शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

शेतकऱ्यांकडील कापसाचे सर्वेक्षण होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 05:00 IST

तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांनी बाजार समितीकडे आपला कापूस विक्रीसाठी नोंदणी केली आहे, अशा शेतकऱ्यांच्या घरी जावून अथवा ज्या ठिकाणी कापूस आहे त्याठिकाणी जावून नोंदणी केलेला कापूस उपलब्ध आहे काय, आदी बाबींचे सर्वेक्षण होणार आहे. बाजार समितीने नोंदविलेल्या यादीनुसार त्या-त्या गावात जावून कापसाचा साठा उपलब्ध असल्याचे सर्वेक्षण होईल.

ठळक मुद्देबाजार समितीमध्ये नोंदणी झालेल्यांची तपासणी, याद्या घेऊन फिरणार प्रतिनिधी

लोकमत न्यूज नेटवर्कराळेगाव : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळात कापूस विक्रीकरिता कृषी उत्पन्न बाजार समितीत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांकडे कापूस साठ्याचे शासकीय यंत्रणेकडून सर्वेक्षण केले जाणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीतील सूचनेनुसार हे सर्वेक्षण होणार आहे.तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांनी बाजार समितीकडे आपला कापूस विक्रीसाठी नोंदणी केली आहे, अशा शेतकऱ्यांच्या घरी जावून अथवा ज्या ठिकाणी कापूस आहे त्याठिकाणी जावून नोंदणी केलेला कापूस उपलब्ध आहे काय, आदी बाबींचे सर्वेक्षण होणार आहे. बाजार समितीने नोंदविलेल्या यादीनुसार त्या-त्या गावात जावून कापसाचा साठा उपलब्ध असल्याचे सर्वेक्षण होईल.कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रतिनिधी, गटसचिव किंवा सहायक निबंधक कार्यालयातील कर्मचारी सर्वेक्षण करतील. पंचनाम्यावर सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील, कृषी सहायक यापैकी एकाची सही घेतली जाणार आहे. तसे निर्देश जिल्हा उपनिबंधकांनी तालुका सहायक निबंधकांना दिले आहे.पंचनाम्यावर सहायक निबंधकांनी व्यक्तीश: एकत्रितपणे सदर सर्वेक्षणानुसार संबंधित शेतकऱ्याला आपला कापूस बाजार समिती अथवा जिनामध्ये नेण्याकरिता नियोजन करण्याचे सूचित करण्यात आले आहे. बाजार समितीमार्फत जिनिंगला वाहने पाठविण्याची व्यवस्था करण्याचे निर्देशित करण्यात आले आहे. या सर्वेक्षणामुळे तालुक्यात खळबळ माजली आहे. कापूस घरी शिल्लक नसतानाही नोंदी करून सीसीआयला विकू पाहणाऱ्या अनेकांचे धाबे दणाणले आहे.कापूस घरात पडूनअनेक शेतकऱ्यांच्या घरात कापूस पडून आहे. नोंदणी झालेली असतानाही खरेदी होत नसल्याने त्यांची चिंता वाढली आहे. दुसरीकडे आता बाजार समितीचे प्रतिनिधी तपासणी करणार असल्याने शेतकऱ्यांना स्वत:च्याच मालाविषयी उत्तरे द्यावी लागणार आहे. कापूस खरेदीची गती वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे, अशी अपेक्षा शेतकºयांना आहे.नोंदणी झालेल्या याद्या निबंधकांकडेबाजार समितीकडे नोंदणी झालेल्या याद्या सहायक निबंधकांनी त्यांच्या ताब्यात घेवून नियोजनाच्या प्रक्रियेस सुरुवात केली आहे. एकाच व्यक्तीचे नाव अनेकदा यादीमध्ये असल्यास छाननी करून एकच नाव ठेवण्यात यावे, इतर नोंदी रद्द कराव्या, असे आदेशात सुचविले आहे. यामुळे शेतकºयांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे.

टॅग्स :cottonकापूसcorona virusकोरोना वायरस बातम्या