शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
3
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
4
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
5
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
6
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
7
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
8
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
9
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
10
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
11
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
12
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
13
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
14
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
15
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
16
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
17
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
18
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
19
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
20
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी

शाळेत शिपाई नाही, तर पाणी कोण भरणार, झाडू कोण मारणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 12:07 IST

Yawatmal News अनुदानित शाळांमधीला शिपाई पद व्यपगत करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याऐवजी आता शाळांना शिपाई भत्ता दिला जाणार आहे. मात्र शाळेत शिपाईच नसेल तर शाळेतील स्वच्छतेची व इतर किरकोळ कामे कोण करणार असा प्रश्ना शाळा प्रशासनाला पडला आहे.

ठळक मुद्देशिपाई कालबाह्य झाल्याचा परिणाम

 लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : अनुदानित शाळांमधीला शिपाई पद व्यपगत करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याऐवजी आता शाळांना शिपाई भत्ता दिला जाणार आहे. मात्र शाळेत शिपाईच नसेल तर शाळेतील स्वच्छतेची व इतर किरकोळ कामे कोण करणार असा प्रश्ना शाळा प्रशासनाला पडला आहे. माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये ही कामे शिक्षक किंवा प्राध्यापक मंडळी करतील का, हा मोठा पेच पुढे आला आहे.

सध्या जे शिपाई कार्यरत आहे, ते त्यांच्या सेवानिवृत्तीपर्यंत कार्यरत राहणार आहेत. मात्र ते निवृत्त झाल्यानंतर संबंधित पद भरण्यावर शासनाने बंदी आणली आहे. यापुढे शिपाई नेमण्यऐवजीा शाळेला भत्ता दिला जाणार आहे. त्यातून स्वच्छतेची कामे भागविली जावी, अशी अपेक्षा आहे. मात्र हा भत्ता शाळेतील विद्यार्थी संख्येवर अवलंबून राहणार आहे. ५०० पटसंख्या असल्यास शाळेला ५ हजार रुपयांचा शिपाई भत्ता दिला जाणार आहे. त्यापेक्षा कमी विद्यार्थी असल्यास भत्त्याची रक्कमही कमी होणार आहे. यवतमाळ शहर सोडल्यास जिल्ह्यात बहुतांश तालुका पातळीवरील व ग्रामीण भागातील शाळांमध्ये पटसंख्या कमी आहे. त्यामुळे तुटपुंजा भत्त्यासाठी कंत्राटी पद्धतीने शिपाई म्हणून काम करण्यास कोणी तयार होणार की नाही, असा पेच संस्थाचालकांपुढे निर्माण झाला आहे.

यापुढे शाळांना शिपाई भत्ता दिला जाणार आहे. त्याची तरतूद वरिष्ठ कार्यालयातून होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शाळांकडून शिपाई भत्त्यासाठी प्रस्ताव मागविले आहेत. परंतु, बहुतांश शाळांकडून प्रतिसाद मिळालेला नाही. प्रस्ताव न पाठविल्यास अशा शाळा भत्त्यापासून वंचित राहतील.

- दीपक चवणे, शिक्षणाधिकारी

शासनाचा हा निर्णय शाळेतील लहान कर्मचाऱ्यावर अन्याय करणारा आहे. शाळेतील आता इतर कामे कोण करणार? असा व्यवस्थापनापुढे प्रश्न निर्माण होणार आहे. कनिष्ठ महाविद्यालयात शिपाई नसेल तर स्वच्छता, पाण्याची व्यवस्था, शाळा उघडणे, बंद करणे ही कामे कोण करणार? शिपाई कंत्राटी पद्धतीने नेमल्यास तो अनेक कामांसाठी जबाबदार राहणार नाही. आपण शिपायाच्या हाती महत्त्वाची कागदपत्रे, शाळेच्या चाव्या देत असतो. पण कंत्राटी माणसावर असा विश्वास टाकणे शक्य होणार नाही. खरे सांगायचे तर सरकारला आता कर्मचाऱ्यांना पगार देणे जीवावर येत आहे. म्हणूनच असे निर्णय घेतले जात आहेत.

- विनोद गाणार, संस्था अध्यक्ष, फुले आंबेडकर प्रबोधन प्रतिष्ठान, मारेगाव

केवळ ५० प्रस्ताव

१) जिल्ह्यात आठवी ते दहावीचे वर्ग असलेल्या जवळपास ३६२ अनुदानित शाळा आहेत. तर पाचवी ते बारावीपर्यंत वर्ग असलेल्या शाळांची संख्या यात जोडल्यास अनुदानित शाळांची संख्या सातशेपर्यंत आहे.

२) अशा अनुदानित शाळांमध्ये किती शिपाइ कार्यरत आहे, किती पदे रिक्त आहेत, अशा संस्थांना किती भत्ता द्यावा लागेल अशा माहितीचे प्रस्ताव शिक्षणाधिकारी कार्यालयाने मागविले आहेत.

३) मात्र प्रस्ताव पाठविण्याची २८ फेब्रुवारी ही मुदत संपून गेल्यावरही बहुतांश शाळांनी प्रस्ताव पाठविलेले नाहीत. फार तर ५० शाळांचे प्रस्ताव शिक्षणाधिकारी कार्यालयात आले आहेत, असे शिक्षण विभागातून सांगण्यात आले. त्यामुळे आता पुन्हा एकदा शाळांना पत्र पाठविण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.

टॅग्स :Schoolशाळा