शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

एसटीचे तीन प्रदेश महिनाभरात २९ कोटी रुपयांनी आले तोट्यात

By विलास गावंडे | Updated: January 21, 2024 16:28 IST

मुंबई, पुणे, नाशिक माघारले : उत्पन्न कमी, खर्च वाढतीवरच

विलास गावंडेयवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मुंबई, पुणे, नाशिक या तीन प्रदेशाचा तोटा वाढला आहे. शासनाकडून प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या विविध सवलतीनंतरही हे प्रदेश उत्पन्नाच्या बाबतीत माघारले असल्याचे स्पष्ट झाले आहे. डिसेंबर २३ मध्ये महामंडळाने उत्पन्न व खर्चाच्या बाबतीत केलेल्या हिशेबातून याबाबी पुढे आल्या आहेत. उत्पन्न कमी आणि खर्च अधिक अशी परिस्थिती मुंबई, पुणे, नाशिक प्रदेशाची राहिली आहे.

डिसेंबर महिन्यात महामंडळाचा सर्व विभाग मिळून एकूण तोटा सात कोटी इतका आहे. या तोट्यामध्ये मुंबई, पुणे, नाशिक विभागामुळे भर पडली आहे. हा खर्च आटोक्यात आणण्यासाठी महामंडळाने उपाययोजना सूचविल्या आहेत. मुंबई प्रदेशात मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे हे एसटीचे विभाग येतात. या प्रदेशाचा डिसेंबर महिन्यातील तोटा १४ कोटी २४ लाख इतका राहिला आहे. पुणे प्रदेश ११ कोटी ९१ लाखांनी तोट्यात आहे. या प्रदेशात कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर या विभागाचा अंतर्भाव आहे. नाशिक प्रदेश दोन कोटी ७२ लाखांनी तोट्यात गेला आहे. या विभागामध्ये अहमदनगर, धुळे, जळगाव, नाशिक हे विभाग येतात.

महामंडळाच्या तीन प्रदेशांनी उत्पन्नाच्या बाबतीत आघाडी घेतली असली तरी तोट्यात असलेल्या प्रदेशामुळे एसटीचा डिसेंबर २०२३ मधील एकूण तोटा सात कोटी इतका दर्शविण्यात आला आहे. तोट्यातील प्रदेश नफ्यात आणण्याची जबाबदारी नियंत्रण समित्यांवर सोपविण्यात आलेली आहे. त्यांनी विभाग नियंत्रकांना मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षा महामंडळाला आहे.

अतिकालिक भत्ता अवाजवी

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना अवाजवी अतिकालिक भत्ता दिला जात असल्याचीही बाब पुढे आली आहे. जादा ड्युटी झाल्यानंतर याचा लाभ दिला जातो. वास्तविक कमी वेतन श्रेणीच्या कर्मचाऱ्यांना हा लाभ देणे महामंडळाला अपेक्षित आहे. परंतु, जादा वेतनश्रेणीचे कर्मचारी अशा कामगिरीवर पाठविले जात असल्याचे मत महामंडळाने नोंदविले आहे. या भत्त्यावर नियंत्रण आणल्यास खर्चावरही बचत होईल, असे नमूद करण्यात आले आहे. शिवाय विनासवलतमध्ये वाढ, केपीटीएलमध्ये वाढ यासह इतर काही उपाय सुचविण्यात आलेल्या आहेत.

तीन प्रदेशाची चांगली कामगिरीउत्पन्नाच्या बाबतीत छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि अमरावती प्रदेशाची कामगिरी चांगली राहिली आहे. छत्रपती संभाजीनगर प्रदेशाने १२ कोटी ९३ लाख, नागपूरने सहा कोटी ३२ लाख, तर अमरावती प्रदेशाने दोन कोटी ६२ लाख इतका नफा मिळवून दिला आहे.

टॅग्स :YavatmalयवतमाळST Strikeएसटी संप