शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
2
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
3
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
4
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
5
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
6
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
7
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
8
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
9
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
10
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
11
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
12
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
13
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
14
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
15
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
16
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
17
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
18
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
19
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
20
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

हजारो क्विंटल सोयाबीन उघड्यावर

By admin | Updated: October 10, 2015 01:58 IST

शेतकऱ्यांच्या सोयीसाठी असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या शेतकऱ्यांचीच मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.

शेतकरी भडकले : यवतमाळ बाजार समितीत मोठ्या प्रमाणात गैरसोययवतमाळ : शेतकऱ्यांच्या सोयीसाठी असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या शेतकऱ्यांचीच मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. सुसज्ज शेड असूनही बाजार समितीत विक्रीस आलेले तब्बल साडेतीन हजार क्विंटल सोयाबीन उघड्यावरच पडून आहे. शुक्रवारी या समस्येमुळे शेतकरी बाजार समिती प्रशासनाविरुद्ध भडकले होते.शेतकऱ्यांचे सोयाबीन निघणे सुरू झाले आहे. तसेच दसऱ्याचा सण तोंडावर असल्याने बाजार समितीमध्ये सोयाबीन मोठ्या प्रमाणात विक्रीस आणले जात आहे. हे सोयाबीन सामावून घेण्याची क्षमता यवतमाळ बाजार समितीमध्ये आहे. मात्र, नियोजन नसल्याने शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. शेतमाल ठेवण्यासाठी बाजार समितीत तीन सुसज्ज शेड आहेत. जवळपास १० हजार पोती ठेवण्याची क्षमता या शेडची आहे. तरीही साडेतीन हजार क्विंटल सोयाबीन शुक्रवारी शेतकऱ्यांना उघड्यावरच ठेवावे लागले. यामागे बाजार समितीचा नियोजनशून्य कारभार असल्याची संतप्त भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.गुरुवारपर्यंत खरेदी केलेला माल शेडमध्येच ठेवण्यात आला आहे. या मालाचा ‘पाला’ (मिसळणे) वेळेत करण्यात आला नाही. त्यामुळे पुढील प्रक्रियाही खोळंबली आहे. जवळपास १० हजार पोती उचललीच न गेल्याने नवीन आलेला माल शेडमध्ये ठेवण्यासाठी जागाच नाही. त्यातच शुक्रवारी बाजार समितीत साधारण साडेतीन हजार क्विंटल सोयाबीनची आवाक झाली. मात्र शेडमध्ये जागा नसल्याने शेतकऱ्यांना आपला माल उघड्यावर ठेवून खरेदीसाठी वाट पहावी लागली. या सोयाबीनची उघड्यवरच बोली लावली जात होती.विशेष म्हणजे, सोयाबीनची आवक वाढताच खरेदीदारांनी लगेच भावही पाडले. गुरुवारपेक्षा शुक्रवारी सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात झाली. गुरुवारपर्यंत सोयाबीनला ३८०० ते ३९०० रुपये भाव होता. मात्र, शुक्रवारी आवक वाढताच हे भाव ३७०० रुपयांपर्यंत पाडण्यात आले. त्यामुळेही शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला. गुरूवारच्याच भावाने सोयाबीन खरेदी करण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. मात्र बाजार समितीकडून या मागणीची दखल घेण्यात आली नाही.दरम्यान, यासंदर्भात बाजार समितीचे सचिव संजय भेंडारकर म्हणाले की, पुढील तीन दिवस बाजार समितीला सुटी आहे. त्यामुळे माल खरेदी होणार नाही. शेडमधील माल आजच मार्गी लावला जाईल. परंतु, बाजार समितीत बाहेरचे व्यापारी फारच कमी प्रमाणात असल्याने स्पर्धा कमी आहे. त्याचा गैरफायदा घेत भाव पाडले जातात, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. (शहर वार्ताहर)