शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
4
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
5
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
6
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
7
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
8
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
9
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
10
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
11
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
12
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
13
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
14
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
15
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
16
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
17
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
18
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
19
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
20
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?

तीन दोस्तांची ‘एक्झिट’ चटका लावून गेली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 21:54 IST

एकमेकांवर जीव ओवाळून टाकणारे ते तीन मित्र... खेळण्यासाठी तिघेही चिमुरडे एकाच वेळी घराबाहेर पडतात... पण मृत्यूचा डोह जणू त्यांची प्रतीक्षा करीत असतो... पाण्याने भरलेल्या डबक्यात मासे पाहण्याचे निमित्त होते... आणि एकापाठोपाठ तिघेही पाण्यात बुडून मरण पावतात.

ठळक मुद्देशहर हळहळले : दोघांवर पांढरकवडात तर एकावर उमरखेड येथे अंत्यसंस्कार

नरेश मानकरलोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : एकमेकांवर जीव ओवाळून टाकणारे ते तीन मित्र... खेळण्यासाठी तिघेही चिमुरडे एकाच वेळी घराबाहेर पडतात... पण मृत्यूचा डोह जणू त्यांची प्रतीक्षा करीत असतो... पाण्याने भरलेल्या डबक्यात मासे पाहण्याचे निमित्त होते... आणि एकापाठोपाठ तिघेही पाण्यात बुडून मरण पावतात. काही क्षणात घडलेल्या या घटनेतून पांढरकवडावासी अद्यापही सावरले नाहीत. रविवारी पहाटे ऐन पोळ्याच्या दिवशी घडलेल्या या धक्कादायक घटनेने मृतांच्या कुटुंबीयांसह सारे शहरच हादरून गेले आहे.शहरातील श्यामनगरीत राहणारा सिद्धेश हा वांजरी येथील देवराव गेडाम आश्रमशाळेतील ज्येष्ठ शिक्षक विकास मोगरकर यांचा मुलगा. आदर्श हा आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील कर्मचारी बाळासाहेब राठोड यांचा मुलगा.तर संचेतन हा पांढरकवडातील कृषी केंद्राचे संचालक श्यामकिरण राठोड यांचा मुलगा. हे तिघेही एकमेकांचे जीवलग मित्र होते. आदर्श व संचेतन हे दोघे येथील गुरूकुल इंग्लिश मिडियम स्कूलचे पाचव्या वर्गाचे विद्यार्थी. तर सिद्धेश हा इरा इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये सहाव्या वर्गात शिकत होता. सुटीच्या दिवशी हे तिघेही ग्रीनपार्क वसाहतीजवळ असलेल्या राधेनगरी परिसरात आपापली सायकल घेऊन फिरायला यायचे. या परिसरात शासकीय कार्यालयाच्या नवीन इमारतीची कामे सुरू आहेत. समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहाचे काम पाच-सहा महिन्यांपूर्वीच झाले. बांधकाम सुरू असताना सिमेंट काँक्रीटचे मिश्रण तयार करण्यासाठी १८ ते २० फुटांचा खड्डा खोदण्यात आला होता. हाच खड्डा या तिन्ही बालकांसाठी काळ ठरला.खड्ड्यात पावसाचे पाणी आता शिगोशिग भरलेले होते. त्यातील मासे पाहत असताना सिद्धेश व आदर्श अचानक तोल जाऊन पाण्यात पडले. त्यांच्या पाठोपाठ संचेतनहीा पडला. मदतीला कुणीच नसल्याने तिघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेसाठी कारणीभूत ठरलेल्या कंत्राटदारावर गुन्हा दाखल झाला. इतरही कायदेशीर सोपस्कर पार पाडले जातील. परंतु ही बालके पुन्हा परत येतील का, हा प्रश्न सर्वांनाच छळत आहे.आई.. खेळायला जातो!सिद्धेश, आदर्श आणि संचेतन ही तिन्ही मुले रविवारी सुट्टी असल्याने सकाळीच घराबाहेर पडले. जाताना प्रत्येकाने आईला सांगितले, ‘आई.. खेळायला जातो.’ आईनेही नेहमीप्रमाणे ‘लवकर ये’ म्हटले असेलच. पण एकदा गेलेले हे तिघेही आलेच नाही. आली ती वाईट वार्ता. सिद्धेश व आदर्शवर पांढरकवड्यात तर संचेतनवर मूळ गाव दिंडाळा ता. उमरखेड येथे अंत्यसंस्कार झाले.