शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

रेशनच्या तूर, चणाडाळीची हजारो पाकिटे चक्क जंगलात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 21:53 IST

गरिबांसाठी म्हणून स्वस्त धान्य दुकानात येणाऱ्या तूर आणि चणाडाळीची हजारो पाकिटे चक्क जंगलात फेकून देण्यात आली. सोमवारी सकाळी यवतमाळ-अमरावती मार्गावरील पांढरीच्या जंगलात हा प्रकार उघडकीस आला.

ठळक मुद्देडाळ विकली, पाकिटे फेकली : शेकडो क्विंटलचा गैरप्रकार दडपण्याचा प्रयत्न, पुरवठा विभागाला विक्रेत्यांचे आव्हान

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गरिबांसाठी म्हणून स्वस्त धान्य दुकानात येणाऱ्या तूर आणि चणाडाळीची हजारो पाकिटे चक्क जंगलात फेकून देण्यात आली. सोमवारी सकाळी यवतमाळ-अमरावती मार्गावरील पांढरीच्या जंगलात हा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे रेशनची लाखोंची तूरडाळ खुल्याबाजारात विकल्या गेल्याचे स्पष्ट होत असून ही पाकिटे फेकणारा विक्रेता शोधण्याचे आव्हान पुरवठा विभागापुढे आहे.स्वस्त धान्याचा काळाबाजार रोखण्यासाठी स्वाईप मशिनचा वापर होत आहे. मात्र आता या स्वाईप मशिनवरही विक्रेत्यांनी जालीम उपाय शोधला आहे. त्याची साक्ष या रिकाम्या पाकिटांनी दिली. स्वस्त धान्य विक्रेत्यांच्या ‘चोरवाटा’ही यानिमित्ताने उघड झाल्या आहेत.गरिबांना स्वस्त दरात डाळ मिळावी म्हणून पुरवठा विभागाने तूरडाळ आणि चणाडाळीचा पुरवठा सुरू केला आहे. रेशन दुकानातून वितरित झालेली डाळ रेकॉर्डवर यावी म्हणून स्वाईप मशिनचाही वापर केला जात आहे. विक्री करण्यात आलेली तूरडाळ आणि चणाडाळ स्वाईप मशिनवर आली आहे. मात्र ग्राहकांच्या घरापर्यंत पोहोचली नाही. म्हणूनच डाळीची रिकामी पाकिटे जंगलात फेकली गेली.‘जनहित’ची दक्षतायवतमाळ-अमरावती मार्गावरील पांढरी जंगलाच्या वाटेवर डाळीची ही रिकामी पाकिटे फेकली गेली. जनहित माझे गाव संघटनेचे अध्यक्ष विलास झेंडे, नरसिंग आडे, प्रवीण ढोकळे, सुप्रित गणवीर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना हा प्रकार सोमवारी निदर्शनास आला. त्यांनी तातडीने याची प्रशासनाला खबर दिली.पूर्वी लाभार्थ्यांना आदिवासी विकास विभागामार्फत विविध साहित्य वाटप केले जात होते. हे साहित्य लाभार्थी कमी दरात गावात विकत होते. यातून गावातील धनधांडग्यांचाच लाभ झाला. तसाच प्रकार आता डाळीमध्ये होत आहे. शेकडो क्विंटल तूरडाळ आणि चणाडाळीची अशाच पद्धतीने विल्हेवाट लावली गेली आहे.दुप्पट नफ्यासाठी लढविली शक्कलस्वस्त धान्य दुकानातून विक्री झालेले तूर आणि चणाडाळीचे पाकीट ग्राहकांनी खरेदी केले. ते पाकीट पुन्हा दुकानदारांनी कमी दरात खरेदी केले. खरेदी झालेले तूर आणि चणाडाळीचे पाकीट रिकामे करून खुल्या बाजारात विकले गेले. त्यावर डबल नफा कमविला आहे. खुल्या बाजारात तूरडाळीचे दर ८० रूपये किलो आहे. तर स्वस्त धान्य दुकानात ही डाळ ५० रूपये किलोने विकली जात आहे. यामुळे तूरडाळीतून विक्रेत्यांना क्विंटलमागे तीन हजारांचा नफा होणार आहे. त्यासाठीच हा गैरप्रकार झाला आहे. चणाडाळ बाजारात ६५ रूपये किलो आहे. तर स्वस्त धान्य दुकानात ४० रूपये आहे. क्विंटलमागे दीड हजार रूपयांचा नफा मिळतो. कमी वेळात अधिक नफा मिळविण्यासाठी हा गोरखधंदा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.तूरडाळ मिळाली नाही, अशी तक्रार अजूनही नाही. हा काय प्रकार आहे, हे कसे घडले, याची चौकशी करण्यात येईल. नियमांचे उल्लंघन करणाºयांवर थेट कारवाई होईल.- शालीग्राम भराडीजिल्हा पुरवठा अधिकारी, यवतमाळ