शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

‘त्यांची’ प्राणज्योत तेवतेय रक्ताच्या थेंबावर

By admin | Updated: June 14, 2014 02:34 IST

रक्तदान हे जीवनदान म्हटले जाते. रक्ताचा संचय करणे अशक्य आहे.

रूपेश उत्तरवार यवतमाळरक्तदान हे जीवनदान म्हटले जाते. रक्ताचा संचय करणे अशक्य आहे. मात्र मर्यादित कालावधीसाठी हे रक्त टिकवून ठेवता येते. असे असले तरी गरजवंताच्या तुलनेत ऐच्छीक रक्तदात्यांंची संख्या नगण्य आहे. त्यामुळे रक्ताचा भिषण तुटवडा निर्माण झाला आहे. रक्त पुरवठ्यावर जीवन विसंबून असणाऱ्या रूग्णांच्या जीवनाची नाळ टांगनिला लागली आहे. यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ऐच्छीक रक्तदात्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यासोबतच मागणी कित्येक पटींनी वाढली आहे. मात्र मागणीच्या तुलनेत रक्त पुरवठयाची संख्या सर्वात कमी आहे. वैद्यकीय महाविद्यालयातील रक्तदानाचे कॅम्प, यासोबतच एनसीसी आणि अभियांत्रीकी महाविद्यालयासह अनेक व्यक्ती स्वत:हून रक्तदान करतात आणि रक्त पेढीतील रक्तसंचयात भर पडते. हिवाळ्यात आणि पावसाळ्यात रक्तदान करणाऱ्यांची संख्या मोठी असते. उन्हाळ्यात ही संख्या रोडावते. यातूनच रक्त तुटवड्याचा भिषण प्रश्न निर्माण होतो.प्लाझमा सेंटरच नाहीशासकीय वैद्यकीय महाविद्यालयातिल रक्त पेढीतून होलब्लडचा पुरवठा करण्यात येतो. मात्र रूग्णाला रेड सेल्स प्लाझ्मा लागल्यास तो रूग्णालयात मिळत नाही. त्यासाठी खासगी रक्तपेढीतच धाव घ्यावी लागते. प्लेटलेट या ठिकाणावरून मिळत नाही. याच संधीचा फायदा घेत खासगी रक्तपेढीधारक गरजवंतांना लुटतात. खासगी रक्त पेढीतून प्लाझ्मा, होेलब्लड, लागल्यास त्याला पर्यायी ब्लड उपलब्ध करून द्यावे लागते. त्यानंतर ठरावीक दरात रक्त पिशवी दिली जाते. मात्र पर्यायी रक्त उपलब्ध नसल्यास रक्त पिशवीचा दर दुप्पट असतो. त्यासाठी जादा पैसे मोजले जातात. गरजवंताचा नाईलाज असतो.राज्य संक्रमन परिषदेची मान्यताब्लड कम्पोनंट्स सेप्रेशन युनिट उघडण्यासाठी राज्य रक्त संक्रमन परिषदेने मान्यता दिली आहे. त्याचा नकाशा मंजूर झाला आहे. त्यासाठी बांधकाम सुरू करण्यात आले आहे. सात लाख रूपये यासाठी मंजूर करण्यात आले आहे. यासाठी यवतमाळ जिल्ह्याला ६० लाखांची यंत्रसामुग्री मंजूर करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काळात ब्लड कम्पोनंटस शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मिळण्यास मदत होणार आहे. यातून गरजवंतांची होणारी लूट थांबण्यास मदत होणार आहे. सिकलसेल, थॅलेसिमीयाचे रूग्ण संकटातविदर्भात सिकलसेल आणि थॅलेसिमीयाचे सर्वाधिक रूग्ण यवतमाळ जिल्हयात आहे. या रुग्णांना वारंवार रक्ताची गरज भासते. असे एक हजार रूग्ण रजिस्टर करण्यात आले आहे. रक्तपेढीतील तुटवड्याने त्यांच्या आयुष्याची दोर मात्र टांगणीला लागली आहे. रिफ्रेशमेंटसाठी केवळ १० रूपयेऐच्छिक रक्तदानासाठी येणाऱ्या नागरिकांना उर्जा मिळावी म्हणून रिफ्रेशमेंटसाठी केवळ १० रूपये दिले जातात. गत २० वर्षांपासून हा दर कायम आहे. त्यामुळे रक्तदानास येणाऱ्या दात्यांना त्याच्या मोबदल्यात पौष्टीक घटकच मिळत नाही.अशी आहे रक्त पेढीची स्थितीशासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रक्तदात्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असली तरी मिळणारे रक्त अपुरे पडत आहे.सन २०११ मध्ये चार हजार ६५० गरजवंतांना रक्त पुरविण्यात आले. त्या मोबदल्यात तीन हजार १६ व्यक्तींनी रक्तदान केले. त्यासाठी ९६ कॅम्प घेण्यात आले. सन २०१२ मध्ये चार हजार ९७२ इच्छुकांना रक्ताचा पुरवठा करण्यात आला. त्या बदल्यात तीन हजार ४३८ व्यक्तींनी रक्तदान केले. यावर्षी ८७ कॅम्प घेण्यात आले.सन २०१३ मध्ये सात हजार २८३ गरजवंतांना रक्ताचा पुरवठा करण्यात आला. त्याबदल्यात तीन हजार ३४२ व्यक्तीेंनी रक्तदान केले. यावेळी ११२ कॅम्प घेण्यात आले. सहा महिन्यात चार हजार ४३२ व्यक्तींना रक्ताचा पुरवठा करण्यात आला. ३३ कॅम्प घेण्यात आले. सध्याच्या स्थितीत रक्तपेढीत फार मोठा रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे.