शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी कपातीने २ लाख कोटींचा सरकारला तोटा? श्रीमंत-गरीब दरी वाढल्याचा फटका बसणार
2
भरती-ओहोटीत रेंगाळला लालबागचा राजा, ३६ तासांनी विसर्जन; राजाला निरोप देण्यासाठी भाविकांचे प्राण कंठाशी
3
एक वर्ष पूर्ण होण्याआधीच जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा पायउतार
4
अदानी लिमिटेडविरुद्धचा ‘तो’ मानहानिकारक मजकूर नष्ट करा; उच्च न्यायालयाचे निर्देश, प्रकरण काय? 
5
भारताने रशियाकडून केली तेल खरेदी, अन् नवारो-मस्क यांच्यात भडका! काय म्हणाले होते नवारो?
6
चिंताजनक! कोणतेही प्रशिक्षण नसलेल्यांकडून भारतात २.५ टक्के महिलांची होतेय प्रसूती, महाराष्ट्रात स्थिती काय?
7
पीडित मुलगी ठाम तर नराधमास शिक्षा होणारच; १० वर्षांच्या मुलीवर बलात्कार, आरोपीला १२ वर्षांचा कारावास 
8
रामायण केवळ कथा नाही तर धर्म, जीवन जगण्याची कला : मोरारीबापू
9
गणपती विसर्जन सोहळ्यावर शोककळा; वेगवेगळ्या घटनांमध्ये 5 जणांचा मृत्यू  
10
Chandra Grahan: कोल्हापूरच्या खगोलप्रेमींनी अनुभवली ब्लड मूनची अद्भुत दृश्यं, एकदा पहाच...
11
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...
12
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
13
अख्खी आंदेकर फॅमिली मोस्ट वाँटेड; आयुष कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ जणांवर गुन्हे 
14
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
15
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
16
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र
17
ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार
18
गुंडगिरीचा कळस! माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; लाेखंडी राॅड, स्टंपने २२ मिनिटे मारहाण
19
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
20
लव्ह स्टोरीचे बिंग फुटण्याची भीती; पोलिस भरती अकॅडमीच्या संचालकांनेच केले विद्यार्थ्याचे अपहरण

जलकुंभांच्या स्वच्छतेसाठी हजारो लिटर पाणी रस्त्यावर

By admin | Updated: April 22, 2016 04:19 IST

जलकुंभाच्या स्वच्छतेच्या नावावर हजारो लिटर पाणी गुरुवारी रस्त्यावर वाहत होते. एकीकडे पाच दिवसांपासून

यवतमाळ : जलकुंभाच्या स्वच्छतेच्या नावावर हजारो लिटर पाणी गुरुवारी रस्त्यावर वाहत होते. एकीकडे पाच दिवसांपासून शहरात नळ नाही. तर दुसरीकडे रस्त्यावरून भर उन्हाळ्यात वाहणारी गंगा पाहून नागरिक जीवन प्राधिकरणाच्या नावे संताप व्यक्त करीत होते. पाणीपुरवठा करणाऱ्या निळोणा धरणाने गाठलेला तळ आणि चापडोह धरणातून नसलेली वितरण व्यवस्था यामुळे शहरावर सध्या तीव्र जलसंकट उभे ठाकले आहे. यातून मार्ग काढण्यासाठी पूर्वी दोन दिवसाआड येणारे नळ आता तीन दिवसाआड येतील असे प्राधिकरणाकडून जाहीर करण्यात आले होते. परंतु आता तीन दिवसाआडही नळ सोडले न गेल्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. या संदर्भात जीवन प्राधिकरणाच्या सबंधित अभियंत्यांशी संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शकले नाही. प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन माहिती घेतली असता शहराला सध्या शहराला दूषित, व पिवळसर पाण्याचा पुरवठा होत असल्याच्या अनेक तक्रारी असल्यामुळे गोदणी मार्गावरील जीवन प्राधिकरणाच्या मुख्य कार्यालयात असलेल्या दोन टाक्या स्वच्छ करण्याचे काम हाती घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. याच कारणामुळे शहराला पाचव्या दिवशीही पाणी मिळाले नाही, ही परिस्थिती कधीपर्यंत कायम राहील हे समजायला मार्ग नाही. जीवन प्राधिकरणाकडून नागरिकांना कोणतीही माहिती दिली जात नाही, त्यामुळे चांगलाच गोंधळ उडत आहे. सबंधित उपअभियंत्यांशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते ‘नॉट रिचेबल’ होते. गेल्या अनेक वर्षांपासून मुख्य कार्यालयातील टाक्या स्वच्छ करण्यात न आल्याने यामध्ये मोठ्या प्रमाणात गाठ साचला आहे. त्यातूनच दूषित पाण्याचा पुरवठा सुरू आहे. यामध्ये थोडी खोलात जाऊन माहिती घेतली असता अमोलकचंद महाविद्यालयामागे असलेले प्राधिकरणाचे फिल्टर अनेक वर्षांपासून योग्यरित्या काम करीत नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे पाणी शुद्धीकरणच होत नसल्याने टाक्यांमध्ये अशुद्ध पाणी येते. (प्रतिनिधी)नागरिकांत तीव्र संताप ४यवतमाळ शहरातील हिंदी हायस्कूल ते मार्इंदे चौक मार्गावर गुरुवारी सायंकाळी रस्त्यावरून हजारो लिटर पाणी वाहून जात होते. एकीकडे शहरात भीषण पाणीटंचाई आणि दुसरीकडे पाण्याचा अपव्यय यामुळे नागरिक प्राधिकरणाच्या नावे संताप व्यक्त करीत होते.