शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

तीन हजार क्विंटल तूर मार्केटमध्ये पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 22:26 IST

तूर खरेदी बंद करण्यात आल्यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून तीन हजार क्विंटल तूर दारव्हा बाजार समितीच्या यार्डमध्ये पडून आहे. चार हजार २६५ शेतकरी एसएमएस प्रतीक्षेत आहे. त्यामुळे तत्काळ तूर खरेदीची मागणी आहे.

ठळक मुद्दे४२६५ शेतकरी प्रतीक्षेत : खरेदी मुदतवाढीचा आदेशच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : तूर खरेदी बंद करण्यात आल्यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून तीन हजार क्विंटल तूर दारव्हा बाजार समितीच्या यार्डमध्ये पडून आहे. चार हजार २६५ शेतकरी एसएमएस प्रतीक्षेत आहे. त्यामुळे तत्काळ तूर खरेदीची मागणी आहे.दरम्यान, तूर खरेदीला शासनाने १५ मेपर्यंत मुदतवाढ दिली. परंतु खरेदीचे आदेश बाजार समितीला मिळाले नाही. खाली पोते तेवढे पाठविण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. शासनाने नाफेडमार्फत तूर खरेदी सुरु केली. त्यासाठी शेतकºयांची आॅनलाईन नोंदणी करण्यात आली. त्यानुसार दारव्हा बाजार समितीकडे तालुक्यातील पाच हजार ८०० शेतकऱ्यांनी तूर खरेदीकरिता आॅनलाईन अर्ज केले होते. खरेदी सुरू झाल्यानंतर तारखेनुसार एक हजार ५३५ एसएमएस पाठविण्यात आले. आतापर्यंत १५ हजार क्विंटल खरेदी झाली. बाजार समितीमध्ये विक्रीकरिता तूर येणे सुरूच होते. तेवढ्यात शासनाने मध्येच खरेदी बंद केली. त्यामुळे गेल्या १५ दिवसांपासून तूर तशीच मार्केट यार्डमध्ये पडून आहे.दुसरीकडे नोंदणी करणारे चार हजार २६५ शेतकऱ्यांना एसएमएससुद्धा पोहोचले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या घरात हजारो क्ंिवटल तूर असल्याचे सांगण्यात येते. काही दिवसांपूर्वी शासनातर्फे खरेदीला मुदतवाढ देण्याची घोषणा करण्यात आली. परंतु प्रत्यक्षात खरेदीला सुरूवात झाली नाही. याबाबत कृषी उत्पन्न बाजार समितीकडे विचारणा केली असता मुदतवाढ मिळाली असली तरी खरेदी सुरु करण्यासाठी अद्याप कोणतीही सूचना दिली नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे लवकरच खरेदी सुरू होईल, अशी अपेक्ष व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांची नोंदणी पाहता एवढ्या कमी दिवसात शेतकऱ्यांची तूर मोजून कशी घ्यावी, अशी चिंता बाजार समिती, खरेदी विक्री संघाच्या कर्मचाऱ्यांना सतावत आहे, तर याहीपेक्षा वाईट अवस्था तूर उत्पादक शेतकºयांची आहे. मार्केट यार्डमध्ये खुल्या मैदानात माल पडून असल्यामुळे वातावरणाचा फटका बसेल का, चोरी जाईल का याची भीती आहे.त्याच बरोबर घरात तूर पडून असणाऱ्यांना नाफेडने खरेदी केली नाही, तर तूर विकायची कुठे, असा प्रश्न सतावत आहे. तुरीच्या खरेदीमधील गोंधळामुळे अनेकजण अडचणीत सापडले आहे.हातात पैसे केव्हा पडणारमार्चपर्यंत मोजणी झालेल्या शेतकऱ्यांचा हिशेब बाजार समितीकडून पाठविण्यात आला. मात्र मोजक्याच शेतकऱ्यांना धनादेश मिळाले आहे. आता तूर खरेदीलाच एवढा विलंब होत असताना पैसे केव्हा ुमिळेल, याची शाश्वती नाही. त्यामुळे दोन्ही बाजूने शेतकऱ्यांना फटका बसत आहे.