शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
8
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
9
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
10
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
11
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
12
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
13
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
14
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
15
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
16
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
17
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
18
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
19
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
20
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल

काँग्रेसचे तीन, राष्ट्रवादीचा एक नवा चेहरा

By admin | Updated: July 22, 2015 00:25 IST

जिल्हा नियोजन समितीच्या सर्वसाधारण गटासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशावरून होत असलेल्या फेर निवडणुकीत काँग्रेसने तीनही तर राष्ट्रवादीने एक नवा चेहरा देण्याचे निश्चित केले आहे.

यवतमाळ : जिल्हा नियोजन समितीच्या सर्वसाधारण गटासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशावरून होत असलेल्या फेर निवडणुकीत काँग्रेसने तीनही तर राष्ट्रवादीने एक नवा चेहरा देण्याचे निश्चित केले आहे. आठ जागांसाठी ही निवडणूक होत असून त्याकरिता १२ सदस्यांनी नामांकन दाखल केले आहे. जिल्हा परिषदेचे सर्व सदस्य या निवडणुकीत मतदाराची भूमिका बजावणार आहेत. नामांकन मागे घेण्याची ३ आॅगस्ट ही अंतिम तारीख आहे. जिल्हा परिषद सदस्य मिलींद धुर्वे यांच्या याचिकेवरून ही निवडणूक होत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने जुळवून घेत प्रत्येक तीन सदस्य वाटून घेतले आहे. शिवसेने चार उमेदवार रिंगणात उतरले आहे. भाजपचा एक उमेदवार आहे. या शिवाय अपक्ष असलेल्या मिलिंद धुर्वे यांनी मनसे सदस्य अल्का टेकाम यांच्या मदतीने नामांकन दाखल केले आहे. नियोजन समितीसाठी राष्ट्रवादीकडून केवळ एक उमेदवार बदलविण्यात आला आहे. पुर्वी असलेल्या ययाती नाईक यांच्याऐवजी प्रवीण देशमुख यांनी नामांकन दाखल केले आहे. उर्वरित राकेश नेमनवार आणि अमोल राठोड या सदस्यांचे अर्ज आहेत. काँग्रेसने मात्र तिन्ही उमेदवार बदलविले असून नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. काँग्रेसकडून बाळासाहेब मांगुळकर यांचे समर्थक सीमा देशभ्रतार, आर्णी तालुक्यातील सोनबा मंगाम आणि प्रकाश कासवार यांनी नामाकंन दाखल केले आहे. पूर्वीचे नरेंद्र ठाकरे, वसंत चंद्रे, योगेश पारवेकर यांची गच्छंती करण्यात आली आहे. शिवसेनकडून पूर्वीचे आशिष खुलसंगे, दिवाकर राठोड यांच्यासोबतच सुलोचना भोयर, प्रवीण शिंदे यांनी सुध्दा नामांकन दाखल केले आहे. भाजपनेही उषा राठोड यांचे नामांकन दाखल केले आहे. शिवसेनकडून वेळेवर उमेदवारी मागे घेण्याची शक्यता आहे. उर्वरित सदस्य रिंगणात कायम मानले जात आहे. त्यामुळे ही निवडणूक अटळ आहे. जिल्हा परिषदेतील ६२ सदस्यांना आठ उमेदवार निवडायचे आहेत. यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीने जुळून घेतल्याने शिवसेनेचा काय पवित्रा राहतो हे महत्वाचे ठरणार आहे. असे असले तरी या तिन्ही पक्षांना भाजप आणि अपक्षांना अ‍ॅडजेस केल्याशिवाय निवडणूक टाळता येणार नाही. हा पेच आता राजकीय पटलवार कसा सोडविण्यात येतो यावरच या निवडणुकीचे भवितव्य आहे. अपक्ष उमेदवार मिलींद धुर्वे यांच्यामुळेच ही निवडणूक लागली ते माघार घेणार नाही, असे त्यांनी जाहीर केले आहे. तरी ३ आॅगस्टपर्यंत काय हालचाली होता हे महत्वपूर्ण राहणार आहे. (कार्यालय प्रतिनिधी)