शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

हजारो हेक्टर जंगलाची सुरक्षा वाऱ्यावर

By admin | Updated: September 1, 2014 23:56 IST

शासन दफ्तरी प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांसाठी सुमारे दहा दिवसांपासून वनपाल आणि वनरक्षक संपावर गेले आहेत. न्याय्य मागण्यांसाठी संपावर जाणे हा त्यांचा अधिकार आहे.

यवतमाळ : शासन दफ्तरी प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांसाठी सुमारे दहा दिवसांपासून वनपाल आणि वनरक्षक संपावर गेले आहेत. न्याय्य मागण्यांसाठी संपावर जाणे हा त्यांचा अधिकार आहे. मात्र संप कालावधीत त्यांच्या ऐवजी वनरक्षणाचे काम कुणी करावे, याचे नियोजनच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेले नाही. त्यामुळे यवतमाळ वनवृत्तातील हजारो हेक्टर जंगलाच्या संरक्षणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शिवाय लाकूड वाहतूकीची परवानगी मिळत नसल्याने शेतकरीही अडचणीत सापडले आहे. यवतमाळ वनवृत्तातील हिवरी वनपरिक्षेत्रांतर्गत मनपूर बिटमधील राखीव वनात दोनदा शेकडो सागवान वृक्षांची कत्तल करून तस्करीचा प्रयत्न उघड झाला. त्यापाठोपाठ घाटंजी वनपरिक्षेत्रातील साखरा बिटमध्येही ट्रक फसल्याने राखीव वनातील शेकडो सागवान वृक्षांची कत्तल आणि तस्करी उघड झाली. या घटनांची शाई वाळते न् वाळते तोच पुसद वनपरिक्षेत्रातही ट्रक फसल्याने सागवान लाकडांची तस्करी उघड झाली. वनाधिकारी आणि कर्मचारी कर्तव्यावर असताना लाकूड तस्करीच्या एवढ्या गंभीर घटना घडल्या. आता तर एकट्या यवतमाळ वन विभागातील दीडशेवर वनकर्मचारी संपावर गेले आहेत. यवतमाळ वनवृत्तातील संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांचा आकडा तर एक हजारच्या घरात जातो. असे असताना वरिष्ठ स्तराहून जंगल संरक्षणासाठी पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे होते. मात्र तसे न झाल्याने हजारो हेक्टर राखीव जंगल वाऱ्यावर सोडण्यात आले आहे. केवळ वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांकडून जंगलात गस्त घालण्यात येत आहे. एकटा अधिकारी गस्त घालून करणार काय, असा प्रश्नही निर्माण झाला आहे. संपाच्या कालावधीत सागवान कत्तल आणि तस्करीच्या घटना घडल्यास याची जबाबदारी कुणाची, असा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. अनेक शेतकऱ्यांनी पैशाची तजविज करण्यासाठी परवानगी काढून शेतातील सागवान वृक्षांची तोड केली. मात्र वनपाल आणि वनरक्षक संपावर असल्याने त्यांना वाहतूक पास मिळत नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)