शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
2
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
3
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
4
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
5
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाल 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
6
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला
7
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
8
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
9
अन्न पुन्हा गरम करणं आरोग्यासाठी ठरतंय घातक; 'या' ५ गोष्टी टाळाल तरच ठणठणीत राहाल
10
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
11
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश
12
"मॅडम येत आहेत, त्यांना..."; पोलीस असल्याचं सांगून दुकानात घुसले अन् २ लाखांचे दागिने चोरले
13
ISI कडून मिळाले आदेश, बेताब खोऱ्यात लपवली शस्त्रे; NIA च्या अहवालात धक्कादायक खुलासा
14
संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”
15
काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी
16
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
17
हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?
18
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
19
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
20
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला 'हे' उपाय केले असता घरात येईल सुख समृद्धी!

हजारो क्विंटल सोयाबीन उघड्यावर

By admin | Updated: October 10, 2015 01:58 IST

शेतकऱ्यांच्या सोयीसाठी असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या शेतकऱ्यांचीच मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.

शेतकरी भडकले : यवतमाळ बाजार समितीत मोठ्या प्रमाणात गैरसोययवतमाळ : शेतकऱ्यांच्या सोयीसाठी असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या शेतकऱ्यांचीच मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. सुसज्ज शेड असूनही बाजार समितीत विक्रीस आलेले तब्बल साडेतीन हजार क्विंटल सोयाबीन उघड्यावरच पडून आहे. शुक्रवारी या समस्येमुळे शेतकरी बाजार समिती प्रशासनाविरुद्ध भडकले होते.शेतकऱ्यांचे सोयाबीन निघणे सुरू झाले आहे. तसेच दसऱ्याचा सण तोंडावर असल्याने बाजार समितीमध्ये सोयाबीन मोठ्या प्रमाणात विक्रीस आणले जात आहे. हे सोयाबीन सामावून घेण्याची क्षमता यवतमाळ बाजार समितीमध्ये आहे. मात्र, नियोजन नसल्याने शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. शेतमाल ठेवण्यासाठी बाजार समितीत तीन सुसज्ज शेड आहेत. जवळपास १० हजार पोती ठेवण्याची क्षमता या शेडची आहे. तरीही साडेतीन हजार क्विंटल सोयाबीन शुक्रवारी शेतकऱ्यांना उघड्यावरच ठेवावे लागले. यामागे बाजार समितीचा नियोजनशून्य कारभार असल्याची संतप्त भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.गुरुवारपर्यंत खरेदी केलेला माल शेडमध्येच ठेवण्यात आला आहे. या मालाचा ‘पाला’ (मिसळणे) वेळेत करण्यात आला नाही. त्यामुळे पुढील प्रक्रियाही खोळंबली आहे. जवळपास १० हजार पोती उचललीच न गेल्याने नवीन आलेला माल शेडमध्ये ठेवण्यासाठी जागाच नाही. त्यातच शुक्रवारी बाजार समितीत साधारण साडेतीन हजार क्विंटल सोयाबीनची आवाक झाली. मात्र शेडमध्ये जागा नसल्याने शेतकऱ्यांना आपला माल उघड्यावर ठेवून खरेदीसाठी वाट पहावी लागली. या सोयाबीनची उघड्यवरच बोली लावली जात होती.विशेष म्हणजे, सोयाबीनची आवक वाढताच खरेदीदारांनी लगेच भावही पाडले. गुरुवारपेक्षा शुक्रवारी सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात झाली. गुरुवारपर्यंत सोयाबीनला ३८०० ते ३९०० रुपये भाव होता. मात्र, शुक्रवारी आवक वाढताच हे भाव ३७०० रुपयांपर्यंत पाडण्यात आले. त्यामुळेही शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला. गुरूवारच्याच भावाने सोयाबीन खरेदी करण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. मात्र बाजार समितीकडून या मागणीची दखल घेण्यात आली नाही.दरम्यान, यासंदर्भात बाजार समितीचे सचिव संजय भेंडारकर म्हणाले की, पुढील तीन दिवस बाजार समितीला सुटी आहे. त्यामुळे माल खरेदी होणार नाही. शेडमधील माल आजच मार्गी लावला जाईल. परंतु, बाजार समितीत बाहेरचे व्यापारी फारच कमी प्रमाणात असल्याने स्पर्धा कमी आहे. त्याचा गैरफायदा घेत भाव पाडले जातात, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. (शहर वार्ताहर)