शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
2
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
3
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
4
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
5
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
6
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
7
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
8
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
9
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
10
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
11
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
12
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
13
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
14
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
15
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
16
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
17
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
18
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
19
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
20
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?

यवतमाळ जिल्ह्यातल्या ३१ हजार महिलांची वज्रमूठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 12:39 IST

गेल्या वर्षी जिल्ह्यातील १० तालुक्यातील महिला बचतगटांनी कृषीसेवा केंद्र सुरू केले. यातून वर्षभरात तब्बल साडे सहा कोटींची उलाढाल झाली.

ठळक मुद्देजिल्ह्यातील ३१ हजार महिलांनी वज्रमूठ बांधून तब्बल २१ कोटींची गंगाजळी निर्माण केली. त्यातून उद्योग थाटून वर्षभरात तब्बल ९१ कोटींचे उद्योग उभे केले. महिला बचत गटाच्या या क्रांतीने जिल्ह्याचे चित्र पालटून गेले.

रूपेश उत्तरवार।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महिला आर्थिक विकास महामंडळ, नागरी उपजिवीका अभियान व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून जिल्ह्यात महिला बचतगटांचा प्रवास सुरू झाला. गाव पातळीवर सर्व बचतगटांना एकत्र जोडण्याचे काम महिला आर्थिक विकास महामंडळ करीत आहे. या महिलांच्या बचतीतून मोठी बचत झाली. त्यातून बचतगट मोठ्या उद्योगांची निर्मिती करण्यास पुढे सरसावले. पहिला प्रयोग गतवर्षी यशस्वी झाला.गेल्यावर्षी जिल्ह्यातील १० तालुक्यातील महिला बचतगटांनी कृषीसेवा केंद्र सुरू केले. यातून वर्षभरात तब्बल साडे सहा कोटींची उलाढाल झाली. ना नफा-ना तोटा या तत्वावर सुरू झालेले या कृषीसेवा केंद्रांनी शेतकऱ्यांचीही आर्थिक बचत झाली. यामुळे यावर्षी आणखी काही कृषीसेवा केंद्र सुरू करण्यास महिला पुढे येण्याची शक्यता आहे. पशुसखीच्या माध्यमातून पशुधन वाढविण्यासाठी महिलांनी वाटचाल सुरू केली. शेळ्या, कोंबड्या, दुधाळ जनावरांचे उत्पादन वाढण्यास सुरूवात झाली. परिणामी पशुंचा मृत्यू दर २० टक्क्यांवरून पाच टक्क्यापर्यंत खाली आला.आधुनिक युगात महिला मागे पडू नये म्हणून त्यांना आता मोबाईल आणि इंटरनेट हाताळण्याचे तंत्रज्ञान शिकविले जात आहे. प्रशिक्षण घेतल्यानंतर याच महिला गावोगावी जाऊन इतर महिलांमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा प्रसार आणि प्रचार करणार आहे. यातून नवीन क्रांती घडण्याचे संकेत आहे.

महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून बचत गटांची चळवळ सक्षम झाली. त्यांना आवश्यक कौशल्य प्रदान करण्यासाठी प्रशिक्षण दिले जात आहे. यातून गावांचे चित्र बदलत आहे.- डॉ. रंजन वानखडेजिल्हा समन्वयक महिलाआर्थिक विकास महामंडळ

नॅशनल लॉयलीउड मिशन ते सीएमआरसी सेंटरमहाराष्ट्र जीवन्नोती अभियानाअंतर्गत नॅशनल लॉयलीउड मिशन काम करीत आहे. या मिशनच्या माध्यमातून गावांतील बचत गटांची बांधणी सुरू आहे. सोबतच बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंचे मार्केटींग करण्यासाठी यशस्वी प्रयत्न सुरू आहे. आर्थिक विकास महामंडळाकडून लोकसंचालित केंद्राची निर्मिती करण्यात आली. यातूनही महिला बचत गटांनी उत्पादीत केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळणार आहे. शहरी भागातील महिलांना संघटीत करण्यासाठी नागरी उपजीवीका अभियान राबविले जात असून स्लम एरियातील महिलांना एकत्रित करून महिलांचे संघटने उभे करण्याचे काम त्यांनी केले आहे.

ग्रामसभेत महिलांचा वरचष्मागावातील महिला ग्रामसभेत आपले प्रश्न मांडू लागल्या आहेत. आरोग्याच्या प्रश्नावर आशा स्वयंसेविका आणि आरोग्य उपकेंद्रातील डॉक्टरांकडून उपचार करून घेण्यासाठी त्या पुढे येत आहे. बचत गटांमुळे त्यांच्यात जागृती निर्माण झाली आहे. यातूनच त्यांच्या कलाकुसरीला वाव मिळत आहे. शिवणकला, पार्लर, मेंदी क्लास, रांगोळी, नृत्यकला, संगीत असे विविध केंद्र गावात उभे राहात आहे. सोबतच गावातील रस्ते, नाल्या, पिण्याचे पाणी, स्वस्तधान्यावर महिला बोलू लागल्या आहेत. स्वच्छता अभियानातही त्यांचा पुढाकार आहे. गोदरीमुक्त गाव आणि दारूबंदीसाठी महिला एकत्र येत आहे.

टॅग्स :Women's Day 2018महिला दिन २०१८Baimanoosबाईमाणूस