शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
3
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
4
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
5
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
6
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
7
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
8
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
9
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
10
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
11
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
12
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
13
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
14
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
15
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
16
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
17
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
18
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
19
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
20
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं

शाळा सोडून तीन मुलांची अंध वडिलांसह भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 22:27 IST

गरिबांसाठी, दिव्यांगांसाठी, योजना आहेत. शाळाबाह्य मुलांसाठी तर कायदाच आहे. हे सारे असूनही आणि तिन्ही निकषात बसत असूनही तीन निरागस लेकरांवर आणि त्यांच्या पित्यावर भीक मागून जगण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देचुरमुºयातील चुरगळलेली जिंदगी : दु:खाचे साक्षीदार अनेक, साथीदार कोणीच नाही!

अविनाश खंदारे।लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : गरिबांसाठी, दिव्यांगांसाठी, योजना आहेत. शाळाबाह्य मुलांसाठी तर कायदाच आहे. हे सारे असूनही आणि तिन्ही निकषात बसत असूनही तीन निरागस लेकरांवर आणि त्यांच्या पित्यावर भीक मागून जगण्याची वेळ आली आहे. उमरखेडमधील सामाजिक कार्यकर्ते त्यांच्या संघर्षाचे साक्षीदार झाले, पण दु:खात साथीदार कोणीही झाले नाही. भिक्षा देऊन उपकाराचा आव अनेकांनी आणला. पण शिक्षण देऊन या मुलांना सर्वशिक्षा अभियानाच्या गंगेत आणण्याचा विचारही कुणाच्या मनात आलेला नाही.दहा वर्षांपूर्वी चुरमुरा तांडा येथील एका उमेदीच्या तरुणावर नियतीची कुऱ्हाड कोसळली. विलास फकिरा राठोड हा तरुण रोजमजुरी करत आनंदाने जगत होता. पत्नी संगीताची समर्थ साथ होती. अनिल, राहुल आणि नितीन या तीन मुलांच्या रूपाने त्यांच्या जीवनात आनंद पसरला होता. पण अचानक विलासची दृष्टी गेली. सारथीच अंध झाला म्हटल्यावर पत्नी संगीता पूर्णपणे खचली. लाडक्या लेकरांना आता शिकवायचे कसे? जगवायचे तरी कसे? काहीही झाले तरी पतीची दृष्टी परत आणायचीच हा चंग संगीताने बांधला. गळ्यातले मंगळसूत्र, इतर थोडे दागिने, पाळलेल्या बकऱ्या असे सारे होते नव्हते ते विकून टाकले. विलासला नागपूर, नांदेड, औरंगाबादला नेऊन नेत्रतज्ज्ञांना दाखविले. शस्त्रक्रियाही केली. पण उपयोग झाला नाही. पाच लाखांपेक्षा जास्त खर्च केला. आता घरात काहीच उरले नाही. थकलेल्या संगीताने लोकप्रतिनिधींच्याही भेटी घेतल्या. पण निगरगट्ट लोकांनी साथ दिली नाही. संगीता शेतमजुरी करून अंध पती आणि तीन लेकरांचा उदरनिर्वाह करू लागली. त्यात काय भागणार? अखेर तिन्ही मुलं अंध पित्यासोबत उमरखेडला भिक मागू लागली. गेल्या दहा वर्षांपासून त्यांची जिंदगी अशीच भिक्षेवर सुरू आहे. ही छोटी मुले शाळेत का जात नाही, असा प्रश्न कुणाच्याही मनात येत नाही. फक्त तुम्ही काय रे रोजच मागायला येता म्हणत लोक त्यांच्या अंगावर धावून जातात. मेहनत करूनच जगण्याची सवय असलेल्या माणसाला मागून खाण्याची वेळ येणे यापेक्षा दुर्दैव ते कोणते! तेच शल्य विलासचे मन कुरतडत असते. मोत्यासारखी तीन मुले असताना त्यांना शाळेत पाठवू शकत नाही, ही बोच तर जीवघेणीच. संगीता सध्या उसतोडणीच्या मजुरीला गावोगावी फिरत आहे. ताटातूट झालेल्या या संसाराला सावरण्यासाठी एकही सामाजिक कार्यकर्ता, संस्था सरसावली नाही, हे विशेष.झोपडीचा महाल नको घरकूल द्या!विलास व त्याची पत्नी संगीता तीन मुलांसह १० वर्षांपासून चुरमुरा तांड्याकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला एका झोपडीतच राहतात. पावसाळ्यात या झोपडीत पूर्ण पाणी साचते. राहण्यासाठी जागाच उरत नाही. हे कुटुंब घरकुल मिळावे म्हणून कागदपत्र देऊन शासकीय कार्यालयांमध्ये येरझारा घालत आहे. मात्र वर्षानुवर्षे त्यांच्या हेलपाटाच सुरू आहे. कोणीच त्यांच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही.परमेश्वराने तर माझ्यावर अन्याय केलाच; परंतु शासकीय यंत्रणाही दुर्लक्ष करीत आहे. शासनाने दिव्यांगांना ज्या सुविधा दिल्या आहेत, त्याचा कुठलाच लाभ आम्हाला मिळत नाही. माझ्या मुलांना मी पाहू शकत नाही, हे माझे दुर्दैव. लहान मुलाला तर मी जन्मापासून कधीच पाहू शकलो नाही. त्यांना शाळेत पाठवायचे आहे. पण ते शाळेत गेले तर खाणार काय?- विलास राठोड, चुरमुरा तांडा