शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

तीन हजार गारपीटग्रस्तांचे दीड कोटी रखडले

By admin | Updated: November 6, 2016 00:28 IST

गत फेब्रुवारी महिन्यात झालेल्या गारपिटीने तालुक्यातील तीन हजार शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले.

महागाव तालुका : अहवाल देण्यास तालुका प्रशासन उदासीनमहागाव : गत फेब्रुवारी महिन्यात झालेल्या गारपिटीने तालुक्यातील तीन हजार शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. शासनाने सर्वेक्षणाचे आदेश दिले. मात्र प्रशासनातील संयुक्त पाहणी अहवाल देण्यास तालुका प्रशासन उदासीन आहे. त्यामुळे तालुक्यातील गारपीटग्रस्तांचे दीड कोटी रुपयांचे अनुदान रखडले आहे.फुलसावंगी मंडळ वगळता अन्य पाच मंडळातील गारपीटग्रस्त भागाची पाहणी करून दीड कोटी रुपये मंजूर झाले. हा निधी प्राप्तही झाला. परंतु तलाठी, कृषी सहायक आणि ग्रामसेवक यांचा संयुक्त पाहणी अहवाल आल्याशिवाय अनुदान वाटप करता येत नाही. दुसरीकडे तालुका प्रशासन हा अहवाल देण्यासाठी सहकार्य करीत नाही. परिणामी तालुक्यातील शेतकऱ्यांचे दीड कोटी रुपये अडकले आहे. महिनाभरापासून सदर निधी शासनाच्या तिजोरीत पडून आहे. दरम्यान महागाव पंचायत समितीचे माजी सभापती मधुकर टेकाळे, बंडू पारवेकर व अन्य शेतकऱ्यांनी तहसील आणि कृषी विभागाशी संपर्क साधून शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी अनुदान देण्याची मागणी केली. परंतु संयुक्त समितीचा अहवाल आल्याशिवाय शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा करता येणार नाही, असे तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले. संबंधित तलाठी आणि कृषी सहायक यांना अनुदान वाटपाच्या याद्या तयार करण्यास वेळेच मिळाला नाही. शासनाकडून आलेले अनुदान दिवाळीपूर्वी मिळाले असते तर शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात गेली असती. परंतु महागाव तालुक्यातील कर्मचाऱ्यांंनी घातलेल्या खोड्यामुळे मदत मिळालीच नाही. (शहर प्रतिनिधी)