शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

रेल्वे मार्गाच्या कामकाजाने शेतातील पीक मातीमोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 17:43 IST

Yavatmal : कपाशी, तूर, रब्बी पिकांची वाढ खुंटली; एकरी उत्पादनाला मोठा फटका

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : रेल्वे मार्गाच्या कामकाजातून उडणारी धूळ थेट पिकांवर साचत आहे. यातूनच या मार्गावरील पिके मातीने माखली आहेत. परिणामी, शेतातील पिकांची वाढ खुंटली आहे. एकरी उत्पादनाला याचा मोठा फटका बसला आहे. कापूस, तूर या खरिपातील पिकांसह रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी मदतीसाठी आता जिल्हा प्रशासनाकडे मागणी केली आहे.

वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गाचे कामकाज सुरू आहे. या रेल्वे मार्गावर असलेल्या तिवसा या गावाजवळील शेतशिवारातील शेतकऱ्यांना चालू असलेल्या माती कामाचा मोठा फटका बसला आहे. यामुळे शेतशिवारात काम करणेही शेतकऱ्यांना अडचणीचे झाले आहे.

झालेले नुकसान महसूल अथवा रेल्वेने भरून द्यावे 

  • शेतकऱ्यांच्या आर्थिक १ नुकसानीला महसूल आणि रेल्वे प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप शेतकरी करीत आहे. शेतकऱ्यांच्या शेतशिवारात झालेल्या नुकसानीची भरपाई रेल्वे प्रशासनाने अथवा महुल प्रशासनाने द्यावी, अशी विनंती राजेश राठोड, कैलास राठोड, अविनाश जाधव आदी शेतकऱ्यांनी केली आहे.
  • मागणीची पूर्तता व्हावी म्हणून यवतमाळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी महसूल प्रशासनाकडे केली आहे. मात्र, अजूनपर्यंत या मागणीकडे शासकीय यंत्रणेकडून दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अजूनही मदत मिळाली नाही.
  • रेल्वे मार्गाच्या बाजूला अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या शेती आहे. त्यांचा संपूर्ण उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे. सतत उडणाऱ्या धुळीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. आदा कुटुंब चालवायचे कसे? असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे.
टॅग्स :Yavatmalयवतमाळ