शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
2
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
3
"गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
4
सावधान! तुमची एक छोटी चूक आणि बँक खाते रिकामे; UPI वापरताना 'हे' ५ डिजिटल नियम पाळणे आता अनिवार्य
5
'बंकरमध्ये लपण्याची वेळ आलेली...', ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानी राष्ट्रपती झरदारींचा मोठा खुलासा
6
Navneet Rana: "अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, हा शरद पवारांचाच प्लॅन!" नवनीत राणा असं का म्हणाल्या?
7
"गिरीजा ओकला पाहून इम्रान हाश्मीही झालेला दंग", प्रसिद्ध निर्मातीने सांगितला 'तो' किस्सा
8
"गौतम अदानी हे माझ्या मोठ्या भावासारखे, ते हक्काने मला रागवतात"; सुप्रिया सुळेंनी व्यक्त केल्या भावना
9
२०२५ची सांगता एकदशीने: २०२६मध्ये किती एकादशी? २ अधिक व्रतांची भर; पाहा, आषाढी-कार्तिकी तिथी
10
नव्या पर्वाला सुरुवात; मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, जागावाटपही ठरले!
11
वृद्धापकाळाची चिंता सोडा! एलआयसीच्या 'या' योजनेत एकदा गुंतवा आणि आयुष्यभर मिळवा पेन्शन
12
Malegaon Municipal Corporation Election : जमलं तर आघाडी; नाहीतर काँग्रेस स्वबळावर; एमआयएमबरोबर फिस्कटले, ९ उमेदवारांची घोषणा
13
अभिमानास्पद! जुन्या कागदांपासून पेन्सिल बनवणारं यंत्र; कोण आहे राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेती?
14
१२२ षटकार, १४८८ धावा... रोहित शर्मा, विराट कोहली नव्हे तर 'या' पठ्ठ्याने गाजवलं २०२५चं वर्ष
15
Aaditya Thackeray : “गेल्यावेळी ६६ नगरसेवक, तरी इनकमिंग का?”; आदित्य ठाकरेंचा भाजपवर जोरदार हल्लाबोल
16
भारतात रॉल्स रॉयसचा 'मेगा प्लॅन'! देशाला तिसरे 'होम मार्केट' बनवण्याची घोषणा; 'या' क्षेत्रात करणार गुंतवणूक
17
“दोन गुजराती गिळायला निघालेत, पण आमच्यापासून मुंबई कोणीही हिसकावू शकत नाही”: उद्धव ठाकरे
18
बँकेची कामे वेळेत उरका! जानेवारीत १६ दिवस 'बँक हॉलिडे'; पाहा सुट्ट्यांचे संपूर्ण कॅलेंडर
19
धक्कादायक! ज्या मंदिरात २२ दिवसांपूर्वी लग्न केलं, तिथेच स्वत:ला संपवलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
20
BJP-RSSवरील दिग्विजय सिंह यांच्या पोस्टने खळबळ, काँग्रेसमध्ये पडले दोन गट; विरोधही-समर्थनही!
Daily Top 2Weekly Top 5

गरिबांनी रचला पाया, तू का अडविला कळस ! प्रधानमंत्री आवास योजनेतील दुसरा हप्ता लटकला

By अविनाश साबापुरे | Updated: April 16, 2024 17:21 IST

जिल्ह्यातील २५ हजार लाभार्थ्यांना प्रतीक्षा.

अविनाश साबापुरे, यवतमाळ : पै-पै गोळा करून दोन घासाची सोय करणाऱ्यांसाठी घर बांधणे म्हणजे महाकठीण काम असते. त्यांच्यासाठी शासनाची घरकुल योजना उपयुक्त ठरते. मात्र योजनेतून मंजुरी मिळविताना व नंतर निधी मिळविताना या गरिबांचा जीव मेटाकुटीला येतो. मोदी आवास योजनेतून पहिला हप्ता मिळवून घराचा पाया बांधणाऱ्या गरिबांना आता दुसरा हप्ता मिळालेला नाही. तो मिळाल्याशिवाय भिंती आणि छत होणे अशक्य झाले आहे.

