शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

शाळा सोडून तीन मुलांची अंध वडिलांसह भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 22:27 IST

गरिबांसाठी, दिव्यांगांसाठी, योजना आहेत. शाळाबाह्य मुलांसाठी तर कायदाच आहे. हे सारे असूनही आणि तिन्ही निकषात बसत असूनही तीन निरागस लेकरांवर आणि त्यांच्या पित्यावर भीक मागून जगण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देचुरमुºयातील चुरगळलेली जिंदगी : दु:खाचे साक्षीदार अनेक, साथीदार कोणीच नाही!

अविनाश खंदारे।लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : गरिबांसाठी, दिव्यांगांसाठी, योजना आहेत. शाळाबाह्य मुलांसाठी तर कायदाच आहे. हे सारे असूनही आणि तिन्ही निकषात बसत असूनही तीन निरागस लेकरांवर आणि त्यांच्या पित्यावर भीक मागून जगण्याची वेळ आली आहे. उमरखेडमधील सामाजिक कार्यकर्ते त्यांच्या संघर्षाचे साक्षीदार झाले, पण दु:खात साथीदार कोणीही झाले नाही. भिक्षा देऊन उपकाराचा आव अनेकांनी आणला. पण शिक्षण देऊन या मुलांना सर्वशिक्षा अभियानाच्या गंगेत आणण्याचा विचारही कुणाच्या मनात आलेला नाही.दहा वर्षांपूर्वी चुरमुरा तांडा येथील एका उमेदीच्या तरुणावर नियतीची कुऱ्हाड कोसळली. विलास फकिरा राठोड हा तरुण रोजमजुरी करत आनंदाने जगत होता. पत्नी संगीताची समर्थ साथ होती. अनिल, राहुल आणि नितीन या तीन मुलांच्या रूपाने त्यांच्या जीवनात आनंद पसरला होता. पण अचानक विलासची दृष्टी गेली. सारथीच अंध झाला म्हटल्यावर पत्नी संगीता पूर्णपणे खचली. लाडक्या लेकरांना आता शिकवायचे कसे? जगवायचे तरी कसे? काहीही झाले तरी पतीची दृष्टी परत आणायचीच हा चंग संगीताने बांधला. गळ्यातले मंगळसूत्र, इतर थोडे दागिने, पाळलेल्या बकऱ्या असे सारे होते नव्हते ते विकून टाकले. विलासला नागपूर, नांदेड, औरंगाबादला नेऊन नेत्रतज्ज्ञांना दाखविले. शस्त्रक्रियाही केली. पण उपयोग झाला नाही. पाच लाखांपेक्षा जास्त खर्च केला. आता घरात काहीच उरले नाही. थकलेल्या संगीताने लोकप्रतिनिधींच्याही भेटी घेतल्या. पण निगरगट्ट लोकांनी साथ दिली नाही. संगीता शेतमजुरी करून अंध पती आणि तीन लेकरांचा उदरनिर्वाह करू लागली. त्यात काय भागणार? अखेर तिन्ही मुलं अंध पित्यासोबत उमरखेडला भिक मागू लागली. गेल्या दहा वर्षांपासून त्यांची जिंदगी अशीच भिक्षेवर सुरू आहे. ही छोटी मुले शाळेत का जात नाही, असा प्रश्न कुणाच्याही मनात येत नाही. फक्त तुम्ही काय रे रोजच मागायला येता म्हणत लोक त्यांच्या अंगावर धावून जातात. मेहनत करूनच जगण्याची सवय असलेल्या माणसाला मागून खाण्याची वेळ येणे यापेक्षा दुर्दैव ते कोणते! तेच शल्य विलासचे मन कुरतडत असते. मोत्यासारखी तीन मुले असताना त्यांना शाळेत पाठवू शकत नाही, ही बोच तर जीवघेणीच. संगीता सध्या उसतोडणीच्या मजुरीला गावोगावी फिरत आहे. ताटातूट झालेल्या या संसाराला सावरण्यासाठी एकही सामाजिक कार्यकर्ता, संस्था सरसावली नाही, हे विशेष.झोपडीचा महाल नको घरकूल द्या!विलास व त्याची पत्नी संगीता तीन मुलांसह १० वर्षांपासून चुरमुरा तांड्याकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला एका झोपडीतच राहतात. पावसाळ्यात या झोपडीत पूर्ण पाणी साचते. राहण्यासाठी जागाच उरत नाही. हे कुटुंब घरकुल मिळावे म्हणून कागदपत्र देऊन शासकीय कार्यालयांमध्ये येरझारा घालत आहे. मात्र वर्षानुवर्षे त्यांच्या हेलपाटाच सुरू आहे. कोणीच त्यांच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही.परमेश्वराने तर माझ्यावर अन्याय केलाच; परंतु शासकीय यंत्रणाही दुर्लक्ष करीत आहे. शासनाने दिव्यांगांना ज्या सुविधा दिल्या आहेत, त्याचा कुठलाच लाभ आम्हाला मिळत नाही. माझ्या मुलांना मी पाहू शकत नाही, हे माझे दुर्दैव. लहान मुलाला तर मी जन्मापासून कधीच पाहू शकलो नाही. त्यांना शाळेत पाठवायचे आहे. पण ते शाळेत गेले तर खाणार काय?- विलास राठोड, चुरमुरा तांडा