शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
2
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
3
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
4
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
5
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
6
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
7
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
8
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
10
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
11
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
12
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
13
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
14
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
15
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
16
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
17
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
18
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
19
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
20
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना संशयितांचे ३१ नमुने निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 05:00 IST

कोरोना संशयित आठ रुग्णांचे अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा कमालीची गतिमान झाली. भोसा रोडवरील ३८ नगर-कॉलन्यांचा परिसर सील करण्यात आला आहे. तेथे ८०० पोलीस व होमगार्डचा कडक पहारा आहे. हे आठ पॉझिटीव्ह नेमके कुणाकुणाच्या संपर्कात आले, त्यांचा शोध घेऊन त्यांना विलगीकरण कक्षात दाखल केले जात आहे. सध्या या कक्षातील संख्या १११ वर पोहोचली आहे.

ठळक मुद्देआणखी १५२ नमुने पाठविले : अहवालावर ठरणार यवतमाळच्या लॉकडाऊनचे भवितव्य

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोना संसर्गाच्या संशयावरून यवतमाळात दररोज नवनवे रुग्ण दाखल होत असून त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविले जात आहे. यापूर्वी पाठविलेल्या ७८ पैकी ३१ नमुन्यांचे अहवाल शुक्रवारी प्राप्त झाले असून ते निगेटीव्ह आल्याने आरोग्य यंत्रणेला व प्रशासनाला दिलासा मिळाला आहे.कोरोना संशयित आठ रुग्णांचे अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा कमालीची गतिमान झाली. भोसा रोडवरील ३८ नगर-कॉलन्यांचा परिसर सील करण्यात आला आहे. तेथे ८०० पोलीस व होमगार्डचा कडक पहारा आहे. हे आठ पॉझिटीव्ह नेमके कुणाकुणाच्या संपर्कात आले, त्यांचा शोध घेऊन त्यांना विलगीकरण कक्षात दाखल केले जात आहे. सध्या या कक्षातील संख्या १११ वर पोहोचली आहे. आणखी तब्बल १५२ जणांचे नमुने नागपूरला तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. या नमुन्यांचा अहवाल नेमका काय येतो यावर बरेच काही अवलंबून आहे. हे अहवाल निगेटीव्ह आल्यास यवतमाळचे लॉकडाऊन हटवायचे काय, कोणती दुकाने सुरू ठेवायची, त्याचा वेळ काय असावा याबाबतचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी ‘लोकमत’ला दिली. त्यामुळे या १५२ अहवालांकडे शासकीय यंत्रणेचे लक्ष लागले आहे.आठ पॉझिटीव्ह रुग्णांचा वावर राहिलेल्या व पोलिसांनी सध्या संपूर्ण परिसरच सील केलेल्या भागात घरोघरी सर्वेक्षण करून रक्ताचे नमुने घेतले जात आहे. टप्प्याटप्प्याने त्याची तपासणी केली जाणार आहे. त्या भागातील तब्बल ३० जणांना ताप असल्याची गंभीरबाब पुढे आली. प्रायोगिक तत्वावर त्यातील दहा जणांचे रक्त नमुने तपासणीसाठी घेतले जाणार आहे. दरम्यान कोरोनाची बाधा झालेल्या त्या आठ रुग्णांची प्रकृती उत्तम असून त्यांना यातून बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी उपचार केले जात असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.सोमवारपासून बँका सकाळी ८ वाजताजनधन खात्यातील ५०० रुपये काढण्यासाठी तमाम बँकांसमोर जिल्हाभर होणारी गर्दी टाळण्यासाठी आता सोमवारपासून बँका सकाळी ८ वाजतापासून सुरू होणार आहेत. दुपारी १२ पर्यंत बँकांचे कामकाज चालेल. पैसे काढणे, टाकणे, ट्रान्सफर करणे आणि बॅलन्स तपासणे एवढीच कामे या काळात होणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी ९ एप्रिल रोजी बँकांच्या सुधारित वेळांचा हा आदेश जारी केला. सध्या बँकांपुढे गर्दी होत असल्याने सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नाही. त्यामुळे कोरोना संसर्गाचा धोका वाढला आहे. त्यामुळे सावधगिरी म्हणून आणि नागरिकांचा कडाक्याच्या उन्हातील तासन्तास बँकेपुढे उभे राहण्याचा त्रास वाचविण्यासाठी बँका आता सकाळी ८ वाजतापासूनच उघडण्याचे आदेश देण्यात आले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या