शहरं
Join us  
Trending Stories
1
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
2
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
3
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
4
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
5
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
6
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
7
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
8
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
9
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
10
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
11
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
12
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
13
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
14
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
15
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
16
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
17
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
18
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
19
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
20
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात आणखी सव्वाशे फ्लोराईड जलस्रोत वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 21:10 IST

जिल्ह्यात एकीकडे पिण्यासाठी पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. तर दुसरीकडे उपलब्ध असलेले थोडेथोडके जलस्रोतही दूषित असल्याची गंभीरबाब भूजल सर्वेक्षण विभागाच्या तपासणीतून पुढे आली आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षीपर्यंत ४१६ जलस्रोत फ्लोराईडयुक्त होते.

ठळक मुद्देभूजलचा अहवाल : पावसाळ्याच्या तोंडावर प्रमाण वाढण्याची भीती

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात एकीकडे पिण्यासाठी पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. तर दुसरीकडे उपलब्ध असलेले थोडेथोडके जलस्रोतही दूषित असल्याची गंभीरबाब भूजल सर्वेक्षण विभागाच्या तपासणीतून पुढे आली आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षीपर्यंत ४१६ जलस्रोत फ्लोराईडयुक्त होते. त्यात आणखी १२२ दूषित जलस्रोतांची वाढ नोंदविण्यात आली आहे. त्यामुळे नजरेने स्वच्छ दिसणारे पाणी पिण्यासाठी योग्य असेलच याची खात्री नाही. पाण्यात तब्बल १३ प्रकारच्या घातक घटकांचा समावेश असल्याचा गंभीर निष्कर्षही भूजल सर्वेक्षणने स्पष्ट केला आहे.जिल्ह्यातील दोन हजार ४० गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे १२ हजार स्रोत आहे. हे पाणी गावकरी दररोज पितात. पिण्यास उपलब्ध असलेले पाणी पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळ्यानंतर तपासले जाते. हे तपासण्याचे काम जलसेवक आणि आरोग्य सेवक पार पाडतात. पावसाळ्यानंतरचा असाच अहवाल जलसुरक्षकांनी जिल्हा प्रशासनाकडे सादर केला आहे. या अहवालामध्ये फ्लोराईडयुक्त पाण्याचे स्रोत वाढल्याचे निदर्शनास आले आहे.यापूर्वी जिल्ह्यात ४१६ पाण्याचे स्रोत फ्लोराईडचे असल्याचे नमूद करण्यात आले होते. आता ५३८ सोर्स फ्लोराईडचे असल्याचे नमूद करण्यात आले आहे. पूर्वीच्या तुलनेत १२२ फ्लोराईडयुक्त पाण्याचे सोर्स वाढले आहे. पिण्याचे पाणी मिळविण्यासाठी सर्वसामान्य नागरिक अधिक खोलवर बोअर करीत असल्याने हा गंभीर प्रकार घडत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याशिवाय आजपर्यंत अनेक सोर्स तपासणीसाठी आरोग्य विभाग आणि भूजल सर्वेक्षण विभागाकडे आलेच नाहीत. यामुळे या सोर्सची माहिती अनेकांना मिळाली नाही. फ्लोराईडयुक्त पाण्याने हाडे ठिसूळ होणे, अकाली वृद्धत्व येणे, दात पिवळे पडणे, किडनी खराब होणे, अशा अनेक बाबी प्रकर्षाने जाणवतात. हे सोर्स कायमचे बंद केले जातात. त्याला पर्यायी पाण्याचे स्रोत उपलब्ध करून द्यायचे असतात. यासंदर्भात पाणीपुरवठा विभाग आणि प्रशासनाच्यावतीने कार्यवाही करण्यात येत आहे.भूजल सर्वेक्षणच्या सात प्रयोगशाळाभूजल सर्वेक्षण विभाग आणि आरोग्य विभागाची प्रयोगशाळा पाण्याचे नमुने तपासते. यामध्ये सात प्रयोगशाळा भूजल सर्वेक्षण विभागाच्या आहेत. यामध्ये दारव्हा, पुसद, उमरखेड, राळेगाव, यवतमाळ, पांढरकवडा, वणी आणि जिल्हा आरोग्य विभागाची स्वतंत्र प्रयोगशाळा आहे.सिलिका सर्वाधिक धोकादायककिडनीचा आजार होण्यासाठी केवळ फ्लोराईडच नव्हे तर अनेक बाबीही कारणीभूत असतात. यामध्ये सिलिकाचे प्रमाण पाण्यामध्ये अधिक असल्यास किडनी फेल होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढते. तर नायट्रेट हा घटकही पाण्यामध्ये आढळतो. यामध्ये मल मूत्र आणि रासायनिक खताचे घटक पाण्यामध्ये मिसळतात. यांना बाहेर काढणे अवघड बाब आहे. याकरिता पावसाळ्यापूर्वीच अशा सोर्स जवळ प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या जातात. यासोबतच पाण्यामध्ये टीडीएसचे (टोटल डिझॉल्व्ह सॉलिडस्- पूर्णत: विरघळलेले क्षार) प्रमाणही आढळते. ५०० ते २००० टीडीएस हा घटक योग्य समजला जातो. यापेक्षा जास्त प्रमाण किडनीला घातक आहे. इतकेच नव्हे तर पाण्यामधील आयर्नचे अधिक राहिले तर किडनीला धोका होऊ शकतो.पाण्याच्या शुद्धतेबाबत प्रत्येकाने काळजी घ्यावी, केवळ स्वच्छ दिसणारे पाणी योग्य आहे असे समजून वापरु नये. याकरिता गावपातळीवर तपासणीच्या सूचना दिल्या आहेत.- राजेश सावळेवरिष्ठ भू-वैज्ञानिकभूजल सर्वेक्षण विभाग.

टॅग्स :water pollutionजल प्रदूषण