शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
3
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
4
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
5
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
6
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
7
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
8
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
9
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
10
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
11
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
12
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
13
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
14
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
15
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
16
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
17
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
18
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
19
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

दोन घासांची सोय नाही.. म्हणे गणवेश आधी घ्या बाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 02:14 IST

राहायला जागा नाही.. झोपडी दुसºयाच्या जागेवर आहे. त्यात विधवा आई अन् सहा चिल्यापिल्यांचा पोटभर जेवणाचा वांदा आहे.

ठळक मुद्देझोपडीतल्या चिल्यापिल्यांची त्रस्त आई : अर्धपोटी निजणाºयांच्या शिक्षणाची दुरवस्था उघड

संजय हनवते ।लोकमत न्यूज नेटवर्कहर्षी (पुसद) : राहायला जागा नाही.. झोपडी दुसºयाच्या जागेवर आहे. त्यात विधवा आई अन् सहा चिल्यापिल्यांचा पोटभर जेवणाचा वांदा आहे. आईला मजुरी मिळाली तर ठिक; नाहीतर उपवास ठरलेला. मुलांना दरवर्षी शाळेतून गणवेश मिळायचा. यंदा आधी स्वत: गणवेश घ्या, मग सरकार पैसे देईल, असा उफराटा निर्णय झाला. अन् झोपडीतल्या आईला रोजच्या उपवासासोबत मुलांच्या काळजीने घेरले आहे.पुसद तालुक्यातील हर्षी येथील गंगाबाई शेषराव काळे या आईच्या पुढे शिक्षण विभागाने पेच निर्माण केला आहे. पण प्रश्न केवळ मुलांच्या गणवेशाचाच नाही, जगण्याचा आहे. मागच्या वर्षी पतीच्या अपघाती जाण्याने या कुटुंबातले सुखही कायमचे निघून गेले. पती शेषराव काळे २० एप्रिल २०१६ रोजी दुचाकीवर पुसदला जात असताना अपघात झाला. दोन दुचाकींची समारोसमोर धडक झाली. यात दोन्ही वाहनांवरील सात जणांचा मृत्यू झाला. त्यात शेषरावचाही बळी गेला. त्यांच्या मागे ८ मुली, १ मुलगा आहे. त्यांची जबाबदारी आता पत्नी गंगाबाईवर आहे. तीन मुलींचा विवाह आटोपला. आता ५ मुली आणि मुलाच्या पालनपोषणासाठी रोजमजुरी करण्याशिवाय गंगाबाईला पर्याय नाही. काम मिळाले नाही, तर उपाशीपोटी निजावे लागते.मोठी मुलगी संजना सहावीत तर दिव्या पाचवीत शिकत आहे. इतर तीन भावंडं हर्षीच्या जिल्हा परिषद शाळेत आहेत. शाळा सुरू होऊन दीड महिना लोटला पण त्यांना गणवेशच नाही. घरच्या फाटक्या वेशात ते शाळेत जातात.दरवर्षीप्रमाणे यंदाही शाळेतूनच मोफत गणवेश मिळेल ही आशा सरकारने फोल ठरविली. नव्या निर्णयानुसार, आधी गंगाबाईलाच मुला-मुलींना गणवेश घेऊन द्यावा लागणार आहे. खरेदीच्या पावत्या दाखवल्यावरच शाळेतून पैसे मिळणार आहेत. सहा लेकरांच्या पोटात दोन घास टाकण्याचेच वांदे असताना गणवेशासाठी २४०० रुपये कसे गोळा करणार, हा प्रश्न गंगाबाईपुढे उभा आहे. त्यातही गणवेशाचे पैसे मिळविण्यासाठी सहा मुलांचे सहा बँक खाते हवे. प्रत्येक खाते उघडण्यासाठी ५०० रुपये बँकेत जमा ठेवावे लागणार आहे. अशा अवस्थेत गंगाबाईच्या मुला-मुलींच्या शिक्षणाचे त्रांगडे होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.संजनाला शिकून अधिकारी व्हायचे आहे. तर दिव्याचा देशासाठी काहीतरी करण्याचा निश्चय आहे. शिक्षण विभागाने गंगाबाई काळे यांच्या अपत्यांसाठी माणूसकी दाखवून गणवेशाचे पैसे त्यांना द्यावे, अशी मागणी हर्षीवासीयांकडून करण्यात आली आहे.मदत नाही, पेन्शन नाही.. विमाही दूरचपतीचा मृत्यू झाल्यानंतर गंगाबाईला कोणतीही शासकीय मदत मिळाली नाही. विधवा पेन्शनही अद्याप सुरू झालेले नाही. कुटुंबप्रमुख गेल्यावर मिळणारी अनुदान रक्कमही मिळाली नाही. मोटार विमा दावा करण्यासाठी एका इसमाकडून खोडा घातला गेला. विम्याच्या प्रक्रियेपासून गंगाबाईला दूरच ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. राहायला घर नाही, जगायला काम नाही... उद्याचे भविष्य घडविण्यासाठी केवळ पोटच्या पोरांवरच गंगाबाईच्या आशा आहेत.