शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
4
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
5
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
6
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
7
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
8
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
9
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
10
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
11
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
12
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
13
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
14
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
15
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
16
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
17
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
18
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
19
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
20
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...

गरिबांनी रचला पाया, तू का अडविला कळस ! प्रधानमंत्री आवास योजनेतील दुसरा हप्ता लटकला

By अविनाश साबापुरे | Updated: April 16, 2024 17:21 IST

जिल्ह्यातील २५ हजार लाभार्थ्यांना प्रतीक्षा.

अविनाश साबापुरे, यवतमाळ : पै-पै गोळा करून दोन घासाची सोय करणाऱ्यांसाठी घर बांधणे म्हणजे महाकठीण काम असते. त्यांच्यासाठी शासनाची घरकुल योजना उपयुक्त ठरते. मात्र योजनेतून मंजुरी मिळविताना व नंतर निधी मिळविताना या गरिबांचा जीव मेटाकुटीला येतो. मोदी आवास योजनेतून पहिला हप्ता मिळवून घराचा पाया बांधणाऱ्या गरिबांना आता दुसरा हप्ता मिळालेला नाही. तो मिळाल्याशिवाय भिंती आणि छत होणे अशक्य झाले आहे.

घरकुलाचा पायवा घेऊन बसलेल्या तब्बल २५ हजार ५५४ लाभार्थ्यांना अद्याप दुसरा हप्ता मिळालेला नाही. निधी येऊनही दुसरा हप्ता का ‘रिलिज’ केला जात नाही, असा प्रश्न लाभार्थी उपस्थित करीत आहेत. मोदी आवास योजनेतून ग्रामीण क्षेत्रात घरकुलासाठी १ लाख २० हजारांची रक्कम लाभार्थ्यांना टप्प्या-टप्प्याने दिली जाते. यात घरकुल मंजूर झाल्यावर पहिला हप्ता १५ हजारांचा मिळतो. पायवा पूर्ण झाल्यावर ४५ हजारांचा दुसरा हप्ता आणि लिंटर लेवलपर्यंत काम झाल्यावर तिसरा ४० हजारांचा हप्ता दिला जातो. संपूर्ण घरकुल पूर्ण झाल्यावर उर्वरित २० हजार रुपये दिले जातात. तर प्रधानमंत्री आवास योजनेत दुसरा हप्ता ७० हजारांचा मिळतो.

दुसऱ्या हप्त्याचे पैसे मिळतील या आशेवर अनेकांनी हातउसने कर्ज घेऊन पायवा बांधून घेतला. परंतु, अद्याप प्रशासनाकडून दुसऱ्या हप्त्याचे पैसे सोडण्यात आलेले नाहीत. त्यामुळे कर्जबाजारी झालेल्या गरीब लाभार्थ्यांना आपल्या घरकुलाचे स्वप्न चक्काचूर होण्यासोबतच कर्ज चुकते करण्याचीही काळजी भेडसावत आहे. ‘ज्ञानदेवे रचियेला पाया, तुका झालासे कळस’ हा अभंग ठाऊक असलेल्या लाभार्थ्यांना आता ‘गरिबांनी रचियेला पाया, तू का अडविला कळस?’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.

दुसऱ्या हप्त्याच्या प्रतीक्षेतील लाभार्थी-

तालुका : मंजूर घरकूल : दुसरा हप्ता नाहीआर्णी : ९६३ : ८४८बाभूळगाव : १७८८ : १५८१दारव्हा : २१८८ : २१७५दिग्रस : ८९६ : ८५४घाटंजी : १९१२ : १३३६कळंब : १४२४ : ११६८केळापूर : १७८७ : १३५२महागाव : ९२० : ८२१मारेगाव : १६७७ : १४३१नेर : १६७१ : १५९०पुसद : १८९१ : १५७५राळेगाव : २६२९ : २१७९उमरखेड : ३४६६ : ३०२४वणी : २७१४ : २५११यवतमाळ : २३०८ : १७२४झरीजामणी : १७६५ : १३८५

प्रशासन काय म्हणते...

याबाबत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या म्हणण्यानुसार, जिल्ह्यात मोदी आवास योजनेत एकंदर २९ हजार ९९९ घरकुलांना मंजुरी देण्यात आलेली आहे. २८ मार्च रोजी निधीचा पहिला हप्ता रिलिज केला गेला. त्यातही नमुना आठ न जोडणारे, चुकीचे बँक खाते देणारे, राष्ट्रीयीकृत बँकेचे खाते न देणारे अशा ३४२३ लाभार्थ्यांचा पहिला हप्ताही सोडण्यात आलेला नाही. तर दुसऱ्या हप्त्याचा निधी पायव्याचे बांधकाम झाल्यावरच रिलिज केला जाणार आहे. ही प्रक्रिया आता सुरू झाली आहे. आतापर्यंत या योजनेतून २४ घरकुलांचेच बांधकाम पूर्ण झाले आहे. तर २९ हजार ९७५ बांधकामे सुरु आहेत.

टॅग्स :YavatmalयवतमाळGovernmentसरकार