शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

टिपेश्वर व्याघ्र प्रकल्पासाठी तीन प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2020 05:00 IST

टिपेश्वर अभयारण्य पूर्वी पेंच व्याघ्र प्रकल्पात समाविष्ट होते. परंतु संजय राठोड वनमंत्री झाल्यानंतर टिपेश्वरचा समावेश मेळघाट (अमरावती) व्याघ्र प्रकल्पांतर्गत करण्यात आला. वन भवनातील अधिकाऱ्यांनी टिपेश्वरला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देण्याबाबत अभ्यास करून तीन प्रस्ताव तयार केले. हे प्रस्ताव मंजुरीसाठी वन भवनात पाठविले गेले आहे. त्यावरील निर्णयाची प्रतीक्षा आहे.

ठळक मुद्देपांढरकवडा विभाग : फाईल प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयात

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पांढरकवडा वन्यजीव विभागांतर्गत टिपेश्वर अभयारण्याला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा दिला जाणार आहे. त्यासाठी वेगवेगळे तीन प्रस्ताव मेळघाट व्याघ्र प्रकल्प संचालकामार्फत नागपूरच्या प्रधान मुख्य वनसंरक्षकांकडे (वन्यजीव) पाठविण्यात आला आहे.टिपेश्वर अभयारण्यात पट्टेदार वाघांची संख्या आता दीड डझनावर ्नगेली. त्यामुळे पर्यटकांचा तिकडे ओढा वाढला आहे. टिपेश्वरमधील वाघ लगतच्या तोडाबा व तेलंगाणातील व्याघ्र प्रकल्पात संचार करतात. त्यांना टिपेश्वरचे क्षेत्र संचारासाठी कमी पडते. त्यामुळे टिपेश्वर अभयारण्याला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देण्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये वनमंत्रीपद संजय राठोड यांच्या रुपाने यवतमाळ जिल्ह्याकडे आल्यानंतर या मागणीला आणखी वेग आला. वनमंत्र्यांनीही हा विषय प्राधान्याने हाती घेतला. टिपेश्वरला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देण्यासाठी अभ्यास करण्याच्या सूचना वनभवनाला दिल्या होत्या.टिपेश्वर अभयारण्य पूर्वी पेंच व्याघ्र प्रकल्पात समाविष्ट होते. परंतु संजय राठोड वनमंत्री झाल्यानंतर टिपेश्वरचा समावेश मेळघाट (अमरावती) व्याघ्र प्रकल्पांतर्गत करण्यात आला. वन भवनातील अधिकाऱ्यांनी टिपेश्वरला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देण्याबाबत अभ्यास करून तीन प्रस्ताव तयार केले. हे प्रस्ताव मंजुरीसाठी वन भवनात पाठविले गेले आहे. त्यावरील निर्णयाची प्रतीक्षा आहे.टिपेश्वर अभयारण्याचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढवायचे झाल्यास समाविष्ट गावांचे पुनर्वसन करावे लागते, त्याला गावकऱ्यांचा विरोध होतो, त्याची प्रक्रियाही लांबलचक आहे, गावठाणांमध्ये सर्व सुविधा युक्त वसाहत निर्माण करावी लागते, प्रति कुटुंब दहा लाख मदत द्यावी लागते. या अडचणी पाहता टिपेश्वरचे क्षेत्र फार न वाढविता आहे त्या स्थितीत व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देण्यावर भर राहणार आहे. हा दर्जा मिळाल्यानंतर प्रकल्पाच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून मोठा निधी प्राप्त होतो, यावर जोर दिला जात आहे.हे आहेत तीन प्रस्तावटिपेश्वर व पैनगंगा अभयारण्य एकत्र करून व्याघ्र प्रकल्प बनविण्याचा प्रस्ताव आहे.टिपेश्वर अभयारण्य व बाहेरील चार ते पाच किलोमीटर क्षेत्रात ईको सेन्सीटीव्ह झोन व बफर झोन तयार करून व्याघ्र प्रकल्प निर्माण केला जावा. त्यात ६० गावे समाविष्ट होतात. मात्र ही गावे उठविण्याची गरज नाही.टिपेश्वर अभयारण्य आहे त्याच स्थितीत त्याला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा दिला जावा.

टॅग्स :Tipeshwar Sancturyटिपेश्वर अभयारण्यTigerवाघ