शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

चाराटंचाईवर अद्याप ठोस उपाययोजना नाहीत

By admin | Updated: December 20, 2014 02:15 IST

यावर्षी जिल्ह्यात झालेल्या अत्यल्प पावसामुळे आतापासूनच तीव्र चाराटंचाई निर्माण झाली आहे. एक लाख ३१ हजार मेट्रीक टन चाऱ्याचा तुटवडा असल्याचे पशुसंवर्धन विभागाने म्हटले आहे.

यवतमाळ : यावर्षी जिल्ह्यात झालेल्या अत्यल्प पावसामुळे आतापासूनच तीव्र चाराटंचाई निर्माण झाली आहे. एक लाख ३१ हजार मेट्रीक टन चाऱ्याचा तुटवडा असल्याचे पशुसंवर्धन विभागाने म्हटले आहे. परंतु चाराटंचाईच्या निवारणार्थ तसेच भविष्यातील संभाव्य चाराटंचाई लक्षात घेता कोणत्याही ठोस उपाययोजना दिसत नाही. मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत चाराटंचाईचाही मुद्दा प्रकर्षाने चर्चीला गेला. यावेळी त्यांनी कृषी, पशुसंवर्धन, सिंचन, महसूल आदी विभागांनी समन्वयाने काम करून या प्रश्नावर तोडगा काढण्याचे सूचविले. तसेच या बाबत एक ठराविक आराखडाही तयार करण्यात येत आहे. सध्या जिल्ह्यातील चाराटंचाईची परिस्थिती बघता पशुपालकांकडून चारा डेपो सुरू करण्याची मागणी होत आहे. अद्याप पावसाळ्याला बराच वेळ असून येत्या काळात ही चाराटंचाई अधिक तीव्र होणार आहे. या चाराटंचाईचा सामना कसा करावा, यामध्ये शेतकरी त्रस्त आहे. आधीच नापिकी व कर्जबाजारीपणामुळे शेतकरी हवालदिल झाला असताना आता चाराटंचाईचे संकट त्याच्यावर ओढविले आहे. यवतमाळ जिल्ह्यात आठ लाखांपेक्षा अधिक वेगवेगळ्या गटातील पशुधन आहे. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून गेल्या काही वर्षांमध्ये पशुपालन लोकप्रिय झाले आहे. त्यातूनच शेतकऱ्यांनी गाई, म्हशी व इतर पशुंचे पालन केलेले आहे. परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे पाणी व चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. यामध्ये शासकीय विभागांकडून कोणतीही ठोस मदत शेतकऱ्यांना मिळताना दिसत नाही. पशुसंवर्धन विभाग महसूलकडे तर महसूल विभाग पशुसंवर्धनकडे बोट दाखवून आपली जबाबदारी झटकताना दिसते. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनीसुद्धा या बाबत क्रियाशील भूमिका घेतलेली दिसत नाही. त्यामुळे पशुपालकांमध्ये रोष व्यक्त होत आहे. पशुंसाठी असंख्य योजना शासनाच्या आहेत. परंतु या योजनेचीही योग्य अंमलबजावणी होत नसल्यामुळे या योजना केवळ कागदावरच दिसतात. (प्रतिनिधी)