शहरं
Join us  
Trending Stories
1
बँकिंग क्षेत्राला हादरवणारी बातमी! ३८ भारतीय बँकांचा डेटा लीक; पगार ट्रान्सफर, लोनचे हफ्ते सगळेच...
2
जीएसटी कपातीचा उलटा फेरा! वह्या, पुस्तके महागणार; शिक्षणासोबत काय खेळ केला पहा...
3
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...
4
कार, आयफोन आणि विदेशवारीचे आमिष देऊन करत होता विद्यार्थिनींची निवड! चैतन्यानंदवर आणखी गंभीर आरोप
5
"दुर्गा मातेला प्रार्थना करतो की, निवडणुकीनंतर असे सरकार बनावे जे..."; बंगालमध्ये नेमकं काय म्हणले अमित शाह?
6
Amazon.in च्या 'ग्रेट सेव्हिंग्ज सेलिब्रेशन' स्टोअरफ्रंटसह GST बचतीचा धमाका
7
तू परत आलास..?? IND vs PAK Final वरून पाकिस्तानची खिल्ली उडवणाऱ्या भन्नाट मीम्सचा पाऊस
8
Vodafone-Idea च्या शेअरमध्ये मोठी घसरण, AGR प्रकरणाची पुढील सुनावणी ६ ऑक्टोबरला
9
“STकडे १३ हजार एकर लँड बँक, NAREDCOने विकासात योगदान द्यावे”; प्रताप सरनाईक यांचे आवाहन
10
पोस्ट ऑफिसची गॅरंटी! फक्त ₹५० लाखांचा विमाच नाही, 'या' स्कीममध्ये मिळतात टॅक्स आणि कर्जाचे फायदे
11
“PM केअर फंडातून राज्याचा शेतकरी कर्जमुक्त करा”: राऊत, ठाकरे गट बळीराजासाठी रस्त्यावर उतरणार
12
'लडाख हिंसाचार' प्रकरणी आता मोदी सरकार 'अ‍ॅक्शन मोड'वर! दिल्लीहून एक दूत पाठवला; उपराज्यपालांनी बैठक बोलावली
13
झोमॅटोद्वारे हॉटेल मालकाने २१,००० रुपयांच्या १०७ ऑर्डर बनवून दिल्या, हातात किती शिल्लक राहिले... तुम्हीच पहा...
14
'सर्व दोष माझ्यावर टाकण्यात आले, तर...'; सोनम वांगचुक यांनी परदेशी निधीवर स्पष्टच सांगितले
15
Navratri 2025: देवीचे वाहन सिंह आणि लक्ष्मीचे घुबड का? त्यामागे आहे महत्त्वपूर्ण कारण!
16
सोने-चांदीच्या दरात आज मोठी उलथापालथ; Gold झालं स्वस्त, पण चांदी अवाक्याच्या बाहेर
17
"पाकिस्तानचा संघ एवढा भारी आहे की..."; IND vs PAK FINAL आधी कर्णधार सलमानने भारताला डिवचले
18
VIRAL :'सोनार बनवणार नाही, चोर चोरणार नाही'! ट्रेनमध्ये विक्रेत्याचा शायराना अंदाज; तरुणाची स्टाईल पाहून पब्लिक झाली फॅन!
19
३० वर्षांनी केंद्र त्रिकोण राजयोग: ८ राशींना वक्री शनि करेल मालामाल, बक्कळ पैसा; चौपट लाभ!
20
४ लाख कोटी स्वाहा! TATA च्या 'या' शेअरनं गुंतवणूकदारांना दिला मोठा झटका, आणखी खाली जाऊ शकते किंमत?

संपाने ५४ दिवसांचा पगारही बुडाला अन 'कायम'चा आदेशही नाही निघाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 12:29 IST

Yavatmal : राष्ट्रीय आरोग्य अभियानातील सात हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांची कोंडी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आरोग्य सेवेचा डोलारा सांभाळत असलेल्या राष्ट्रीय आरोग्य अभियानातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची राष्ट्रीय आरोग्य अभियानातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना अद्याप कायम सेवा मिळालेली नाही. सेवेत स्थायिक करण्याच्या मागणीसाठी त्यांनी ५४ दिवस संप केला होता, मात्र तरीही शासनाने त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले आहे. संप काळातील पगार बुडाल्याने आर्थिक संकट निर्माण झाले आहे. त्यातच, तुटपुंज्या मानधनावर काम करण्याची वेळ या कर्मचाऱ्यांवर आली आहे.

सन २००५ पासून महाराष्ट्रात राष्ट्रीय आरोग्य अभियान सुरू करण्यात आले. यामध्ये विविध ७१ संवर्गातील कर्मचाऱ्यांची कंत्राटी तत्त्वावर पदभरती करण्यात आली. वैद्यकीय अधिकाऱ्यांसह १२ ते १३ हजार कर्मचारी घेण्यात आले. १० वर्षे व त्यापेक्षा अधिक सेवा झालेल्या या अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करण्याचा शासन निर्णय १४ मार्च २०२४ रोजी घेण्यात आला. यावरून एक वर्षापेक्षा अधिक कालावधी लोटूनही अंमलबजावणी झालेली नाही. दहा वर्षापेक्षा अधिक काळ सेवा झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या सात हजार इतकी आहे. 

चालक, परिचारिकांना केले नियमितराष्ट्रीय आरोग्य अभियानातील ७१ संवर्गापैकी चालक आणि परिचारिका या दोन संवर्गातील कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा नियमित करण्यात आली.शिवाय इतर प्रवर्गातील सेवाज्येष्ठता याद्याही करण्यात आल्या. मात्र, त्यांची सेवा नियमित करण्यात आलेली नाही.

डॉक्टरांच्या तर याद्याही नाहीत

  • राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तर सेवाज्येष्ठता याद्याही तयार करण्यात आलेल्या नाहीत. केवळ दरमहा ४० हजार रुपये मानधनावर त्यांना आरोग्य सेवा द्यावी लागत आहे.
  • इतर कुठलेही लाभ त्यांना दिले जात नाही. सुट्याही केवळ १५ मंजूर होतात. १६ वी सुटी बिनपगारी घ्यावी लागते. नियमित वैद्यकीय अधिकाऱ्यांना जवळपास सव्वा लाख रुपये मानधन मिळत आहे.

कोविड योद्धा म्हणून गौरवराष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी कोविड काळात चांगली सेवा दिली. याबद्दल त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यात आली. कोविड योद्धा म्हणूनही त्यांना गौरविण्यात आले. परंतु त्यांची सेवा नियमित करण्याकडे शासन निर्णय होऊनही दुर्लक्ष केले जात आहे.

२०७ जणांची पदोन्नती थांबलीराष्ट्रीय आरोग्य अभियानातील २०७ नियमित वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदोन्नती मागील तीन वर्षांपासून थांबलेली आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यास सध्या 'गट ब'मध्ये सेवारत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना पदोन्नतीची संधी मिळणार आहे. पदोन्नतीची फाईल पुढे सरकली तरच हे शक्य आहे.

टॅग्स :YavatmalयवतमाळGovernmentसरकार