शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
2
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
3
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
4
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
5
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
6
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
7
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
8
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
9
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
10
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
11
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
12
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
13
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
14
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
15
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
16
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
17
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
18
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
19
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
20
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली

विदर्भात विविध ठिकाणी शेतकरी महिलेसह तिघांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 10:02 IST

सततची नापिकी आणि कर्जाचा वाढता डोंगर यामुळे नैराश्य आल्याने अमरावती जिल्ह्यातील एका शेतकरी वृध्द महिलेसह वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली.

ठळक मुद्देआर्थिक विवंचना हे प्रमुख कारण

आॅनलाईन लोकमतयवतमाळ/अमरावती/वर्धा : सततची नापिकी आणि कर्जाचा वाढता डोंगर यामुळे नैराश्य आल्याने अमरावती जिल्ह्यातील एका शेतकरी वृध्द महिलेसह वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली.अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील तळणी येथील शेतकरी कुटुंबातील वृद्धेने आर्थिक विवंचनेत मंगळवार, दि. १२ रोजी राहत्या घरी ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सततची नापिकी व मुलाचे मागील काही वर्षांपासूनचे आजारपण यामुळे ८२ वर्षीय वृद्ध महिलेने हे टोकाचे पाऊल उचलले. अन्नपूर्णा माणिकराव तिडके असे तिचे नाव आहे.मुलाचे आजारपण आणि चार मुलींचे लग्न यामुळे त्यांच्यावर कर्जाचा डोंगर वाढला होता. त्यातच सततची नापिकी व सेंट्रल बँक आॅफ इंडियाचे कर्जही होते. यावर्षी सोयाबीन व भेंडीच्या उत्पादनात तोटा झाला. घराची जबाबदारी अन्नपूर्णा तिडके यांच्यावर आली होती.यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यातील दाभा (मानकर) येथे रवी सवाईराम राठोड (४० ) या शेतकऱ्याने सोमवारी रात्री विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केली. कर्जाचे हप्ते थकल्याने खाजगी कंपनी कर्ज भरण्याचा तगादा लावत होती. त्यातच नापिकी झाल्याने त्याने हा टोकाचा निर्णय घेतला. त्याच्या मागे पत्नी, दोन मुले, वृद्ध आई-वडील असा परिवार आहे.दुसऱ्या घटनेत वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील गौळ येथील सतीश लक्ष्मण मसराम (३२) या युवा शेतकऱ्याने कर्जमाफीला कंटाळून आत्महत्या केली. त्याच्याकडे तीन एकर शेती आहे. शेतीसाठी ट्रॅक्टर कर्जावर घेतला होता. शिवाय बँकेचे तथा खासगी कर्ज होते. शेतीच्या मिळकतीतून कर्जाची परतफेड होत नसल्याने त्याने आत्महत्या केल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्या