शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
3
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
4
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
5
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
6
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
7
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
8
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
9
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
10
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
11
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
12
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
13
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
14
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
15
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
16
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
17
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
18
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
19
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
20
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावर दिशादर्शक फलकच नाहीत

By admin | Updated: January 28, 2017 02:28 IST

तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातवरील वर्दळीच्या व वळणाच्या अनेक ठिकाणी दिशादर्शक फलकांचा अभाव आहे.

वाहनधारक संभ्रमात : अपघाताची शक्यता बळावली, बांधकाम विभागाचे दुर्लक्षपांढरकवडा : तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातवरील वर्दळीच्या व वळणाच्या अनेक ठिकाणी दिशादर्शक फलकांचा अभाव आहे. त्यामुुुुळे रात्री अपरात्री या मार्गावरुन धावणाऱ्या वाहनांच्या नवख्या वाहनचालकांची फसगत होते. यातून मोठा अपघात होण्याची शक्यता बळावली आहे.तालुक्यातून नागपूर-हैद्राबाद हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सात जातो. याशिवाय तालुक्यात अनेक राज्य व जिल्हा मार्ग आहेत. मात्र राष्ट्रीय महामार्गाने प्रवास करतांना अनेक ठिकाणी मार्गदर्शक फलकांचा अभाव दिसून येतो. गतीरोधक, वळण रस्ता, पूल, शाळा आदी बाबी समोर असल्याची सुचना विशीष्ट खूनांनी दर्शवून फलकांव्दारे वाहन चालकांना दिली जाते. या खूनांच्या इशाऱ्यावरुन चालकाला वाहन चालवितांना समोर काय आहे, ते माहित पडते. परिणामी वाहन चालक वाहनांवर नियंत्रण ठेवून वाहन पुढे हाकतो. मात्र तालुक्यात अनेक रस्त्यावर अशी फलकेच दिशेनाशी झाली आहे. फलकेदिसलीच तर त्या फलकावर आता बियाणे कंपनन्यांची जाहिरात पत्रके चिकटवलेली दिसतात. त्यामुळे नेमके समोर काय आहे , याचा वाहन चालकांना थांगपत्ताच लागत नाही. येथून नागपूर, यवतमाळ, चंद्रपुर, पारवा, हैद्राबाद मार्गावर रोज शेकडो वाहने धावतात. पांढरकवडा ते नागपूर या राष्ट्रीय महामार्गावरील दिशादर्शक फलके कित्येक दिवसांपासून वादळामुळे उन्मळून पडली आहेत. ती अद्याप तशीच पडून आहेत.काही ठिकाणी बियाणे कंपन्यांनी आपली पत्रके लावली आहेत. त्यामुळे या मार्गावरील वळण किंवा रस्त्यावर कोणत्या पध्दतीने वाहन चालवावे किंवा कुणीकडे वळावे याबाबतचे वाहनचालकांना मार्गदर्शन मिळत नाही. त्यामुळे या मार्गावर सतत अपघात घडत आहे. (तालुका प्रतिनिधी)बांधकाम विभागाने लक्ष देण्याची गरजराष्ट्रीय महामार्गावरील चारपदरी मार्गाने रात्रंदिवस वाहतुक सुरु आहे. रोज या रस्त्यावरुन शेकडो वाहने भरधाव धावतात. त्यांना पुढील रस्ता किंवा वळण अथवा शाळा असल्याचे फलकावरुन कळते. मात्र आता ही फलकेच गायब झाली आहे. काही फलकांवर , तर आता विविध कंपन्यांची जाहिरात पत्रके लावण्यात आली आहेत. त्यामुळे समोर नेमके काय याची माहिती चालकांना मिळणे कठीण होते. बांधकाम विभागाने ही बाब लक्षात घेऊन आवश्यक तिथे फलक लावणे आवश्यक आहे.तसेच या फलकावर जाहिरातीची पत्रके लावणाऱ्या बियाणे कंपन्यावर कारवाई करणे सुध्दा आवश्यक आहे.