घरकुलाचा पायवा घेऊन बसलेल्या तब्बल २५ हजार ५५४ लाभार्थ्यांना अद्याप दुसरा हप्ता मिळालेला नाही. निधी येऊनही दुसरा हप्ता का ‘रिलिज’ केला जात नाही, असा प्रश्न लाभार्थी उपस्थित करीत आहेत. मोदी आवास योजनेतून ग्रामीण क्षेत्रात घरकुलासाठी १ लाख २० हजारांची रक्कम लाभार्थ्यांना टप्प्या-टप्प्याने दिली जाते. यात घरकुल मंजूर झाल्यावर पहिला हप्ता १५ हजारांचा मिळतो. पायवा पूर्ण झाल्यावर ४५ हजारांचा दुसरा हप्ता आणि लिंटर लेवलपर्यंत काम झाल्यावर तिसरा ४० हजारांचा हप्ता दिला जातो. संपूर्ण घरकुल पूर्ण झाल्यावर उर्वरित २० हजार रुपये दिले जातात. तर प्रधानमंत्री आवास योजनेत दुसरा हप्ता ७० हजारांचा मिळतो.

दुसऱ्या हप्त्याचे पैसे मिळतील या आशेवर अनेकांनी हातउसने कर्ज घेऊन पायवा बांधून घेतला. परंतु, अद्याप प्रशासनाकडून दुसऱ्या हप्त्याचे पैसे सोडण्यात आलेले नाहीत. त्यामुळे कर्जबाजारी झालेल्या गरीब लाभार्थ्यांना आपल्या घरकुलाचे स्वप्न चक्काचूर होण्यासोबतच कर्ज चुकते करण्याचीही काळजी भेडसावत आहे. ‘ज्ञानदेवे रचियेला पाया, तुका झालासे कळस’ हा अभंग ठाऊक असलेल्या लाभार्थ्यांना आता ‘गरिबांनी रचियेला पाया, तू का अडविला कळस?’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.

दुसऱ्या हप्त्याच्या प्रतीक्षेतील लाभार्थी-

तालुका : मंजूर घरकूल : दुसरा हप्ता नाहीआर्णी : ९६३ : ८४८बाभूळगाव : १७८८ : १५८१दारव्हा : २१८८ : २१७५दिग्रस : ८९६ : ८५४घाटंजी : १९१२ : १३३६कळंब : १४२४ : ११६८केळापूर : १७८७ : १३५२महागाव : ९२० : ८२१मारेगाव : १६७७ : १४३१नेर : १६७१ : १५९०पुसद : १८९१ : १५७५राळेगाव : २६२९ : २१७९उमरखेड : ३४६६ : ३०२४वणी : २७१४ : २५११यवतमाळ : २३०८ : १७२४झरीजामणी : १७६५ : १३८५

प्रशासन काय म्हणते...

याबाबत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या म्हणण्यानुसार, जिल्ह्यात मोदी आवास योजनेत एकंदर २९ हजार ९९९ घरकुलांना मंजुरी देण्यात आलेली आहे. २८ मार्च रोजी निधीचा पहिला हप्ता रिलिज केला गेला. त्यातही नमुना आठ न जोडणारे, चुकीचे बँक खाते देणारे, राष्ट्रीयीकृत बँकेचे खाते न देणारे अशा ३४२३ लाभार्थ्यांचा पहिला हप्ताही सोडण्यात आलेला नाही. तर दुसऱ्या हप्त्याचा निधी पायव्याचे बांधकाम झाल्यावरच रिलिज केला जाणार आहे. ही प्रक्रिया आता सुरू झाली आहे. आतापर्यंत या योजनेतून २४ घरकुलांचेच बांधकाम पूर्ण झाले आहे. तर २९ हजार ९७५ बांधकामे सुरु आहेत.

टॅग्स :YavatmalयवतमाळGovernmentसरकार