शहरं
Join us  
Trending Stories
1
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
2
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
3
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
4
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
5
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
6
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
7
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
8
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
9
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
10
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
11
विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती
12
Leopard: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
13
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
14
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
15
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
16
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
17
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
18
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
19
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
20
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
Daily Top 2Weekly Top 5

कोणत्याही पक्षात अद्याप युती-आघाडी नाही

By admin | Updated: October 5, 2015 02:39 IST

नगरपंचायतीच्या निवडणुकीचा बिगूल वाजला असून महागाव येथे निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे.

महागाव : नगरपंचायतीच्या निवडणुकीचा बिगूल वाजला असून महागाव येथे निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. नामांकन दाखल करण्यासाठी शेवटचे चार दिवस उरले आहे. मात्र अद्यापही कोणत्याही पक्षाची युती वा आघाडी झाली नाही. सर्वच पक्ष आणि आघाड्या या निवडणुकीत स्वतंत्र लढण्याच्या मानसिकतेत दिसत आहे. महागाव नगरपंचायतीच्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपा, परिवर्तन विकास आघाडी, जनआंदोलन आधार संघर्ष समिती रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहे. परिवर्तन विकास आघाडी वगळता कोणत्याही पक्षाजवळ आजही १७ प्रभागातील उमेदवार जुळून आले नाहीत. परिवर्तन विकास आघाडीचे प्रमुख माजी सरपंच रामराव नरवाडे यांनी १४ उमेदवार १५ दिवसापूर्वीच घोषित केले. उर्वरित तीन उमेदवार घोषित होणे बाकी आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना १३, १५ व १६ प्रभागातून आवाहन आहे. भाजपा सारख्या आणि सत्तेतील आमदार असूनही महागाव शहरात त्यांना खात्रीचे उमेदवार मिळाले नाही. शिवसेना किंवा अन्य पक्षातील नाराज उमेदवार शोधण्यासाठी भाजपाचे काही कार्यकर्ते फिरत असल्याची माहिती आहे. परिवर्तन विकास आघाडीने तिकीट नाकारलेल्यांची मनधरणी करण्यासाठी आमदाराला त्यांच्या घरापर्यंत जाण्याची वेळ आली आहे. सेनेने काही उमेदवारांवर मोहोर लावल्यानंतर भाजपामधील काही कार्यकर्ते त्यांना भाजपाची उमेदवारी देऊ करीत आहे. काँग्रेसने दोन बैठका घेतल्या असता तोच अनुभव येत आहे. नऊ महिला आणि त्यातही आरक्षित जागा असल्याने अनेक इच्छुकांजवळ जात पडताळणीचे अधिकृत प्रमाणपत्रच नाही. त्यामुळे वेळेवर सर्कस उभी करू पाहणाऱ्या पक्षांची अडचण होत आहे. काँग्रेसचे खासदार अ‍ॅड. राजीव सातव, शिवसेनेच्या खासदार भावना गवळी वगळता येथे कोणत्याही पक्षाचा मोठा नेता आला नाही. सर्वच १९ तारखेची वाट पाहत आहे. याच तारखेला नामांकन मागे घेता येईल व किती अर्ज राहिले त्यातून काही उमेदवार पार्टीसाठी घेता येते का यावर पक्षांचा कल दिसत आहे. नामांकन आॅनलाईन दाखल करायचे असून त्यासोबतच सर्व कागदपत्रे जोडायची आहे. आरक्षित जागेसाठी लागणारे कागदपत्रे जुळविण्याचे काम अद्यापही सुरूच आहे. सर्वच पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले तरी भाजपा-सेना युतीची दोन वेळा चर्चा झाली. परंतु आमदार राजेंद्र नजरधने आणि सेनेचे माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर यांची स्पष्ट बैठक झाली नाही. खासदार भावना गवळी यांनी सेनेकडून स्पष्ट काय ती भूमिका आमदारांना सांगितली आहे. त्या उपरही भाजपाकडून काही सकारात्मक संदेश आलेला नाही. सेना सध्या तरी पूर्ण ताकदीने मैदानात उतरली आहे. तीच गत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची झालेली दिसते. या दोनही पक्षाची साधारण बैठक झाली नाही. परिवर्तन नगरविकास आघाडी व जनआंदोलन संघर्ष समितीने एकला चलो रेचा नारा दिला आहे. त्यामुळे निवडणुकीत रंगत येणार हे निश्चित. (शहर प्रतिनिधी )