमार्फत तूर खरेदी सुरु केली. त्यासाठी शेतकºयांची आॅनलाईन नोंदणी करण्यात आली. त्यानुसार दारव्हा बाजार समितीकडे तालुक्यातील पाच हजार ८०० शेतकऱ्यांनी तूर खरेदीकरिता आॅनलाईन अर्ज केले होते. खरेदी सुरू झाल्यानंतर तारखेनुसार एक हजार ५३५ एसएमएस पाठविण्यात आले. आतापर्यंत १५ हजार क्विंटल खरेदी झाली. बाजार समितीमध्ये विक्रीकरिता तूर येणे सुरूच होते. तेवढ्यात शासनाने मध्येच खरेदी बंद केली. त्यामुळे गेल्या १५ दिवसांपासून तूर तशीच मार्केट यार्डमध्ये पडून आहे.दुसरीकडे नोंदणी करणारे चार हजार २६५ शेतकऱ्यांना एसएमएससुद्धा पोहोचले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या घरात हजारो क्ंिवटल तूर असल्याचे सांगण्यात येते. काही दिवसांपूर्वी शासनातर्फे खरेदीला मुदतवाढ देण्याची घोषणा करण्यात आली. परंतु प्रत्यक्षात खरेदीला सुरूवात झाली नाही. याबाबत कृषी उत्पन्न बाजार समितीकडे विचारणा केली असता मुदतवाढ मिळाली असली तरी खरेदी सुरु करण्यासाठी अद्याप कोणतीही सूचना दिली नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे लवकरच खरेदी सुरू होईल, अशी अपेक्ष व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांची नोंदणी पाहता एवढ्या कमी दिवसात शेतकऱ्यांची तूर मोजून कशी घ्यावी, अशी चिंता बाजार समिती, खरेदी विक्री संघाच्या कर्मचाऱ्यांना सतावत आहे, तर याहीपेक्षा वाईट अवस्था तूर उत्पादक शेतकºयांची आहे. मार्केट यार्डमध्ये खुल्या मैदानात माल पडून असल्यामुळे वातावरणाचा फटका बसेल का, चोरी जाईल का याची भीती आहे.त्याच बरोबर घरात तूर पडून असणाऱ्यांना नाफेडने खरेदी केली नाही, तर तूर विकायची कुठे, असा प्रश्न सतावत आहे. तुरीच्या खरेदीमधील गोंधळामुळे अनेकजण अडचणीत सापडले आहे.हातात पैसे केव्हा पडणारमार्चपर्यंत मोजणी झालेल्या शेतकऱ्यांचा हिशेब बाजार समितीकडून पाठविण्यात आला. मात्र मोजक्याच शेतकऱ्यांना धनादेश मिळाले आहे. आता तूर खरेदीलाच एवढा विलंब होत असताना पैसे केव्हा ुमिळेल, याची शाश्वती नाही. त्यामुळे दोन्ही बाजूने शेतकऱ्यांना फटका बसत आहे.