शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
2
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
3
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
4
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
5
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
6
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
7
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
8
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
9
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
10
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
11
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
12
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
13
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
14
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
15
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
16
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
17
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
18
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
19
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
20
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला

१५ केंद्रांवर ४० टक्केही मतदान नाही

By admin | Updated: October 16, 2014 23:30 IST

मतदानाच्या बाबतीत शहरी मतदार नेहमीच उदासीन राहिला आहे. याचा प्रत्यय पुन्हा एकदा बुधवारी झालेल्या विधानसभेच्या मतदानातील टक्केवारीतून दिसून येते. यवतमाळ शहर व लगतच्या

यवतमाळ : मतदानाच्या बाबतीत शहरी मतदार नेहमीच उदासीन राहिला आहे. याचा प्रत्यय पुन्हा एकदा बुधवारी झालेल्या विधानसभेच्या मतदानातील टक्केवारीतून दिसून येते. यवतमाळ शहर व लगतच्या ग्रामपंचायतींमध्ये तब्बल १५ केंद्रांवर ४० टक्केही मतदान झाले नाही. या उलट तालुक्यातील आदिवासीबहुल गावात ७५ टक्क्यापेक्षा अधिक मतदान झाले. शहरात राहून साधन सुचितेच्या गप्पा हाणणारे मतदानाच्या बाबतीत मात्र नेहमीच मागे राहतात. देशाची व्यवस्था कशी राहावी यावर घसा कोरडा करणाऱ्यांकडून मतदानाचा हक्क बजावलाच जात नाही. यवतमाळ नगरपरिषद क्षेत्रात सरासरी ५० टक्के इतके मतदान झाले आहे. यातही झोपडपट्टी आणि मागास भाग म्हणून परिचित असलेल्या मतदान केंद्रांवर ६५ ते ७० टक्के मतदान झाले आहे. यवतमाळ तालुक्यातील कापरा मेथड येथील दोन्ही मतदान केंद्रांवर ७९ टक्के मतदान झाले. त्यानंतर किटा, बोरगाव, मडकोना, डोर्ली, इचोरी जांबवाडी, तपोना, चाणी, वारजई, बोथबोडन, गहुली हेटी, सावरगड, येरद, चिचघाट, घोडखिंडी, हिवरी, पाथ्रडदेवी, पार्डी नका, कोळंबी, कारेगाव, यावली, गाजीपूर, सायखेडा, वडगाव आंध, वागद खु., वडगाव गाढवे, बोरीगोसावी, हादगाव, रामवाकडी, यावली, रामनगर, मांजर्डा येथे ७५ ते ८० टक्के मतदारांनी लोकशाही बळकट करण्यासाठी उत्साहाने मतदान केले. या उलट यवतमाळ शहरातील १०७ मतदान केंद्रांपैकी सहा मतदान केंद्रांवर प्रचंड निरुत्साह दिसून आला. येथे ३५ ते ३८ टक्केच मतदान झाले. नगरपरिषद क्षेत्रातील ही सहा मतदान केंद्रे क्र. १५६, १६०, १६३, १७०, १९९, २२२ ही आहे. या प्रमाणेच लगतच्या वाघापूर, लोहारा आणि वडगाव रोड येथील काही केंद्रावरही अशीच स्थिती आढळून आली. महाविद्यालयीन विद्यार्थी आणि सुशिक्षित नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावावा, यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जाते. मात्र हाच वर्ग आपल्या कर्तव्यापासून दूर राहात असल्याचे दिसते. यवतमाळ विधानसभेत एकूण तीन लाख ४३ हजार ३७८ मतदार आहे. यापैकी दोन लाख एक हजार ४४७ मतदारांनी हक्क बजावला. यात ९३ हजार ३६५ स्त्रियांनी मतदानासाठी पुढाकार घेतला. त्यांची मतदान टक्केवारीही ५६.५२ इतकी आहे. या उलट पुरुषांच्या मतदानाची टक्केवारी ६०.६७ इतकी आहे. यावरून महिलांमध्येही मतदानाबाबत अजून जागृती करण्याची गरज असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे यवतमाळ जिल्ह्यातील सातही विधानसभेत सर्वात कमी मतदान जिल्हा मुख्यालयी असलेल्या यवतमाळ विधानसभा क्षेत्रात झाले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)