शहरं
Join us  
Trending Stories
1
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
2
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
3
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
4
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
5
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
6
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
7
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
8
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
9
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
10
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
11
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
12
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
13
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
14
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
15
Foldable Smartphones: सॅमसंग गॅलेक्सी ते गुगल पिक्सेलपर्यंत, यावर्षी लॉन्च झालेले प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन!
16
"त्याला वर्षभर संधी, मला २-३ मॅचनंतर बाहेर काढलं..."; शुबमन गिलला संघाबाहेर न केल्याचा संताप
17
धोक्याची घंटा! फोन वाजला, उचलला पण समोरुन आवाजच नाही आला; Silent Calls चा नवा स्कॅम
18
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
19
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
20
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचे तीन, राष्ट्रवादीचा एक नवा चेहरा

By admin | Updated: July 22, 2015 00:25 IST

जिल्हा नियोजन समितीच्या सर्वसाधारण गटासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशावरून होत असलेल्या फेर निवडणुकीत काँग्रेसने तीनही तर राष्ट्रवादीने एक नवा चेहरा देण्याचे निश्चित केले आहे.

यवतमाळ : जिल्हा नियोजन समितीच्या सर्वसाधारण गटासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशावरून होत असलेल्या फेर निवडणुकीत काँग्रेसने तीनही तर राष्ट्रवादीने एक नवा चेहरा देण्याचे निश्चित केले आहे. आठ जागांसाठी ही निवडणूक होत असून त्याकरिता १२ सदस्यांनी नामांकन दाखल केले आहे. जिल्हा परिषदेचे सर्व सदस्य या निवडणुकीत मतदाराची भूमिका बजावणार आहेत. नामांकन मागे घेण्याची ३ आॅगस्ट ही अंतिम तारीख आहे. जिल्हा परिषद सदस्य मिलींद धुर्वे यांच्या याचिकेवरून ही निवडणूक होत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने जुळवून घेत प्रत्येक तीन सदस्य वाटून घेतले आहे. शिवसेने चार उमेदवार रिंगणात उतरले आहे. भाजपचा एक उमेदवार आहे. या शिवाय अपक्ष असलेल्या मिलिंद धुर्वे यांनी मनसे सदस्य अल्का टेकाम यांच्या मदतीने नामांकन दाखल केले आहे. नियोजन समितीसाठी राष्ट्रवादीकडून केवळ एक उमेदवार बदलविण्यात आला आहे. पुर्वी असलेल्या ययाती नाईक यांच्याऐवजी प्रवीण देशमुख यांनी नामांकन दाखल केले आहे. उर्वरित राकेश नेमनवार आणि अमोल राठोड या सदस्यांचे अर्ज आहेत. काँग्रेसने मात्र तिन्ही उमेदवार बदलविले असून नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. काँग्रेसकडून बाळासाहेब मांगुळकर यांचे समर्थक सीमा देशभ्रतार, आर्णी तालुक्यातील सोनबा मंगाम आणि प्रकाश कासवार यांनी नामाकंन दाखल केले आहे. पूर्वीचे नरेंद्र ठाकरे, वसंत चंद्रे, योगेश पारवेकर यांची गच्छंती करण्यात आली आहे. शिवसेनकडून पूर्वीचे आशिष खुलसंगे, दिवाकर राठोड यांच्यासोबतच सुलोचना भोयर, प्रवीण शिंदे यांनी सुध्दा नामांकन दाखल केले आहे. भाजपनेही उषा राठोड यांचे नामांकन दाखल केले आहे. शिवसेनकडून वेळेवर उमेदवारी मागे घेण्याची शक्यता आहे. उर्वरित सदस्य रिंगणात कायम मानले जात आहे. त्यामुळे ही निवडणूक अटळ आहे. जिल्हा परिषदेतील ६२ सदस्यांना आठ उमेदवार निवडायचे आहेत. यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीने जुळून घेतल्याने शिवसेनेचा काय पवित्रा राहतो हे महत्वाचे ठरणार आहे. असे असले तरी या तिन्ही पक्षांना भाजप आणि अपक्षांना अ‍ॅडजेस केल्याशिवाय निवडणूक टाळता येणार नाही. हा पेच आता राजकीय पटलवार कसा सोडविण्यात येतो यावरच या निवडणुकीचे भवितव्य आहे. अपक्ष उमेदवार मिलींद धुर्वे यांच्यामुळेच ही निवडणूक लागली ते माघार घेणार नाही, असे त्यांनी जाहीर केले आहे. तरी ३ आॅगस्टपर्यंत काय हालचाली होता हे महत्वपूर्ण राहणार आहे. (कार्यालय प्रतिनिधी)