शहरं
Join us  
Trending Stories
1
"४ लाख महिलांवर गँगरेप, स्वत:च्याच लोकांवर बॉम्बस्फोट.."; UN मध्ये भारताने पाकिस्तानला फटकारलं
2
काँग्रेस अन् मविआला नव्या भिडूची गरज नाही; मनसेला सोबत घेण्यास हर्षवर्धन सपकाळांचा नकार
3
‘लाडकी बहीण’चा फटका; ‘आनंदाचा शिधा’ विसरा
4
'घरी ये ना गं...', वारंवार बोलवूनही पत्नी परत येईना; विरहाने कंटाळलेल्या शेतकरी पतीने उचललं टोकाचं पाऊल!
5
PPF बनेल रिटर्न मशीन, १ रुपयाही खर्च केल्याशिवाय दरवर्षी कमवाल ₹२.८८ लाखांचं व्याज; पाहा कमाईचं सिक्रेट
6
कफ सिरप मृत्यू प्रकरणात मध्य प्रदेशात डॉक्टरला अटक; IMA आक्रमक, थेट सरकारलाच दिला इशारा!
7
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; PSU Stocks मध्ये आजही खरेदी
8
'७ विमाने पाडली होती', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा जुनाच सूर लावला; भारत आणि पाकिस्तानबद्दल काय म्हणाले?
9
९.१ कोटी नोकऱ्यांची मोठी संधी, तीन नोकऱ्यांपैकी एक नोकरी या क्षेत्रातून येणार...
10
गाढ झोपेतच काळाने घातला घाला! ४ वर्षीय चिमुकलीसह मावशीचा सर्पदंशाने मृत्यू; डॉक्टर निलंबित
11
वर्गात मित्राला कसे मारायचे? ChatGPT वर एक प्रश्न विचारला; विद्यार्थ्याला तुरुंगात जावे लागले
12
महसूल मंत्र्यांचा दुय्यम निबंधक कार्यालयातच छापा; अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये आढळले पैसे
13
संपादकीय: ...आता थेट मुकाबला ! आनंदाचा शिधा देणार नसले, तरी... 
14
दिवाळीत मोठ्या खरेदीसाठीसाठी 'क्रेडिट कार्ड'नं पैसे देणं योग्य आहे का?; 'या' गोष्टी लक्षात ठेवा
15
आजचे राशीभविष्य- ७ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस शुभ फलदायी, 'या' राशींची होणार भरभराट!
16
सरन्यायाधीशांवर वकिलाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न ; ‘सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही’ अशा घोषणा देत कोर्ट सुरू असतानाच केला हल्ला 
17
कोणत्या नगरपरिषद, नगरपंचायतीसाठी कोणते आरक्षण; सोडत निकाल वाचा एका क्लिकवर... 
18
बिहार विधानसभेचा बिगुल अखेर वाजला; दोन टप्प्यांत मतदान, तर १४ नोव्हेंबरला निकाल   
19
मुंबई महापालिकेची अंतिम प्रभागरचना मंजूर; निवडणूक प्रक्रियेला वेग, मतदार याद्यांची प्रतीक्षा 
20
२४७ नगरपरिषदांमध्ये १२५ नगराध्यक्षपदे महिलांसाठी; तर १४७ नगरपंचायतींमध्ये ७३ महिलांसाठी राखीव 

विदर्भात विविध ठिकाणी शेतकरी महिलेसह तिघांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 10:02 IST

सततची नापिकी आणि कर्जाचा वाढता डोंगर यामुळे नैराश्य आल्याने अमरावती जिल्ह्यातील एका शेतकरी वृध्द महिलेसह वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली.

ठळक मुद्देआर्थिक विवंचना हे प्रमुख कारण

आॅनलाईन लोकमतयवतमाळ/अमरावती/वर्धा : सततची नापिकी आणि कर्जाचा वाढता डोंगर यामुळे नैराश्य आल्याने अमरावती जिल्ह्यातील एका शेतकरी वृध्द महिलेसह वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली.अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील तळणी येथील शेतकरी कुटुंबातील वृद्धेने आर्थिक विवंचनेत मंगळवार, दि. १२ रोजी राहत्या घरी ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सततची नापिकी व मुलाचे मागील काही वर्षांपासूनचे आजारपण यामुळे ८२ वर्षीय वृद्ध महिलेने हे टोकाचे पाऊल उचलले. अन्नपूर्णा माणिकराव तिडके असे तिचे नाव आहे.मुलाचे आजारपण आणि चार मुलींचे लग्न यामुळे त्यांच्यावर कर्जाचा डोंगर वाढला होता. त्यातच सततची नापिकी व सेंट्रल बँक आॅफ इंडियाचे कर्जही होते. यावर्षी सोयाबीन व भेंडीच्या उत्पादनात तोटा झाला. घराची जबाबदारी अन्नपूर्णा तिडके यांच्यावर आली होती.यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यातील दाभा (मानकर) येथे रवी सवाईराम राठोड (४० ) या शेतकऱ्याने सोमवारी रात्री विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केली. कर्जाचे हप्ते थकल्याने खाजगी कंपनी कर्ज भरण्याचा तगादा लावत होती. त्यातच नापिकी झाल्याने त्याने हा टोकाचा निर्णय घेतला. त्याच्या मागे पत्नी, दोन मुले, वृद्ध आई-वडील असा परिवार आहे.दुसऱ्या घटनेत वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील गौळ येथील सतीश लक्ष्मण मसराम (३२) या युवा शेतकऱ्याने कर्जमाफीला कंटाळून आत्महत्या केली. त्याच्याकडे तीन एकर शेती आहे. शेतीसाठी ट्रॅक्टर कर्जावर घेतला होता. शिवाय बँकेचे तथा खासगी कर्ज होते. शेतीच्या मिळकतीतून कर्जाची परतफेड होत नसल्याने त्याने आत्महत्या केल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्या