शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ जिल्ह्यातल्या ३१ हजार महिलांची वज्रमूठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 12:39 IST

गेल्या वर्षी जिल्ह्यातील १० तालुक्यातील महिला बचतगटांनी कृषीसेवा केंद्र सुरू केले. यातून वर्षभरात तब्बल साडे सहा कोटींची उलाढाल झाली.

ठळक मुद्देजिल्ह्यातील ३१ हजार महिलांनी वज्रमूठ बांधून तब्बल २१ कोटींची गंगाजळी निर्माण केली. त्यातून उद्योग थाटून वर्षभरात तब्बल ९१ कोटींचे उद्योग उभे केले. महिला बचत गटाच्या या क्रांतीने जिल्ह्याचे चित्र पालटून गेले.

रूपेश उत्तरवार।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महिला आर्थिक विकास महामंडळ, नागरी उपजिवीका अभियान व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून जिल्ह्यात महिला बचतगटांचा प्रवास सुरू झाला. गाव पातळीवर सर्व बचतगटांना एकत्र जोडण्याचे काम महिला आर्थिक विकास महामंडळ करीत आहे. या महिलांच्या बचतीतून मोठी बचत झाली. त्यातून बचतगट मोठ्या उद्योगांची निर्मिती करण्यास पुढे सरसावले. पहिला प्रयोग गतवर्षी यशस्वी झाला.गेल्यावर्षी जिल्ह्यातील १० तालुक्यातील महिला बचतगटांनी कृषीसेवा केंद्र सुरू केले. यातून वर्षभरात तब्बल साडे सहा कोटींची उलाढाल झाली. ना नफा-ना तोटा या तत्वावर सुरू झालेले या कृषीसेवा केंद्रांनी शेतकऱ्यांचीही आर्थिक बचत झाली. यामुळे यावर्षी आणखी काही कृषीसेवा केंद्र सुरू करण्यास महिला पुढे येण्याची शक्यता आहे. पशुसखीच्या माध्यमातून पशुधन वाढविण्यासाठी महिलांनी वाटचाल सुरू केली. शेळ्या, कोंबड्या, दुधाळ जनावरांचे उत्पादन वाढण्यास सुरूवात झाली. परिणामी पशुंचा मृत्यू दर २० टक्क्यांवरून पाच टक्क्यापर्यंत खाली आला.आधुनिक युगात महिला मागे पडू नये म्हणून त्यांना आता मोबाईल आणि इंटरनेट हाताळण्याचे तंत्रज्ञान शिकविले जात आहे. प्रशिक्षण घेतल्यानंतर याच महिला गावोगावी जाऊन इतर महिलांमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा प्रसार आणि प्रचार करणार आहे. यातून नवीन क्रांती घडण्याचे संकेत आहे.

महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून बचत गटांची चळवळ सक्षम झाली. त्यांना आवश्यक कौशल्य प्रदान करण्यासाठी प्रशिक्षण दिले जात आहे. यातून गावांचे चित्र बदलत आहे.- डॉ. रंजन वानखडेजिल्हा समन्वयक महिलाआर्थिक विकास महामंडळ

नॅशनल लॉयलीउड मिशन ते सीएमआरसी सेंटरमहाराष्ट्र जीवन्नोती अभियानाअंतर्गत नॅशनल लॉयलीउड मिशन काम करीत आहे. या मिशनच्या माध्यमातून गावांतील बचत गटांची बांधणी सुरू आहे. सोबतच बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंचे मार्केटींग करण्यासाठी यशस्वी प्रयत्न सुरू आहे. आर्थिक विकास महामंडळाकडून लोकसंचालित केंद्राची निर्मिती करण्यात आली. यातूनही महिला बचत गटांनी उत्पादीत केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळणार आहे. शहरी भागातील महिलांना संघटीत करण्यासाठी नागरी उपजीवीका अभियान राबविले जात असून स्लम एरियातील महिलांना एकत्रित करून महिलांचे संघटने उभे करण्याचे काम त्यांनी केले आहे.

ग्रामसभेत महिलांचा वरचष्मागावातील महिला ग्रामसभेत आपले प्रश्न मांडू लागल्या आहेत. आरोग्याच्या प्रश्नावर आशा स्वयंसेविका आणि आरोग्य उपकेंद्रातील डॉक्टरांकडून उपचार करून घेण्यासाठी त्या पुढे येत आहे. बचत गटांमुळे त्यांच्यात जागृती निर्माण झाली आहे. यातूनच त्यांच्या कलाकुसरीला वाव मिळत आहे. शिवणकला, पार्लर, मेंदी क्लास, रांगोळी, नृत्यकला, संगीत असे विविध केंद्र गावात उभे राहात आहे. सोबतच गावातील रस्ते, नाल्या, पिण्याचे पाणी, स्वस्तधान्यावर महिला बोलू लागल्या आहेत. स्वच्छता अभियानातही त्यांचा पुढाकार आहे. गोदरीमुक्त गाव आणि दारूबंदीसाठी महिला एकत्र येत आहे.

टॅग्स :Women's Day 2018महिला दिन २०१८Baimanoosबाईमाणूस