शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
4
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
5
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
6
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
7
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
8
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
9
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
10
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
11
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
12
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
13
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
14
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
15
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
16
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
17
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
18
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

तीन दोस्तांची ‘एक्झिट’ चटका लावून गेली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 21:54 IST

एकमेकांवर जीव ओवाळून टाकणारे ते तीन मित्र... खेळण्यासाठी तिघेही चिमुरडे एकाच वेळी घराबाहेर पडतात... पण मृत्यूचा डोह जणू त्यांची प्रतीक्षा करीत असतो... पाण्याने भरलेल्या डबक्यात मासे पाहण्याचे निमित्त होते... आणि एकापाठोपाठ तिघेही पाण्यात बुडून मरण पावतात.

ठळक मुद्देशहर हळहळले : दोघांवर पांढरकवडात तर एकावर उमरखेड येथे अंत्यसंस्कार

नरेश मानकरलोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : एकमेकांवर जीव ओवाळून टाकणारे ते तीन मित्र... खेळण्यासाठी तिघेही चिमुरडे एकाच वेळी घराबाहेर पडतात... पण मृत्यूचा डोह जणू त्यांची प्रतीक्षा करीत असतो... पाण्याने भरलेल्या डबक्यात मासे पाहण्याचे निमित्त होते... आणि एकापाठोपाठ तिघेही पाण्यात बुडून मरण पावतात. काही क्षणात घडलेल्या या घटनेतून पांढरकवडावासी अद्यापही सावरले नाहीत. रविवारी पहाटे ऐन पोळ्याच्या दिवशी घडलेल्या या धक्कादायक घटनेने मृतांच्या कुटुंबीयांसह सारे शहरच हादरून गेले आहे.शहरातील श्यामनगरीत राहणारा सिद्धेश हा वांजरी येथील देवराव गेडाम आश्रमशाळेतील ज्येष्ठ शिक्षक विकास मोगरकर यांचा मुलगा. आदर्श हा आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील कर्मचारी बाळासाहेब राठोड यांचा मुलगा.तर संचेतन हा पांढरकवडातील कृषी केंद्राचे संचालक श्यामकिरण राठोड यांचा मुलगा. हे तिघेही एकमेकांचे जीवलग मित्र होते. आदर्श व संचेतन हे दोघे येथील गुरूकुल इंग्लिश मिडियम स्कूलचे पाचव्या वर्गाचे विद्यार्थी. तर सिद्धेश हा इरा इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये सहाव्या वर्गात शिकत होता. सुटीच्या दिवशी हे तिघेही ग्रीनपार्क वसाहतीजवळ असलेल्या राधेनगरी परिसरात आपापली सायकल घेऊन फिरायला यायचे. या परिसरात शासकीय कार्यालयाच्या नवीन इमारतीची कामे सुरू आहेत. समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहाचे काम पाच-सहा महिन्यांपूर्वीच झाले. बांधकाम सुरू असताना सिमेंट काँक्रीटचे मिश्रण तयार करण्यासाठी १८ ते २० फुटांचा खड्डा खोदण्यात आला होता. हाच खड्डा या तिन्ही बालकांसाठी काळ ठरला.खड्ड्यात पावसाचे पाणी आता शिगोशिग भरलेले होते. त्यातील मासे पाहत असताना सिद्धेश व आदर्श अचानक तोल जाऊन पाण्यात पडले. त्यांच्या पाठोपाठ संचेतनहीा पडला. मदतीला कुणीच नसल्याने तिघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेसाठी कारणीभूत ठरलेल्या कंत्राटदारावर गुन्हा दाखल झाला. इतरही कायदेशीर सोपस्कर पार पाडले जातील. परंतु ही बालके पुन्हा परत येतील का, हा प्रश्न सर्वांनाच छळत आहे.आई.. खेळायला जातो!सिद्धेश, आदर्श आणि संचेतन ही तिन्ही मुले रविवारी सुट्टी असल्याने सकाळीच घराबाहेर पडले. जाताना प्रत्येकाने आईला सांगितले, ‘आई.. खेळायला जातो.’ आईनेही नेहमीप्रमाणे ‘लवकर ये’ म्हटले असेलच. पण एकदा गेलेले हे तिघेही आलेच नाही. आली ती वाईट वार्ता. सिद्धेश व आदर्शवर पांढरकवड्यात तर संचेतनवर मूळ गाव दिंडाळा ता. उमरखेड येथे अंत्यसंस्कार झाले.