शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
4
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
5
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
6
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
7
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
8
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
9
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
10
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
11
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
12
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
13
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
14
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
15
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
16
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
17
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
18
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
19
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
20
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात चारा टंचाईचा धोका नाही

By admin | Updated: May 5, 2016 02:37 IST

यावर्षी जिल्ह्यात भिषण दुष्काळी परिस्थिती असली तरी पशुपालकांना दिलासादायक बाब म्हणजे जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार २५ जुलै २०१६ पर्यंत पशुंसाठीच्या चाऱ्याची टंचाई भासणार नाही.

शासनाचा अंदाज : चारा डेपोची अद्याप मागणी नाही, पशुसंवर्धन विभागाची माहितीयवतमाळ : यावर्षी जिल्ह्यात भिषण दुष्काळी परिस्थिती असली तरी पशुपालकांना दिलासादायक बाब म्हणजे जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार २५ जुलै २०१६ पर्यंत पशुंसाठीच्या चाऱ्याची टंचाई भासणार नाही. त्यामुळे यावर्षी सध्या तरी चारा डेपोची मागणी नसल्याचे जिल्हा पशुसंवर्धन कार्यालयाकडून सांगण्यात आले. दुष्काळी परिस्थितीत जनावरांना चारा आणि पाणी पुरविणे हे पशुपालकांसमोर मोठे आव्हान असते. परंतु जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या माहितीनुसार यावर्षी सध्यातरी जिल्ह्यात कुठेही चाराटंचाई नाही. चाऱ्याच्या तुलनेत पशुंसाठी पाण्याची मात्र मागणी आहे. जनावरांना किमान पिण्यासाठी पाणी मिळावे, यासाठी पशुपालकांची चांगलीच कसरत सुरू आहे. पशुंच्या चाऱ्याच्या अनुषंगाने पशुसंवर्धन विभागाकडून १ आॅगस्ट ते ३० जुलै असे एक वर्ष समजण्यात येते. मृगाच्या पावसानंतर एक महिन्यात साधारणत: नवीन चाऱ्याचे उत्पादन येते. यावर्षी तसे न झाल्यास शेवटचे पाच-सहा दिवस मात्र चाऱ्याबाबत गोंधळ निर्माण होऊ शकते. अन्यथा सर्वकाही सामान्य राहिल्यास आणि वेळेवर पाऊस आल्यास चाराटंचाई जाणवणार नसल्याचे पशुसंवर्धनकडून सांगण्यात आले. याबाबत नुकतीच एक बैठक घेण्यात येऊन आढावा घेण्यात आला. या बैठकीत पंचायत समिती, महसूल तसेच पशुसंर्वन विभागाकडे जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यातून चारा डेपोची मागणी नसल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. डी. बी. सोनकुसळे यांनी दिली. मागील वर्षी फारसे समाधानकारक पीक झाले नसले तरी पिकांची ग्रोथ चांगली होती, त्यामुळे चाऱ्याचे बऱ्यापैकी उत्पादन झाले होते. आता हा चारा कामी पडत आहे. जिल्ह्यातील वार्षिक चारा उत्पादनावर नजर टाकली असता जंगल अधिक पडिक जमीन असे एकूण साडेचार हजार हेक्टर चाऱ्याचे उत्पादन होते. एका हेक्टरपासून एक मेट्रिक टन चारा मिळतो. याशिवाय शेतकरी स्वत: आपल्या शेतात जे पीक घेतात त्यातूनही मोठ्या प्रमाणात चाऱ्याचे उत्पादन होते. या सर्व चाऱ्याचा उपयोग जिल्ह्यातील लाखोंच्या संख्येने असलेल्या पशुंच्या वर्षभराच्या संगोपनासाठी केला जातो. (प्रतिनिधी)