शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

एसटीचे तीन प्रदेश महिनाभरात २९ कोटी रुपयांनी आले तोट्यात

By विलास गावंडे | Updated: January 21, 2024 16:28 IST

मुंबई, पुणे, नाशिक माघारले : उत्पन्न कमी, खर्च वाढतीवरच

विलास गावंडेयवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मुंबई, पुणे, नाशिक या तीन प्रदेशाचा तोटा वाढला आहे. शासनाकडून प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या विविध सवलतीनंतरही हे प्रदेश उत्पन्नाच्या बाबतीत माघारले असल्याचे स्पष्ट झाले आहे. डिसेंबर २३ मध्ये महामंडळाने उत्पन्न व खर्चाच्या बाबतीत केलेल्या हिशेबातून याबाबी पुढे आल्या आहेत. उत्पन्न कमी आणि खर्च अधिक अशी परिस्थिती मुंबई, पुणे, नाशिक प्रदेशाची राहिली आहे.

डिसेंबर महिन्यात महामंडळाचा सर्व विभाग मिळून एकूण तोटा सात कोटी इतका आहे. या तोट्यामध्ये मुंबई, पुणे, नाशिक विभागामुळे भर पडली आहे. हा खर्च आटोक्यात आणण्यासाठी महामंडळाने उपाययोजना सूचविल्या आहेत. मुंबई प्रदेशात मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे हे एसटीचे विभाग येतात. या प्रदेशाचा डिसेंबर महिन्यातील तोटा १४ कोटी २४ लाख इतका राहिला आहे. पुणे प्रदेश ११ कोटी ९१ लाखांनी तोट्यात आहे. या प्रदेशात कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर या विभागाचा अंतर्भाव आहे. नाशिक प्रदेश दोन कोटी ७२ लाखांनी तोट्यात गेला आहे. या विभागामध्ये अहमदनगर, धुळे, जळगाव, नाशिक हे विभाग येतात.

महामंडळाच्या तीन प्रदेशांनी उत्पन्नाच्या बाबतीत आघाडी घेतली असली तरी तोट्यात असलेल्या प्रदेशामुळे एसटीचा डिसेंबर २०२३ मधील एकूण तोटा सात कोटी इतका दर्शविण्यात आला आहे. तोट्यातील प्रदेश नफ्यात आणण्याची जबाबदारी नियंत्रण समित्यांवर सोपविण्यात आलेली आहे. त्यांनी विभाग नियंत्रकांना मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षा महामंडळाला आहे.

अतिकालिक भत्ता अवाजवी

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना अवाजवी अतिकालिक भत्ता दिला जात असल्याचीही बाब पुढे आली आहे. जादा ड्युटी झाल्यानंतर याचा लाभ दिला जातो. वास्तविक कमी वेतन श्रेणीच्या कर्मचाऱ्यांना हा लाभ देणे महामंडळाला अपेक्षित आहे. परंतु, जादा वेतनश्रेणीचे कर्मचारी अशा कामगिरीवर पाठविले जात असल्याचे मत महामंडळाने नोंदविले आहे. या भत्त्यावर नियंत्रण आणल्यास खर्चावरही बचत होईल, असे नमूद करण्यात आले आहे. शिवाय विनासवलतमध्ये वाढ, केपीटीएलमध्ये वाढ यासह इतर काही उपाय सुचविण्यात आलेल्या आहेत.

तीन प्रदेशाची चांगली कामगिरीउत्पन्नाच्या बाबतीत छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि अमरावती प्रदेशाची कामगिरी चांगली राहिली आहे. छत्रपती संभाजीनगर प्रदेशाने १२ कोटी ९३ लाख, नागपूरने सहा कोटी ३२ लाख, तर अमरावती प्रदेशाने दोन कोटी ६२ लाख इतका नफा मिळवून दिला आहे.

टॅग्स :YavatmalयवतमाळST Strikeएसटी संप