शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

चोरटे बँकेत अन् पोलीस रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2022 05:00 IST

बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये चार दिवसांपूर्वी चोरट्यांनी कपाटातून चार लाख ४० हजारांची रोख लंपास केली. त्यावेळी पोलिसांनी या चोरीबाबत अनेक प्रकारचा संशय व्यक्त केला. या घटनेचा छडा लागलाच नाही. विशेष म्हणजे बँकेने ज्या पत्र्याच्या कपाटात रोख ठेवली होती, त्यातील थोडीबहुत रक्कमच चोरट्यांनी नेली. पुन्हा रक्कम नेण्याच्या लालसेने पाच जण बँकेत शिरले. यावेळी त्यांनी खिडकी तोडून प्रवेश केला. सीसीटीव्हीमध्ये हे चोरटे स्पष्ट कैद झाले आहेत. मात्र चेहरा पूर्णपणे झाकला असल्याने त्यांची ओळख पटविणे शक्य नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरात चोरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. इंदिरा गांधी मार्केटमध्ये वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये दोन दिवसांत चारदा चोरटे शिरले. २० मेच्या रात्री पोलीस गस्तीचे वाहन बँकेच्या रस्त्यावर असताना चोरटे बँकेत रोख रक्कम शोधताना दिसून आले. संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. विशेष म्हणजे गस्तीवरच्या पोलिसांना आझाद मैदानाच्या प्रवेशद्वाराजवळ काही संशयित दिसतात. त्यांना हटकून पोलीस वाहन पुढे निघून गेले. नंतर चोरीचा प्रयत्न झाला. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये चार दिवसांपूर्वी चोरट्यांनी कपाटातून चार लाख ४० हजारांची रोख लंपास केली. त्यावेळी पोलिसांनी या चोरीबाबत अनेक प्रकारचा संशय व्यक्त केला. या घटनेचा छडा लागलाच नाही. विशेष म्हणजे बँकेने ज्या पत्र्याच्या कपाटात रोख ठेवली होती, त्यातील थोडीबहुत रक्कमच चोरट्यांनी नेली. पुन्हा रक्कम नेण्याच्या लालसेने पाच जण बँकेत शिरले. यावेळी त्यांनी खिडकी तोडून प्रवेश केला. सीसीटीव्हीमध्ये हे चोरटे स्पष्ट कैद झाले आहेत. मात्र चेहरा पूर्णपणे झाकला असल्याने त्यांची ओळख पटविणे शक्य नाही. दुसऱ्यांदा बँकेत आलेल्या चोरट्यांना हाती एक रुपयाही लागला नाही. त्यांना रिकाम्या हातानेच परत जावे लागले. २० मेच्या रात्री दोन वाजता पोलीस गस्तीचे वाहन आझाद मैदान प्रवेशद्वारावर आले. तेथे तीन ते चार जणांचे टोळके त्यांना दिसले. या टोळक्याला गस्तीवरील कर्मचाऱ्यांनी हटकले व वाहन पुढे निघून गेले. त्यानंतर पाच जण बँकेत शिरले. हे काही मिनिटांच्या अंतरानेच घडले. नंतर पोलीस गस्तीचे वाहन पुन्हा त्याच चौकात आले. त्यावेळी चोरटे बँकेत रोख रकमेचा शोध घेत होते. हा सर्व घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमेरामध्ये आला आहे. यातून पोलिसांच्या रात्रगस्तीचा फोलपणा उघड झाला आहे. रात्री २ वाजता संशयित दिसल्यानंतर त्यांना हटकून सोडून का दिले, हाही प्रश्न उपस्थित होत आहे. शहरात सातत्याने चोरीच्या घटना घडत असताना रात्रगस्त अशा पद्धतीने घातली जात असेल तर चोरट्यांचे फावणारच    आहे. 

सुरक्षेकडे बॅंक प्रशासनाचेही होतेय दुर्लक्ष- बँकेतून चार लाख ४० हजारांची रोख रक्कम चोरीस गेल्यानंतरही महाराष्ट्र बँकेच्या या शाखेतील सुरक्षेकडे दुर्लक्ष करण्यात आले. साधा चौकीदारही बँकेपुढे रात्रपाळीत ठेवण्यात आला नाही. त्यावरून बँकसुद्धा त्यांच्याकडे असलेल्या नागरिकांच्या रोख रकमेबाबत फारशी गंभीर नसल्याचे दिसून येते. 

टॅग्स :Thiefचोरbankबँक