शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद सदस्यांची नाराजी थांबेना !

By admin | Updated: January 8, 2016 03:09 IST

जिल्हा परिषदेतील पदाधिकारी व सदस्यांची प्रशासनाप्रती असलेली नाराजी थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत.

प्रशासनावर रोष : उपक्रम चांगले पण लोकप्रतिनिधींना विश्वासात घेत नसल्याची खंत यवतमाळ : जिल्हा परिषदेतील पदाधिकारी व सदस्यांची प्रशासनाप्रती असलेली नाराजी थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. या सदस्यांचा अधिकाऱ्यांच्या एककल्ली कारभारावर रोष आहे. प्रशासनाचे उपक्रम चांगले व समाजहिताचे असले तरी ते लोकप्रतिनिधींना अंधारात ठेऊन राबविले जात असल्याची खंत अनेक सदस्य बोलून दाखवित आहे. जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी व काँग्रेसच्या सत्तेची दीड वर्षे लोटली आहे. मात्र या काळात सत्ताधारी लोकप्रतिनिधींच्या चेहऱ्यावर समाधान अभावानेच पहायला मिळाले. मुळात प्रशासन व पदाधिकारी असा वाद छुप्या पद्धतीने काही महिन्यांपासून धुमसतो आहे. तो विझविण्याऐवजी मान-अपमानाच्या काही घटनांमुळे तो आणखी पेटतो आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने ४० किमीची पायदळ यात्रा काढली. तेव्हापासून या वादाबाबत उघड प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत. या पदयात्रेत जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी व सदस्यांना प्रशासनाने सहभागी करून न घेतल्याची ओरड आजही ऐकायला मिळते. या ‘उपक्रमाची’ चर्चा सुरू असतानाच तंबाखूमुक्त जीवन संकल्प दिनी पदयात्रेची पुनरावृत्ती झाल्याचे बोलले जाते. या संकल्प दिनाची पदाधिकारी व सदस्यांना कल्पनाच दिली गेली नसल्याचा राष्ट्रवादीच्या गोटातील सदस्यांचा सूर आहे. त्यामुळे प्रशासनाविरोधातील एककल्ली कारभाराचा आरोप आता आणखी उघडपणे सदस्य करू लागले आहेत. जिल्हा परिषदेतील शासकीय उपक्रम पदाधिकाऱ्यांनाच प्रशासन सांगत नसेल तर सामान्य सदस्यांची खरच प्रशासन किती किंमत करीत असेल असा सवाल एका सदस्याने उपस्थित केला. अध्यक्षांनी विविध विभागांना आकस्मिक भेटी देऊन लेटलतिफ कर्मचाऱ्यांची अनेकदा झाडाझडती घेतली. ही लेटलतिफी निदर्शनास आणून दिल्यानंतरही प्रशासनाने ‘टाईट’ भूमिका न घेतल्याने आजही लेटलतिफी कायम असल्याचे सांगितले जाते. सदस्यांनी अध्यक्षांकडे नाराजी बोलून दाखविल्यानंतर पदाधिकारी व प्रशासनाची समन्वय बैठक पार पडली. त्यात चर्चा होऊन प्रशासनाच्यावतीने चूक कबूल करण्यात आली. मात्र तेवढ्या बाबीने सदस्यांचे समाधान झालेले नाही. तंबाखू विरोधी दिनाच्या पत्रावर अध्यक्षांच्या खोट्या स्वाक्षरीचा मुद्दाही गाजतो आहे. भाजपा सरकार स्वच्छ भारत अभियान राबवित असताना शौचालय अनुदानातील गावांची संख्या अर्ध्यावर आणली गेली. डिजीटल स्कूलला वीज भारनियमन आणि इंटरनेट कनेक्शन तथा स्पीडचा अडथळा निर्माण होत असल्याची तक्रारही सदस्यांनी बोलून दाखविली. (जिल्हा प्रतिनिधी)