शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

शाळेत शिपाई नाही, तर पाणी कोण भरणार, झाडू कोण मारणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 12:07 IST

Yawatmal News अनुदानित शाळांमधीला शिपाई पद व्यपगत करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याऐवजी आता शाळांना शिपाई भत्ता दिला जाणार आहे. मात्र शाळेत शिपाईच नसेल तर शाळेतील स्वच्छतेची व इतर किरकोळ कामे कोण करणार असा प्रश्ना शाळा प्रशासनाला पडला आहे.

ठळक मुद्देशिपाई कालबाह्य झाल्याचा परिणाम

 लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : अनुदानित शाळांमधीला शिपाई पद व्यपगत करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याऐवजी आता शाळांना शिपाई भत्ता दिला जाणार आहे. मात्र शाळेत शिपाईच नसेल तर शाळेतील स्वच्छतेची व इतर किरकोळ कामे कोण करणार असा प्रश्ना शाळा प्रशासनाला पडला आहे. माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये ही कामे शिक्षक किंवा प्राध्यापक मंडळी करतील का, हा मोठा पेच पुढे आला आहे.

सध्या जे शिपाई कार्यरत आहे, ते त्यांच्या सेवानिवृत्तीपर्यंत कार्यरत राहणार आहेत. मात्र ते निवृत्त झाल्यानंतर संबंधित पद भरण्यावर शासनाने बंदी आणली आहे. यापुढे शिपाई नेमण्यऐवजीा शाळेला भत्ता दिला जाणार आहे. त्यातून स्वच्छतेची कामे भागविली जावी, अशी अपेक्षा आहे. मात्र हा भत्ता शाळेतील विद्यार्थी संख्येवर अवलंबून राहणार आहे. ५०० पटसंख्या असल्यास शाळेला ५ हजार रुपयांचा शिपाई भत्ता दिला जाणार आहे. त्यापेक्षा कमी विद्यार्थी असल्यास भत्त्याची रक्कमही कमी होणार आहे. यवतमाळ शहर सोडल्यास जिल्ह्यात बहुतांश तालुका पातळीवरील व ग्रामीण भागातील शाळांमध्ये पटसंख्या कमी आहे. त्यामुळे तुटपुंजा भत्त्यासाठी कंत्राटी पद्धतीने शिपाई म्हणून काम करण्यास कोणी तयार होणार की नाही, असा पेच संस्थाचालकांपुढे निर्माण झाला आहे.

यापुढे शाळांना शिपाई भत्ता दिला जाणार आहे. त्याची तरतूद वरिष्ठ कार्यालयातून होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शाळांकडून शिपाई भत्त्यासाठी प्रस्ताव मागविले आहेत. परंतु, बहुतांश शाळांकडून प्रतिसाद मिळालेला नाही. प्रस्ताव न पाठविल्यास अशा शाळा भत्त्यापासून वंचित राहतील.

- दीपक चवणे, शिक्षणाधिकारी

शासनाचा हा निर्णय शाळेतील लहान कर्मचाऱ्यावर अन्याय करणारा आहे. शाळेतील आता इतर कामे कोण करणार? असा व्यवस्थापनापुढे प्रश्न निर्माण होणार आहे. कनिष्ठ महाविद्यालयात शिपाई नसेल तर स्वच्छता, पाण्याची व्यवस्था, शाळा उघडणे, बंद करणे ही कामे कोण करणार? शिपाई कंत्राटी पद्धतीने नेमल्यास तो अनेक कामांसाठी जबाबदार राहणार नाही. आपण शिपायाच्या हाती महत्त्वाची कागदपत्रे, शाळेच्या चाव्या देत असतो. पण कंत्राटी माणसावर असा विश्वास टाकणे शक्य होणार नाही. खरे सांगायचे तर सरकारला आता कर्मचाऱ्यांना पगार देणे जीवावर येत आहे. म्हणूनच असे निर्णय घेतले जात आहेत.

- विनोद गाणार, संस्था अध्यक्ष, फुले आंबेडकर प्रबोधन प्रतिष्ठान, मारेगाव

केवळ ५० प्रस्ताव

१) जिल्ह्यात आठवी ते दहावीचे वर्ग असलेल्या जवळपास ३६२ अनुदानित शाळा आहेत. तर पाचवी ते बारावीपर्यंत वर्ग असलेल्या शाळांची संख्या यात जोडल्यास अनुदानित शाळांची संख्या सातशेपर्यंत आहे.

२) अशा अनुदानित शाळांमध्ये किती शिपाइ कार्यरत आहे, किती पदे रिक्त आहेत, अशा संस्थांना किती भत्ता द्यावा लागेल अशा माहितीचे प्रस्ताव शिक्षणाधिकारी कार्यालयाने मागविले आहेत.

३) मात्र प्रस्ताव पाठविण्याची २८ फेब्रुवारी ही मुदत संपून गेल्यावरही बहुतांश शाळांनी प्रस्ताव पाठविलेले नाहीत. फार तर ५० शाळांचे प्रस्ताव शिक्षणाधिकारी कार्यालयात आले आहेत, असे शिक्षण विभागातून सांगण्यात आले. त्यामुळे आता पुन्हा एकदा शाळांना पत्र पाठविण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.

टॅग्स :Schoolशाळा