शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

शाळा सोडून तीन मुलांची अंध वडिलांसह भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 22:27 IST

गरिबांसाठी, दिव्यांगांसाठी, योजना आहेत. शाळाबाह्य मुलांसाठी तर कायदाच आहे. हे सारे असूनही आणि तिन्ही निकषात बसत असूनही तीन निरागस लेकरांवर आणि त्यांच्या पित्यावर भीक मागून जगण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देचुरमुºयातील चुरगळलेली जिंदगी : दु:खाचे साक्षीदार अनेक, साथीदार कोणीच नाही!

अविनाश खंदारे।लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : गरिबांसाठी, दिव्यांगांसाठी, योजना आहेत. शाळाबाह्य मुलांसाठी तर कायदाच आहे. हे सारे असूनही आणि तिन्ही निकषात बसत असूनही तीन निरागस लेकरांवर आणि त्यांच्या पित्यावर भीक मागून जगण्याची वेळ आली आहे. उमरखेडमधील सामाजिक कार्यकर्ते त्यांच्या संघर्षाचे साक्षीदार झाले, पण दु:खात साथीदार कोणीही झाले नाही. भिक्षा देऊन उपकाराचा आव अनेकांनी आणला. पण शिक्षण देऊन या मुलांना सर्वशिक्षा अभियानाच्या गंगेत आणण्याचा विचारही कुणाच्या मनात आलेला नाही.दहा वर्षांपूर्वी चुरमुरा तांडा येथील एका उमेदीच्या तरुणावर नियतीची कुऱ्हाड कोसळली. विलास फकिरा राठोड हा तरुण रोजमजुरी करत आनंदाने जगत होता. पत्नी संगीताची समर्थ साथ होती. अनिल, राहुल आणि नितीन या तीन मुलांच्या रूपाने त्यांच्या जीवनात आनंद पसरला होता. पण अचानक विलासची दृष्टी गेली. सारथीच अंध झाला म्हटल्यावर पत्नी संगीता पूर्णपणे खचली. लाडक्या लेकरांना आता शिकवायचे कसे? जगवायचे तरी कसे? काहीही झाले तरी पतीची दृष्टी परत आणायचीच हा चंग संगीताने बांधला. गळ्यातले मंगळसूत्र, इतर थोडे दागिने, पाळलेल्या बकऱ्या असे सारे होते नव्हते ते विकून टाकले. विलासला नागपूर, नांदेड, औरंगाबादला नेऊन नेत्रतज्ज्ञांना दाखविले. शस्त्रक्रियाही केली. पण उपयोग झाला नाही. पाच लाखांपेक्षा जास्त खर्च केला. आता घरात काहीच उरले नाही. थकलेल्या संगीताने लोकप्रतिनिधींच्याही भेटी घेतल्या. पण निगरगट्ट लोकांनी साथ दिली नाही. संगीता शेतमजुरी करून अंध पती आणि तीन लेकरांचा उदरनिर्वाह करू लागली. त्यात काय भागणार? अखेर तिन्ही मुलं अंध पित्यासोबत उमरखेडला भिक मागू लागली. गेल्या दहा वर्षांपासून त्यांची जिंदगी अशीच भिक्षेवर सुरू आहे. ही छोटी मुले शाळेत का जात नाही, असा प्रश्न कुणाच्याही मनात येत नाही. फक्त तुम्ही काय रे रोजच मागायला येता म्हणत लोक त्यांच्या अंगावर धावून जातात. मेहनत करूनच जगण्याची सवय असलेल्या माणसाला मागून खाण्याची वेळ येणे यापेक्षा दुर्दैव ते कोणते! तेच शल्य विलासचे मन कुरतडत असते. मोत्यासारखी तीन मुले असताना त्यांना शाळेत पाठवू शकत नाही, ही बोच तर जीवघेणीच. संगीता सध्या उसतोडणीच्या मजुरीला गावोगावी फिरत आहे. ताटातूट झालेल्या या संसाराला सावरण्यासाठी एकही सामाजिक कार्यकर्ता, संस्था सरसावली नाही, हे विशेष.झोपडीचा महाल नको घरकूल द्या!विलास व त्याची पत्नी संगीता तीन मुलांसह १० वर्षांपासून चुरमुरा तांड्याकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला एका झोपडीतच राहतात. पावसाळ्यात या झोपडीत पूर्ण पाणी साचते. राहण्यासाठी जागाच उरत नाही. हे कुटुंब घरकुल मिळावे म्हणून कागदपत्र देऊन शासकीय कार्यालयांमध्ये येरझारा घालत आहे. मात्र वर्षानुवर्षे त्यांच्या हेलपाटाच सुरू आहे. कोणीच त्यांच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही.परमेश्वराने तर माझ्यावर अन्याय केलाच; परंतु शासकीय यंत्रणाही दुर्लक्ष करीत आहे. शासनाने दिव्यांगांना ज्या सुविधा दिल्या आहेत, त्याचा कुठलाच लाभ आम्हाला मिळत नाही. माझ्या मुलांना मी पाहू शकत नाही, हे माझे दुर्दैव. लहान मुलाला तर मी जन्मापासून कधीच पाहू शकलो नाही. त्यांना शाळेत पाठवायचे आहे. पण ते शाळेत गेले तर खाणार काय?- विलास राठोड, चुरमुरा तांडा