शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
3
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
4
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
5
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
6
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
7
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
8
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
9
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
10
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
11
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
12
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
13
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
14
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
15
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
16
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
17
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
18
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
19
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
20
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावर दिशादर्शक फलकच नाहीत

By admin | Updated: January 28, 2017 02:28 IST

तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातवरील वर्दळीच्या व वळणाच्या अनेक ठिकाणी दिशादर्शक फलकांचा अभाव आहे.

वाहनधारक संभ्रमात : अपघाताची शक्यता बळावली, बांधकाम विभागाचे दुर्लक्षपांढरकवडा : तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातवरील वर्दळीच्या व वळणाच्या अनेक ठिकाणी दिशादर्शक फलकांचा अभाव आहे. त्यामुुुुळे रात्री अपरात्री या मार्गावरुन धावणाऱ्या वाहनांच्या नवख्या वाहनचालकांची फसगत होते. यातून मोठा अपघात होण्याची शक्यता बळावली आहे.तालुक्यातून नागपूर-हैद्राबाद हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सात जातो. याशिवाय तालुक्यात अनेक राज्य व जिल्हा मार्ग आहेत. मात्र राष्ट्रीय महामार्गाने प्रवास करतांना अनेक ठिकाणी मार्गदर्शक फलकांचा अभाव दिसून येतो. गतीरोधक, वळण रस्ता, पूल, शाळा आदी बाबी समोर असल्याची सुचना विशीष्ट खूनांनी दर्शवून फलकांव्दारे वाहन चालकांना दिली जाते. या खूनांच्या इशाऱ्यावरुन चालकाला वाहन चालवितांना समोर काय आहे, ते माहित पडते. परिणामी वाहन चालक वाहनांवर नियंत्रण ठेवून वाहन पुढे हाकतो. मात्र तालुक्यात अनेक रस्त्यावर अशी फलकेच दिशेनाशी झाली आहे. फलकेदिसलीच तर त्या फलकावर आता बियाणे कंपनन्यांची जाहिरात पत्रके चिकटवलेली दिसतात. त्यामुळे नेमके समोर काय आहे , याचा वाहन चालकांना थांगपत्ताच लागत नाही. येथून नागपूर, यवतमाळ, चंद्रपुर, पारवा, हैद्राबाद मार्गावर रोज शेकडो वाहने धावतात. पांढरकवडा ते नागपूर या राष्ट्रीय महामार्गावरील दिशादर्शक फलके कित्येक दिवसांपासून वादळामुळे उन्मळून पडली आहेत. ती अद्याप तशीच पडून आहेत.काही ठिकाणी बियाणे कंपन्यांनी आपली पत्रके लावली आहेत. त्यामुळे या मार्गावरील वळण किंवा रस्त्यावर कोणत्या पध्दतीने वाहन चालवावे किंवा कुणीकडे वळावे याबाबतचे वाहनचालकांना मार्गदर्शन मिळत नाही. त्यामुळे या मार्गावर सतत अपघात घडत आहे. (तालुका प्रतिनिधी)बांधकाम विभागाने लक्ष देण्याची गरजराष्ट्रीय महामार्गावरील चारपदरी मार्गाने रात्रंदिवस वाहतुक सुरु आहे. रोज या रस्त्यावरुन शेकडो वाहने भरधाव धावतात. त्यांना पुढील रस्ता किंवा वळण अथवा शाळा असल्याचे फलकावरुन कळते. मात्र आता ही फलकेच गायब झाली आहे. काही फलकांवर , तर आता विविध कंपन्यांची जाहिरात पत्रके लावण्यात आली आहेत. त्यामुळे समोर नेमके काय याची माहिती चालकांना मिळणे कठीण होते. बांधकाम विभागाने ही बाब लक्षात घेऊन आवश्यक तिथे फलक लावणे आवश्यक आहे.तसेच या फलकावर जाहिरातीची पत्रके लावणाऱ्या बियाणे कंपन्यावर कारवाई करणे सुध्दा आवश्यक आहे.