शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
3
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
4
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
5
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
6
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
7
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
8
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
9
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
10
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
11
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
12
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
13
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
14
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
15
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
16
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
17
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
18
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
19
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
20
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...

हजारो क्विंटल सोयाबीन उघड्यावर

By admin | Updated: October 10, 2015 01:58 IST

शेतकऱ्यांच्या सोयीसाठी असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या शेतकऱ्यांचीच मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.

शेतकरी भडकले : यवतमाळ बाजार समितीत मोठ्या प्रमाणात गैरसोययवतमाळ : शेतकऱ्यांच्या सोयीसाठी असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या शेतकऱ्यांचीच मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. सुसज्ज शेड असूनही बाजार समितीत विक्रीस आलेले तब्बल साडेतीन हजार क्विंटल सोयाबीन उघड्यावरच पडून आहे. शुक्रवारी या समस्येमुळे शेतकरी बाजार समिती प्रशासनाविरुद्ध भडकले होते.शेतकऱ्यांचे सोयाबीन निघणे सुरू झाले आहे. तसेच दसऱ्याचा सण तोंडावर असल्याने बाजार समितीमध्ये सोयाबीन मोठ्या प्रमाणात विक्रीस आणले जात आहे. हे सोयाबीन सामावून घेण्याची क्षमता यवतमाळ बाजार समितीमध्ये आहे. मात्र, नियोजन नसल्याने शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. शेतमाल ठेवण्यासाठी बाजार समितीत तीन सुसज्ज शेड आहेत. जवळपास १० हजार पोती ठेवण्याची क्षमता या शेडची आहे. तरीही साडेतीन हजार क्विंटल सोयाबीन शुक्रवारी शेतकऱ्यांना उघड्यावरच ठेवावे लागले. यामागे बाजार समितीचा नियोजनशून्य कारभार असल्याची संतप्त भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.गुरुवारपर्यंत खरेदी केलेला माल शेडमध्येच ठेवण्यात आला आहे. या मालाचा ‘पाला’ (मिसळणे) वेळेत करण्यात आला नाही. त्यामुळे पुढील प्रक्रियाही खोळंबली आहे. जवळपास १० हजार पोती उचललीच न गेल्याने नवीन आलेला माल शेडमध्ये ठेवण्यासाठी जागाच नाही. त्यातच शुक्रवारी बाजार समितीत साधारण साडेतीन हजार क्विंटल सोयाबीनची आवाक झाली. मात्र शेडमध्ये जागा नसल्याने शेतकऱ्यांना आपला माल उघड्यावर ठेवून खरेदीसाठी वाट पहावी लागली. या सोयाबीनची उघड्यवरच बोली लावली जात होती.विशेष म्हणजे, सोयाबीनची आवक वाढताच खरेदीदारांनी लगेच भावही पाडले. गुरुवारपेक्षा शुक्रवारी सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात झाली. गुरुवारपर्यंत सोयाबीनला ३८०० ते ३९०० रुपये भाव होता. मात्र, शुक्रवारी आवक वाढताच हे भाव ३७०० रुपयांपर्यंत पाडण्यात आले. त्यामुळेही शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला. गुरूवारच्याच भावाने सोयाबीन खरेदी करण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. मात्र बाजार समितीकडून या मागणीची दखल घेण्यात आली नाही.दरम्यान, यासंदर्भात बाजार समितीचे सचिव संजय भेंडारकर म्हणाले की, पुढील तीन दिवस बाजार समितीला सुटी आहे. त्यामुळे माल खरेदी होणार नाही. शेडमधील माल आजच मार्गी लावला जाईल. परंतु, बाजार समितीत बाहेरचे व्यापारी फारच कमी प्रमाणात असल्याने स्पर्धा कमी आहे. त्याचा गैरफायदा घेत भाव पाडले जातात, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. (शहर वार्ताहर)