शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं, आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
2
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
3
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
4
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
5
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
6
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
7
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
8
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
9
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
10
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
11
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
12
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
13
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
14
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
15
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
16
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
17
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
18
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
19
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
20
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक

निराधारांना तुटपुंज्या अनुदानात वाढ होण्याची अद्याप प्रतीक्षाच

By admin | Updated: August 9, 2015 00:13 IST

वृद्ध व निराधारांच्या अनुदानात वाढ करण्यात यावी, या मागणीसाठी अनेकदा संबंधित विभागाचे मंत्री, सचिव, जिल्हाधिकारी आणि लोकप्रतिनिधींकडे अर्ज, ...

निराधार संतप्त : मंत्री, सचिवांकडे अनेकदा तक्रारी करूनही दुर्लक्षनरेश मानकर पांढरकवडावृद्ध व निराधारांच्या अनुदानात वाढ करण्यात यावी, या मागणीसाठी अनेकदा संबंधित विभागाचे मंत्री, सचिव, जिल्हाधिकारी आणि लोकप्रतिनिधींकडे अर्ज, विनंत्या करूनही ही रास्त मागणी अद्याप पूर्ण झाली नाही़ त्यामुळे ही मागणी पूर्ण होणार तरी कधी, असा संतप्त सवाल वृद्ध व निराधारांनी उपस्थित केला आहे़राज्यात काँग्रेस-राकाँ आघाडीचे सरकार जाऊन भाजपा-शिवसेना युतीचे शासन आले़ तथापि वृद्ध व निराधारांना मिळणाऱ्या अनुदानात कोणतीच वाढ झाली नाही़ त्यामुळे वृद्ध व निराधारांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे़ श्रावण बाळ, राष्ट्रीय वृद्धापकाळ योजनेअंतर्गत सन २००८ पासून वृद्धांना केवळ ६०० रूपये एवढेच अनुदान देण्यात येत आहे. वाढत्या महागाईमुळे सध्याचे मिळणारे अनुदान हे अतिशय तोकडे आहे. त्यामुळे या अनुदानात वाढ करून ते अनुदान एक हजार रूपये करण्यात यावे, अशी बऱ्याच दिवसांपासून मागणी आहे़श्रावणबाळ, राष्ट्रीय वृद्धापकाळ, संजय गांधी निराधार अनुदान योजनेत ज्या व्यक्तीच्या कुटुंबांचे स्थावर, जंगम मालमत्तेपासून मिळणारे उत्पन्न व सज्ञान मुलाकडून मिळत असलेली आर्थिक मदत, असे वार्षिक उत्पन्न एकत्र करून २१ हजार रूपयांच्या आत उत्पन्न असलेल्या व्यक्तीस निराधार समजण्यात येते. वास्तविक पाहता आजच्या काळात रोजमजुरी करणाऱ्या कुटुंबाचे उत्पन्नदेखील २१ हजारांच्यावर आहे. त्यामुळे २१ हजारांच्या आतील उत्पन्नाचा दाखला तहसीलदारांकडून मिळत नाही. यामुळे अनेक वृद्ध, निराधार, भूमीहिन, गोरगरीब, रोजमजूर या योजनेपासून वंचित आहे. अशांना या योजनेचा लाभ मिळण्यासाठी उत्पन्नाची मर्यादा वाढवून त्यांना दिलासा देणे आवश्यक झाले आहे़ दारिद्र्य रेषेखाली जीवन जगणाऱ्या व आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या तालुक्यातील अनेक वृद्ध निराधारांची स्थिती अतिशय बिकट असून त्यांना मदत करणे अतिशय आवश्यक झाले आहे.६०० रूपयांत जगायचे तरी कसे ?वृद्ध निराधारांच्या वाढत्या वयामुळे त्यांना रोजमजुरी करणे शक्य होत नाही. अनेक वृद्ध व निराधारांची मुले त्यांचे पालन पोषण करीत नसल्यामुळे त्यांना शासकीय अनुदानावरच अवलंबून राहावे लागते. मात्र मिळणारे ६०० रूपये शासकीय अनुदान हे अतिशय तोकडे आहे. त्यांना मिळणाऱ्या ६०० रूपये अनुदानात त्यांचा उदरनिर्वाह होणे शक्य नाही. त्यामुळे या ६०० रूपयांत महिनाभर जगायचे तरी कसे, असा प्रश्न वृद्धांसमोर उभा ठाकला आहे.