शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

हजारो हेक्टर जंगलाची सुरक्षा वाऱ्यावर

By admin | Updated: September 1, 2014 23:56 IST

शासन दफ्तरी प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांसाठी सुमारे दहा दिवसांपासून वनपाल आणि वनरक्षक संपावर गेले आहेत. न्याय्य मागण्यांसाठी संपावर जाणे हा त्यांचा अधिकार आहे.

यवतमाळ : शासन दफ्तरी प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांसाठी सुमारे दहा दिवसांपासून वनपाल आणि वनरक्षक संपावर गेले आहेत. न्याय्य मागण्यांसाठी संपावर जाणे हा त्यांचा अधिकार आहे. मात्र संप कालावधीत त्यांच्या ऐवजी वनरक्षणाचे काम कुणी करावे, याचे नियोजनच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेले नाही. त्यामुळे यवतमाळ वनवृत्तातील हजारो हेक्टर जंगलाच्या संरक्षणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शिवाय लाकूड वाहतूकीची परवानगी मिळत नसल्याने शेतकरीही अडचणीत सापडले आहे. यवतमाळ वनवृत्तातील हिवरी वनपरिक्षेत्रांतर्गत मनपूर बिटमधील राखीव वनात दोनदा शेकडो सागवान वृक्षांची कत्तल करून तस्करीचा प्रयत्न उघड झाला. त्यापाठोपाठ घाटंजी वनपरिक्षेत्रातील साखरा बिटमध्येही ट्रक फसल्याने राखीव वनातील शेकडो सागवान वृक्षांची कत्तल आणि तस्करी उघड झाली. या घटनांची शाई वाळते न् वाळते तोच पुसद वनपरिक्षेत्रातही ट्रक फसल्याने सागवान लाकडांची तस्करी उघड झाली. वनाधिकारी आणि कर्मचारी कर्तव्यावर असताना लाकूड तस्करीच्या एवढ्या गंभीर घटना घडल्या. आता तर एकट्या यवतमाळ वन विभागातील दीडशेवर वनकर्मचारी संपावर गेले आहेत. यवतमाळ वनवृत्तातील संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांचा आकडा तर एक हजारच्या घरात जातो. असे असताना वरिष्ठ स्तराहून जंगल संरक्षणासाठी पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे होते. मात्र तसे न झाल्याने हजारो हेक्टर राखीव जंगल वाऱ्यावर सोडण्यात आले आहे. केवळ वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांकडून जंगलात गस्त घालण्यात येत आहे. एकटा अधिकारी गस्त घालून करणार काय, असा प्रश्नही निर्माण झाला आहे. संपाच्या कालावधीत सागवान कत्तल आणि तस्करीच्या घटना घडल्यास याची जबाबदारी कुणाची, असा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. अनेक शेतकऱ्यांनी पैशाची तजविज करण्यासाठी परवानगी काढून शेतातील सागवान वृक्षांची तोड केली. मात्र वनपाल आणि वनरक्षक संपावर असल्याने त्यांना वाहतूक पास मिळत नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)