शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात विविध ठिकाणी शेतकरी महिलेसह तिघांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 10:02 IST

सततची नापिकी आणि कर्जाचा वाढता डोंगर यामुळे नैराश्य आल्याने अमरावती जिल्ह्यातील एका शेतकरी वृध्द महिलेसह वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली.

ठळक मुद्देआर्थिक विवंचना हे प्रमुख कारण

आॅनलाईन लोकमतयवतमाळ/अमरावती/वर्धा : सततची नापिकी आणि कर्जाचा वाढता डोंगर यामुळे नैराश्य आल्याने अमरावती जिल्ह्यातील एका शेतकरी वृध्द महिलेसह वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली.अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील तळणी येथील शेतकरी कुटुंबातील वृद्धेने आर्थिक विवंचनेत मंगळवार, दि. १२ रोजी राहत्या घरी ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सततची नापिकी व मुलाचे मागील काही वर्षांपासूनचे आजारपण यामुळे ८२ वर्षीय वृद्ध महिलेने हे टोकाचे पाऊल उचलले. अन्नपूर्णा माणिकराव तिडके असे तिचे नाव आहे.मुलाचे आजारपण आणि चार मुलींचे लग्न यामुळे त्यांच्यावर कर्जाचा डोंगर वाढला होता. त्यातच सततची नापिकी व सेंट्रल बँक आॅफ इंडियाचे कर्जही होते. यावर्षी सोयाबीन व भेंडीच्या उत्पादनात तोटा झाला. घराची जबाबदारी अन्नपूर्णा तिडके यांच्यावर आली होती.यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यातील दाभा (मानकर) येथे रवी सवाईराम राठोड (४० ) या शेतकऱ्याने सोमवारी रात्री विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केली. कर्जाचे हप्ते थकल्याने खाजगी कंपनी कर्ज भरण्याचा तगादा लावत होती. त्यातच नापिकी झाल्याने त्याने हा टोकाचा निर्णय घेतला. त्याच्या मागे पत्नी, दोन मुले, वृद्ध आई-वडील असा परिवार आहे.दुसऱ्या घटनेत वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील गौळ येथील सतीश लक्ष्मण मसराम (३२) या युवा शेतकऱ्याने कर्जमाफीला कंटाळून आत्महत्या केली. त्याच्याकडे तीन एकर शेती आहे. शेतीसाठी ट्रॅक्टर कर्जावर घेतला होता. शिवाय बँकेचे तथा खासगी कर्ज होते. शेतीच्या मिळकतीतून कर्जाची परतफेड होत नसल्याने त्याने आत्महत्या केल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्या