शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
7
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
8
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
9
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
10
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
11
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
12
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
13
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
14
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
15
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
16
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
17
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
18
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
19
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
20
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!

कोरोना संशयितांचे ३१ नमुने निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 05:00 IST

कोरोना संशयित आठ रुग्णांचे अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा कमालीची गतिमान झाली. भोसा रोडवरील ३८ नगर-कॉलन्यांचा परिसर सील करण्यात आला आहे. तेथे ८०० पोलीस व होमगार्डचा कडक पहारा आहे. हे आठ पॉझिटीव्ह नेमके कुणाकुणाच्या संपर्कात आले, त्यांचा शोध घेऊन त्यांना विलगीकरण कक्षात दाखल केले जात आहे. सध्या या कक्षातील संख्या १११ वर पोहोचली आहे.

ठळक मुद्देआणखी १५२ नमुने पाठविले : अहवालावर ठरणार यवतमाळच्या लॉकडाऊनचे भवितव्य

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोना संसर्गाच्या संशयावरून यवतमाळात दररोज नवनवे रुग्ण दाखल होत असून त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविले जात आहे. यापूर्वी पाठविलेल्या ७८ पैकी ३१ नमुन्यांचे अहवाल शुक्रवारी प्राप्त झाले असून ते निगेटीव्ह आल्याने आरोग्य यंत्रणेला व प्रशासनाला दिलासा मिळाला आहे.कोरोना संशयित आठ रुग्णांचे अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा कमालीची गतिमान झाली. भोसा रोडवरील ३८ नगर-कॉलन्यांचा परिसर सील करण्यात आला आहे. तेथे ८०० पोलीस व होमगार्डचा कडक पहारा आहे. हे आठ पॉझिटीव्ह नेमके कुणाकुणाच्या संपर्कात आले, त्यांचा शोध घेऊन त्यांना विलगीकरण कक्षात दाखल केले जात आहे. सध्या या कक्षातील संख्या १११ वर पोहोचली आहे. आणखी तब्बल १५२ जणांचे नमुने नागपूरला तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. या नमुन्यांचा अहवाल नेमका काय येतो यावर बरेच काही अवलंबून आहे. हे अहवाल निगेटीव्ह आल्यास यवतमाळचे लॉकडाऊन हटवायचे काय, कोणती दुकाने सुरू ठेवायची, त्याचा वेळ काय असावा याबाबतचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी ‘लोकमत’ला दिली. त्यामुळे या १५२ अहवालांकडे शासकीय यंत्रणेचे लक्ष लागले आहे.आठ पॉझिटीव्ह रुग्णांचा वावर राहिलेल्या व पोलिसांनी सध्या संपूर्ण परिसरच सील केलेल्या भागात घरोघरी सर्वेक्षण करून रक्ताचे नमुने घेतले जात आहे. टप्प्याटप्प्याने त्याची तपासणी केली जाणार आहे. त्या भागातील तब्बल ३० जणांना ताप असल्याची गंभीरबाब पुढे आली. प्रायोगिक तत्वावर त्यातील दहा जणांचे रक्त नमुने तपासणीसाठी घेतले जाणार आहे. दरम्यान कोरोनाची बाधा झालेल्या त्या आठ रुग्णांची प्रकृती उत्तम असून त्यांना यातून बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी उपचार केले जात असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.सोमवारपासून बँका सकाळी ८ वाजताजनधन खात्यातील ५०० रुपये काढण्यासाठी तमाम बँकांसमोर जिल्हाभर होणारी गर्दी टाळण्यासाठी आता सोमवारपासून बँका सकाळी ८ वाजतापासून सुरू होणार आहेत. दुपारी १२ पर्यंत बँकांचे कामकाज चालेल. पैसे काढणे, टाकणे, ट्रान्सफर करणे आणि बॅलन्स तपासणे एवढीच कामे या काळात होणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी ९ एप्रिल रोजी बँकांच्या सुधारित वेळांचा हा आदेश जारी केला. सध्या बँकांपुढे गर्दी होत असल्याने सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नाही. त्यामुळे कोरोना संसर्गाचा धोका वाढला आहे. त्यामुळे सावधगिरी म्हणून आणि नागरिकांचा कडाक्याच्या उन्हातील तासन्तास बँकेपुढे उभे राहण्याचा त्रास वाचविण्यासाठी बँका आता सकाळी ८ वाजतापासूनच उघडण्याचे आदेश देण्यात आले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या