शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

राष्ट्रीय महामार्गावरील अपघातात झाली मोठी घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 05:00 IST

यंदा मार्च महिन्याच्या अखेरीस राज्यात लॉकडाऊन लागू झाल्यानंतर तालुक्यात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यानंतर अनलॉकमध्येही नियम जास्त शिथिल न झाल्याने रस्त्यावरील वाहतुकही रोडावली आहे. शिवाय स्टंटबाजी करणाऱ्यावर अंकुश बसला आहे. तसेच रस्त्यांच्या बाजुला असलेली हॉटेल, बार कित्येक दिवस बंदच होती.

ठळक मुद्देलॉकडाऊन व संचारबंदीचा परिणाम । रस्त्यावरील वाहतुकही रोडावली, स्टंटबाजी करणाऱ्यांवर बसला अंकूश

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : पोलिसांचे प्रयत्न होऊनही नियंत्रणात न येणाऱ्या दुर्घटनांना लॉकडाऊन तसेच अनलॉकमध्ये आळा बसल्याचे दिसून येत आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा तालुक्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग तसेच राज्य मार्गावर अपघताची संख्या निम्म्यावर आली असून त्यात मृत्यू झालेल्यांची संख्या घटली आहे.यंदा मार्च महिन्याच्या अखेरीस राज्यात लॉकडाऊन लागू झाल्यानंतर तालुक्यात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यानंतर अनलॉकमध्येही नियम जास्त शिथिल न झाल्याने रस्त्यावरील वाहतुकही रोडावली आहे. शिवाय स्टंटबाजी करणाऱ्यावर अंकुश बसला आहे. तसेच रस्त्यांच्या बाजुला असलेली हॉटेल, बार कित्येक दिवस बंदच होती. याचाही परिणाम तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग तसेच राज्य मार्गावरील अपघातावर दिसून येत आहे. जानेवारी ते जून अखेरपर्यंत तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर पाच मोठे अपघात झाले. त्यात पाच जणांना आपले प्राण गमवावे लागले होते.इतर किरकोळ अपघतात सातजण जखमी झाले. मात्र मागील २०१९ मध्ये याच कालावधीचा अपघाताचा व मृत्यूची संख्या अधिक आहे.त्याचप्रमाणे राज्य मार्गावरील अपघाताचे तसेच मृत्यूचे प्रमाणही मागीलवर्षीच्या जानेवारी ते जून २०१९ च्या तुलनेत लॉकडाऊन व अनलॉकच्या काळात निम्म्यावर आले आहे.प्रतिवर्षी पावसाळा सुरू होताच अपघाताची मालिका सुरू होते. त्याला रस्त्यावर पडलेले खड्डेच कारणीभूत असतात. राष्ट्रीय महामार्ग तसेच राज्य मार्गावर केवळ रहदारी मर्यादीत असल्याने प्राणांतिक अथवा गंभीर अपघात घडले नाहीत.

टॅग्स :Accidentअपघात