शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय पेयजलमध्ये तीन कोटींचा अपहार

By admin | Updated: January 8, 2015 23:01 IST

स्वच्छ आणि मुबलक पाणी ग्रामीण भागात उपलब्ध व्हावे यासाठी राबविण्यात आलेल्या राष्ट्रीय पेयजल योजनेलाही भ्रष्टाचाराची कीड लागली आहे. २६ गावातील अर्धवट पाणीपुरवठा

यवतमाळ : स्वच्छ आणि मुबलक पाणी ग्रामीण भागात उपलब्ध व्हावे यासाठी राबविण्यात आलेल्या राष्ट्रीय पेयजल योजनेलाही भ्रष्टाचाराची कीड लागली आहे. २६ गावातील अर्धवट पाणीपुरवठा योजना गुंडाळण्याचा निर्णय घेण्यापाठोपाठ आता या योजनेत तीन कोटी रुपयांचा अपहार झाल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. यवतमाळ जिल्ह्यात ग्रामीण पाणीपुरवठा योजना सुरळीत कार्यान्वित करण्यासाठी राष्ट्रीय पेयजल योजना राबविण्यात आली. स्वच्छ, शुद्ध आणि कायमस्वरूपी पाणीपुरवठ्यासाठी थेट केंद्र सरकारकडून आर्थिक मदत करण्यात येते. या योजनेवर नियंत्रण ठेवण्यासाठी गावातच ग्रामीण आरोग्य पाणीपुरवठा व स्वच्छता समिती निवडण्यात आली. या समितीची निवड ग्रामसभांमधून करण्यात आली. त्यानंतरही या योजनेमध्ये अपहार झाल्याचे पुढे येत आहे. अनेक वर्षांपासून रखडलेल्या नळ योजनांच्या कामांची पडताळणी करण्यात आली. त्यात हे धक्कादायक वास्तव पुढे आले. २६ गावातील अर्धवट नळ योजना गुंडाळण्याच्या निर्णयानंतर आता तीन कोटी रुपयांचा अपहार झाल्याचे पुढे येत आहे. अनेक ठिकाणी योजनेच्या कामाचा पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात निधी उचलून परस्पर खर्च करण्यात आला. अशा प्रकारे १२ गावातील योजनेच्या अपहारात दोन कोटी ८९ लाख ८८ हजार रुपये अडकले आहे. जिल्ह्यातील या १२ गावांमध्ये २००७ पासून कार्यान्वित केलेल्या नळ योजनेचे अद्यापही काम पूर्ण झाले नाही. आर्णी पंचायत समितीअंतर्गत खेड येथे २० लाख ५५ हजार तर तळणी येथे ४० लाख ८५ हजार रुपयांचा अपहार झाल्याचे पुढे आले. काही ठिकाणी काम न करताच परस्पर निधी खर्च केला. या प्रकरणात जिल्हा परिषदेने त्या गावातील पाणीपुरवठा समित्यांच्या विरोधात थेट फौजदारी तक्रारी दाखल करण्याचे आदेश दिले आहे. गटविकास अधिकाऱ्यांकडून पोलिसात तक्रार देण्यास दिरंगाई केली जात आहे. आता पुन्हा नव्याने निर्देश देण्यात आले आहे. रक्कम वसुलीसाठी थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश आहेत. (कार्यालय प्रतिनिधी)