शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

जिल्ह्यात चारा टंचाईचा धोका नाही

By admin | Updated: May 5, 2016 02:37 IST

यावर्षी जिल्ह्यात भिषण दुष्काळी परिस्थिती असली तरी पशुपालकांना दिलासादायक बाब म्हणजे जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार २५ जुलै २०१६ पर्यंत पशुंसाठीच्या चाऱ्याची टंचाई भासणार नाही.

शासनाचा अंदाज : चारा डेपोची अद्याप मागणी नाही, पशुसंवर्धन विभागाची माहितीयवतमाळ : यावर्षी जिल्ह्यात भिषण दुष्काळी परिस्थिती असली तरी पशुपालकांना दिलासादायक बाब म्हणजे जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार २५ जुलै २०१६ पर्यंत पशुंसाठीच्या चाऱ्याची टंचाई भासणार नाही. त्यामुळे यावर्षी सध्या तरी चारा डेपोची मागणी नसल्याचे जिल्हा पशुसंवर्धन कार्यालयाकडून सांगण्यात आले. दुष्काळी परिस्थितीत जनावरांना चारा आणि पाणी पुरविणे हे पशुपालकांसमोर मोठे आव्हान असते. परंतु जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या माहितीनुसार यावर्षी सध्यातरी जिल्ह्यात कुठेही चाराटंचाई नाही. चाऱ्याच्या तुलनेत पशुंसाठी पाण्याची मात्र मागणी आहे. जनावरांना किमान पिण्यासाठी पाणी मिळावे, यासाठी पशुपालकांची चांगलीच कसरत सुरू आहे. पशुंच्या चाऱ्याच्या अनुषंगाने पशुसंवर्धन विभागाकडून १ आॅगस्ट ते ३० जुलै असे एक वर्ष समजण्यात येते. मृगाच्या पावसानंतर एक महिन्यात साधारणत: नवीन चाऱ्याचे उत्पादन येते. यावर्षी तसे न झाल्यास शेवटचे पाच-सहा दिवस मात्र चाऱ्याबाबत गोंधळ निर्माण होऊ शकते. अन्यथा सर्वकाही सामान्य राहिल्यास आणि वेळेवर पाऊस आल्यास चाराटंचाई जाणवणार नसल्याचे पशुसंवर्धनकडून सांगण्यात आले. याबाबत नुकतीच एक बैठक घेण्यात येऊन आढावा घेण्यात आला. या बैठकीत पंचायत समिती, महसूल तसेच पशुसंर्वन विभागाकडे जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यातून चारा डेपोची मागणी नसल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. डी. बी. सोनकुसळे यांनी दिली. मागील वर्षी फारसे समाधानकारक पीक झाले नसले तरी पिकांची ग्रोथ चांगली होती, त्यामुळे चाऱ्याचे बऱ्यापैकी उत्पादन झाले होते. आता हा चारा कामी पडत आहे. जिल्ह्यातील वार्षिक चारा उत्पादनावर नजर टाकली असता जंगल अधिक पडिक जमीन असे एकूण साडेचार हजार हेक्टर चाऱ्याचे उत्पादन होते. एका हेक्टरपासून एक मेट्रिक टन चारा मिळतो. याशिवाय शेतकरी स्वत: आपल्या शेतात जे पीक घेतात त्यातूनही मोठ्या प्रमाणात चाऱ्याचे उत्पादन होते. या सर्व चाऱ्याचा उपयोग जिल्ह्यातील लाखोंच्या संख्येने असलेल्या पशुंच्या वर्षभराच्या संगोपनासाठी केला जातो. (प्रतिनिधी)