शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा आहे, तर सोडत का नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 22:14 IST

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा आहे. उपरोक्त छायाचित्रांमधून त्याचे पुरावे मिळत आहे. परंतु त्यानंतरही जीवन प्राधिकरण यवतमाळ शहराला नियमित व पूर्ण दाबाने पाण्याचा पुरवठा करीत नाही.

ठळक मुद्देसंतप्त यवतमाळकरांचा सवाल : नियोजनाच्या नावाखाली महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची कृत्रिम पाणीटंचाई

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा आहे. उपरोक्त छायाचित्रांमधून त्याचे पुरावे मिळत आहे. परंतु त्यानंतरही जीवन प्राधिकरण यवतमाळ शहराला नियमित व पूर्ण दाबाने पाण्याचा पुरवठा करीत नाही. नियोजनाच्या नावाखाली प्राधिकरण शहरात खुलेआम कृत्रिम पाणीटंचाई निर्माण करीत असल्याचे स्पष्ट होते. त्याचा फटका सामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे.यवतमाळ शहराच्या सभोवतालीच नव्हेतर मध्यभागातसुद्धा नागरिक भीषण पाणीटंचाईचा सामना करीत आहे. कुठे आठवड्यातून एक दिवस तर कुठे दहा-बारा दिवसातून एक दिवस पाणी मिळते आहे. तेही पूर्ण दाबाने मिळत नाही. पाणी भरणे होण्यापूर्वीच नळ निघून जातात, अशी स्थिती आहे. एक तर रात्री-बेरात्री नळ येतात. त्यात आठवड्यातून एकदा पाणी येत असल्याने साठवणूक करायची कशी, याचा प्रश्न शहरवासीयांपुढे निर्माण झाला आहे. धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा दिसत असताना प्राधिकरण आठवड्यातून किमान दोन दिवस नळ का सोडत नाही, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.शहर व जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणाºया सत्ताधारी राजकीय नेत्यांनी प्राधिकरणाकडून तत्काळ पाणीपुरवठ्याच्या स्थितीचा लेखाजोगा घेऊन त्यांना नियमित पाणीपुरवठ्याचे निर्देश द्यावे, बेंबळाचे पाणी नेमके केव्हापर्यंत मिळेल, त्यात खरोखरच काय अडचणी आहे, हेसुद्धा माध्यमांपुढे येऊन जाहीर करावे, अशी शहरवासीयांची मागणी आहे. मुबलक पाणी असूनही नागरिकांना कृत्रिम टंचाईचा सामना करायला लावणाऱ्या, नागरिकांचे फोन न उचलणाºया प्राधिकरण अभियंत्यांवर कारवाईची मागणी आहे.अमृत योजनेतील बेंबळाच्या पाण्याबाबत कुणीच अधिकृत बोले नायवतमाळ शहराच्या दृष्टीने अमृत योजना महत्त्वाची आहे. या योजनेंतर्गत बेंबळा प्रकल्पावरून शहरासाठी पाणी आणले जाणार आहे. परंतु या योजनेला निकृष्टतेचे ग्रहण लागले. पर्यायाने आॅक्टोबर-२०१९ ही योजनेची डेडलाईन तोंडावर येऊनही अद्याप कामाचा थांगपत्ता नाही. राजकीय दबावात जीवन प्राधिकरणाचे अभियंते लवकरच शहराला बेंबळाचे पाणी मिळेल, असे सांगतात. परंतु तारीख सांगत नाही. विशेष असे, हेच अभियंते खासगीत मात्र योजनेचे काही खरे नाही, असे बोलताना दिसतात. अमृत योजनेची नेमकी स्थिती काय आहे, याबाबत अधिकृतपणे कुणीच समोर येऊन काही सांगण्यास तयार नाही. प्राधिकरणाचे अभियंतेही माध्यमांशी बोलताना ‘आॅफ द रेकॉर्ड’ हा शब्द वापरूनच पुढे बोलतात. राजकीय स्तरावरून सत्ताधारी पक्षाच्या नेते-पदाधिकाऱ्यांनी अद्याप तरी अमृत योजनेची सद्यस्थिती जाहीररित्या सांगण्याइतपत हिमत जुळविलेली दिसत नाही. जाहीर आवाहन करूनही कुणीच काही बोलत नसल्याने अखेर शहरातून १० मे रोजी आंदोलनाची तयारी केली जात आहे. पोलीस व गुप्तचर यंत्रणा या संभाव्य आंदोलनाच्या दृष्टीने ‘अलर्ट’ झाली आहे. संभाव्य आंदोलन हाणून पाडण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. त्याचवेळी राजकीय नेत्यांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या या यंत्रणेने ‘गनिमी काव्याने’ तर आंदोलन होणार नाही ना, याचा चांगलाच धसका घेतल्याचे दिसते. ही यंत्रणा आंदोलनाची घोषणा करणाºयांवर सातत्याने वॉच ठेऊन आहे. आता पोलिसांच्या सतर्कतेनंतरही आंदोलन होते काय अन् जनता त्यात सहभाग घेते काय याकडे नजरा लागल्या आहेत.प्राधिकरण अभियंत्यांचा कॉलला ‘नो रिस्पॉन्स’अमृत योजनेची नेमकी स्थिती काय, धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा दिसत असताना तो नियमित सोडला का जात नाही, नेमक्या काय अडचणी आहे, हे जाणून घेण्यासाठी ‘लोकमत’ने जीवन प्राधिकरणाच्या अभियंत्यांना ‘कॉल’ केला. मात्र प्रश्नांना उत्तरे द्यावी लागेल, या भीतीने त्यांनी तो ‘रिसिव्ह’ केला नाही. जनतेला तर प्रत्यक्ष जाऊनही अभियंत्यांचे दर्शन होत नाही.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई