शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

राष्ट्रीय पेयजलमध्ये तीन कोटींचा अपहार

By admin | Updated: January 8, 2015 23:01 IST

स्वच्छ आणि मुबलक पाणी ग्रामीण भागात उपलब्ध व्हावे यासाठी राबविण्यात आलेल्या राष्ट्रीय पेयजल योजनेलाही भ्रष्टाचाराची कीड लागली आहे. २६ गावातील अर्धवट पाणीपुरवठा

यवतमाळ : स्वच्छ आणि मुबलक पाणी ग्रामीण भागात उपलब्ध व्हावे यासाठी राबविण्यात आलेल्या राष्ट्रीय पेयजल योजनेलाही भ्रष्टाचाराची कीड लागली आहे. २६ गावातील अर्धवट पाणीपुरवठा योजना गुंडाळण्याचा निर्णय घेण्यापाठोपाठ आता या योजनेत तीन कोटी रुपयांचा अपहार झाल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. यवतमाळ जिल्ह्यात ग्रामीण पाणीपुरवठा योजना सुरळीत कार्यान्वित करण्यासाठी राष्ट्रीय पेयजल योजना राबविण्यात आली. स्वच्छ, शुद्ध आणि कायमस्वरूपी पाणीपुरवठ्यासाठी थेट केंद्र सरकारकडून आर्थिक मदत करण्यात येते. या योजनेवर नियंत्रण ठेवण्यासाठी गावातच ग्रामीण आरोग्य पाणीपुरवठा व स्वच्छता समिती निवडण्यात आली. या समितीची निवड ग्रामसभांमधून करण्यात आली. त्यानंतरही या योजनेमध्ये अपहार झाल्याचे पुढे येत आहे. अनेक वर्षांपासून रखडलेल्या नळ योजनांच्या कामांची पडताळणी करण्यात आली. त्यात हे धक्कादायक वास्तव पुढे आले. २६ गावातील अर्धवट नळ योजना गुंडाळण्याच्या निर्णयानंतर आता तीन कोटी रुपयांचा अपहार झाल्याचे पुढे येत आहे. अनेक ठिकाणी योजनेच्या कामाचा पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात निधी उचलून परस्पर खर्च करण्यात आला. अशा प्रकारे १२ गावातील योजनेच्या अपहारात दोन कोटी ८९ लाख ८८ हजार रुपये अडकले आहे. जिल्ह्यातील या १२ गावांमध्ये २००७ पासून कार्यान्वित केलेल्या नळ योजनेचे अद्यापही काम पूर्ण झाले नाही. आर्णी पंचायत समितीअंतर्गत खेड येथे २० लाख ५५ हजार तर तळणी येथे ४० लाख ८५ हजार रुपयांचा अपहार झाल्याचे पुढे आले. काही ठिकाणी काम न करताच परस्पर निधी खर्च केला. या प्रकरणात जिल्हा परिषदेने त्या गावातील पाणीपुरवठा समित्यांच्या विरोधात थेट फौजदारी तक्रारी दाखल करण्याचे आदेश दिले आहे. गटविकास अधिकाऱ्यांकडून पोलिसात तक्रार देण्यास दिरंगाई केली जात आहे. आता पुन्हा नव्याने निर्देश देण्यात आले आहे. रक्कम वसुलीसाठी थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश आहेत. (कार्यालय प्रतिनिधी)