शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
2
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
3
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
4
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
5
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
6
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
7
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
8
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
9
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
10
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
11
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
12
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
13
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
14
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
15
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
16
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
17
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
18
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
19
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
20
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान

हजारो हेक्टर जंगलाची सुरक्षा वाऱ्यावर

By admin | Updated: September 1, 2014 23:56 IST

शासन दफ्तरी प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांसाठी सुमारे दहा दिवसांपासून वनपाल आणि वनरक्षक संपावर गेले आहेत. न्याय्य मागण्यांसाठी संपावर जाणे हा त्यांचा अधिकार आहे.

यवतमाळ : शासन दफ्तरी प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांसाठी सुमारे दहा दिवसांपासून वनपाल आणि वनरक्षक संपावर गेले आहेत. न्याय्य मागण्यांसाठी संपावर जाणे हा त्यांचा अधिकार आहे. मात्र संप कालावधीत त्यांच्या ऐवजी वनरक्षणाचे काम कुणी करावे, याचे नियोजनच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेले नाही. त्यामुळे यवतमाळ वनवृत्तातील हजारो हेक्टर जंगलाच्या संरक्षणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शिवाय लाकूड वाहतूकीची परवानगी मिळत नसल्याने शेतकरीही अडचणीत सापडले आहे. यवतमाळ वनवृत्तातील हिवरी वनपरिक्षेत्रांतर्गत मनपूर बिटमधील राखीव वनात दोनदा शेकडो सागवान वृक्षांची कत्तल करून तस्करीचा प्रयत्न उघड झाला. त्यापाठोपाठ घाटंजी वनपरिक्षेत्रातील साखरा बिटमध्येही ट्रक फसल्याने राखीव वनातील शेकडो सागवान वृक्षांची कत्तल आणि तस्करी उघड झाली. या घटनांची शाई वाळते न् वाळते तोच पुसद वनपरिक्षेत्रातही ट्रक फसल्याने सागवान लाकडांची तस्करी उघड झाली. वनाधिकारी आणि कर्मचारी कर्तव्यावर असताना लाकूड तस्करीच्या एवढ्या गंभीर घटना घडल्या. आता तर एकट्या यवतमाळ वन विभागातील दीडशेवर वनकर्मचारी संपावर गेले आहेत. यवतमाळ वनवृत्तातील संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांचा आकडा तर एक हजारच्या घरात जातो. असे असताना वरिष्ठ स्तराहून जंगल संरक्षणासाठी पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे होते. मात्र तसे न झाल्याने हजारो हेक्टर राखीव जंगल वाऱ्यावर सोडण्यात आले आहे. केवळ वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांकडून जंगलात गस्त घालण्यात येत आहे. एकटा अधिकारी गस्त घालून करणार काय, असा प्रश्नही निर्माण झाला आहे. संपाच्या कालावधीत सागवान कत्तल आणि तस्करीच्या घटना घडल्यास याची जबाबदारी कुणाची, असा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. अनेक शेतकऱ्यांनी पैशाची तजविज करण्यासाठी परवानगी काढून शेतातील सागवान वृक्षांची तोड केली. मात्र वनपाल आणि वनरक्षक संपावर असल्याने त्यांना वाहतूक पास मिळत नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)