शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
4
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
5
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
6
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
7
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
8
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
9
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
10
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
11
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
12
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
13
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
14
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
15
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
16
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
17
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
18
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
19
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
20
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?

जिल्ह्यात आणखी सव्वाशे फ्लोराईड जलस्रोत वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 21:10 IST

जिल्ह्यात एकीकडे पिण्यासाठी पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. तर दुसरीकडे उपलब्ध असलेले थोडेथोडके जलस्रोतही दूषित असल्याची गंभीरबाब भूजल सर्वेक्षण विभागाच्या तपासणीतून पुढे आली आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षीपर्यंत ४१६ जलस्रोत फ्लोराईडयुक्त होते.

ठळक मुद्देभूजलचा अहवाल : पावसाळ्याच्या तोंडावर प्रमाण वाढण्याची भीती

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात एकीकडे पिण्यासाठी पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. तर दुसरीकडे उपलब्ध असलेले थोडेथोडके जलस्रोतही दूषित असल्याची गंभीरबाब भूजल सर्वेक्षण विभागाच्या तपासणीतून पुढे आली आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षीपर्यंत ४१६ जलस्रोत फ्लोराईडयुक्त होते. त्यात आणखी १२२ दूषित जलस्रोतांची वाढ नोंदविण्यात आली आहे. त्यामुळे नजरेने स्वच्छ दिसणारे पाणी पिण्यासाठी योग्य असेलच याची खात्री नाही. पाण्यात तब्बल १३ प्रकारच्या घातक घटकांचा समावेश असल्याचा गंभीर निष्कर्षही भूजल सर्वेक्षणने स्पष्ट केला आहे.जिल्ह्यातील दोन हजार ४० गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे १२ हजार स्रोत आहे. हे पाणी गावकरी दररोज पितात. पिण्यास उपलब्ध असलेले पाणी पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळ्यानंतर तपासले जाते. हे तपासण्याचे काम जलसेवक आणि आरोग्य सेवक पार पाडतात. पावसाळ्यानंतरचा असाच अहवाल जलसुरक्षकांनी जिल्हा प्रशासनाकडे सादर केला आहे. या अहवालामध्ये फ्लोराईडयुक्त पाण्याचे स्रोत वाढल्याचे निदर्शनास आले आहे.यापूर्वी जिल्ह्यात ४१६ पाण्याचे स्रोत फ्लोराईडचे असल्याचे नमूद करण्यात आले होते. आता ५३८ सोर्स फ्लोराईडचे असल्याचे नमूद करण्यात आले आहे. पूर्वीच्या तुलनेत १२२ फ्लोराईडयुक्त पाण्याचे सोर्स वाढले आहे. पिण्याचे पाणी मिळविण्यासाठी सर्वसामान्य नागरिक अधिक खोलवर बोअर करीत असल्याने हा गंभीर प्रकार घडत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याशिवाय आजपर्यंत अनेक सोर्स तपासणीसाठी आरोग्य विभाग आणि भूजल सर्वेक्षण विभागाकडे आलेच नाहीत. यामुळे या सोर्सची माहिती अनेकांना मिळाली नाही. फ्लोराईडयुक्त पाण्याने हाडे ठिसूळ होणे, अकाली वृद्धत्व येणे, दात पिवळे पडणे, किडनी खराब होणे, अशा अनेक बाबी प्रकर्षाने जाणवतात. हे सोर्स कायमचे बंद केले जातात. त्याला पर्यायी पाण्याचे स्रोत उपलब्ध करून द्यायचे असतात. यासंदर्भात पाणीपुरवठा विभाग आणि प्रशासनाच्यावतीने कार्यवाही करण्यात येत आहे.भूजल सर्वेक्षणच्या सात प्रयोगशाळाभूजल सर्वेक्षण विभाग आणि आरोग्य विभागाची प्रयोगशाळा पाण्याचे नमुने तपासते. यामध्ये सात प्रयोगशाळा भूजल सर्वेक्षण विभागाच्या आहेत. यामध्ये दारव्हा, पुसद, उमरखेड, राळेगाव, यवतमाळ, पांढरकवडा, वणी आणि जिल्हा आरोग्य विभागाची स्वतंत्र प्रयोगशाळा आहे.सिलिका सर्वाधिक धोकादायककिडनीचा आजार होण्यासाठी केवळ फ्लोराईडच नव्हे तर अनेक बाबीही कारणीभूत असतात. यामध्ये सिलिकाचे प्रमाण पाण्यामध्ये अधिक असल्यास किडनी फेल होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढते. तर नायट्रेट हा घटकही पाण्यामध्ये आढळतो. यामध्ये मल मूत्र आणि रासायनिक खताचे घटक पाण्यामध्ये मिसळतात. यांना बाहेर काढणे अवघड बाब आहे. याकरिता पावसाळ्यापूर्वीच अशा सोर्स जवळ प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या जातात. यासोबतच पाण्यामध्ये टीडीएसचे (टोटल डिझॉल्व्ह सॉलिडस्- पूर्णत: विरघळलेले क्षार) प्रमाणही आढळते. ५०० ते २००० टीडीएस हा घटक योग्य समजला जातो. यापेक्षा जास्त प्रमाण किडनीला घातक आहे. इतकेच नव्हे तर पाण्यामधील आयर्नचे अधिक राहिले तर किडनीला धोका होऊ शकतो.पाण्याच्या शुद्धतेबाबत प्रत्येकाने काळजी घ्यावी, केवळ स्वच्छ दिसणारे पाणी योग्य आहे असे समजून वापरु नये. याकरिता गावपातळीवर तपासणीच्या सूचना दिल्या आहेत.- राजेश सावळेवरिष्ठ भू-वैज्ञानिकभूजल सर्वेक्षण विभाग.

टॅग्स :water pollutionजल प्रदूषण