शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

१८ वर्षांपासून पुनर्वसन नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 21:31 IST

महागाव तालुक्यातील अमडापूर प्रकल्पा अंतर्गत कुरळी गाव येते. या गावाचे गत १८ वर्षांपासून पुनर्वसनच झाले नाही. यामुळे गावकरी चिंतेत सापडले आहेत. हा प्रश्न निकाली निघावा म्हणून अमडापूर प्रकल्पग्रस्तांनी यवतमाळात बेमुदत उपोषण सुरू केले आहे. ऐच्छिक पुनर्वसनाची मागणी केली आहे.

ठळक मुद्देअमडापूर प्रकल्पग्रस्त : अखेर यवतमाळात बेमुदत उपोषण

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महागाव तालुक्यातील अमडापूर प्रकल्पा अंतर्गत कुरळी गाव येते. या गावाचे गत १८ वर्षांपासून पुनर्वसनच झाले नाही. यामुळे गावकरी चिंतेत सापडले आहेत. हा प्रश्न निकाली निघावा म्हणून अमडापूर प्रकल्पग्रस्तांनी यवतमाळात बेमुदत उपोषण सुरू केले आहे. ऐच्छिक पुनर्वसनाची मागणी केली आहे.स्थानिक तिरंगा चौकामध्ये अमडापूर प्रकल्पग्रस्तांनी बेमुदत उपोषणाला सुरूवात केली आहे. या प्रकल्पामध्ये ७७ टक्के जमीन संपादित करण्यात आली आहे. त्यावर प्रकल्प उभारण्यात आला आहे. या ठिकाणच्या ग्रामस्थांचे १८ वर्षांपासून पुनर्वसनच झाले नाही. २१ नागरी सुविधांच्या खर्चासह प्रस्ताव तयार करण्यात यावा. ३४० घरांचे ऐच्छिक पुनर्वसन करण्यात यावे. प्रकल्पग्रस्त सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीत सामावून घेण्यात यावे. पुनर्वसित संपादित जमिनीचा दर पाचपट लावण्यात यावा. शेतीला रस्ता उपलब्ध करून देण्यात यावा. यासह विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आले. या आंदोलनात १५० आंदोलक सहभागी झाले आहेत.यामध्ये भोजूसिंग चव्हाण, रामेश्वर पाटील, गौतम पाटील, लक्ष्मण कटेवाड, आत्माराम जाधव, विश्वनाथ बेले, शिवाजी भुसाळे, मधुकर बोईनवाड, शोभा गजेलवाड, निर्जला इंगोले, पंचफुला आटागडे आदींचा समावेश आहे.