शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
3
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
4
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
5
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
6
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
7
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
8
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
9
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
10
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
11
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
12
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
13
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
14
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
15
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
16
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
17
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
18
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
19
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
20
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल

गरिबांनी रचला पाया, तू का अडविला कळस ! प्रधानमंत्री आवास योजनेतील दुसरा हप्ता लटकला

By अविनाश साबापुरे | Updated: April 16, 2024 17:21 IST

जिल्ह्यातील २५ हजार लाभार्थ्यांना प्रतीक्षा.

अविनाश साबापुरे, यवतमाळ : पै-पै गोळा करून दोन घासाची सोय करणाऱ्यांसाठी घर बांधणे म्हणजे महाकठीण काम असते. त्यांच्यासाठी शासनाची घरकुल योजना उपयुक्त ठरते. मात्र योजनेतून मंजुरी मिळविताना व नंतर निधी मिळविताना या गरिबांचा जीव मेटाकुटीला येतो. मोदी आवास योजनेतून पहिला हप्ता मिळवून घराचा पाया बांधणाऱ्या गरिबांना आता दुसरा हप्ता मिळालेला नाही. तो मिळाल्याशिवाय भिंती आणि छत होणे अशक्य झाले आहे.

घरकुलाचा पायवा घेऊन बसलेल्या तब्बल २५ हजार ५५४ लाभार्थ्यांना अद्याप दुसरा हप्ता मिळालेला नाही. निधी येऊनही दुसरा हप्ता का ‘रिलिज’ केला जात नाही, असा प्रश्न लाभार्थी उपस्थित करीत आहेत. मोदी आवास योजनेतून ग्रामीण क्षेत्रात घरकुलासाठी १ लाख २० हजारांची रक्कम लाभार्थ्यांना टप्प्या-टप्प्याने दिली जाते. यात घरकुल मंजूर झाल्यावर पहिला हप्ता १५ हजारांचा मिळतो. पायवा पूर्ण झाल्यावर ४५ हजारांचा दुसरा हप्ता आणि लिंटर लेवलपर्यंत काम झाल्यावर तिसरा ४० हजारांचा हप्ता दिला जातो. संपूर्ण घरकुल पूर्ण झाल्यावर उर्वरित २० हजार रुपये दिले जातात. तर प्रधानमंत्री आवास योजनेत दुसरा हप्ता ७० हजारांचा मिळतो.

दुसऱ्या हप्त्याचे पैसे मिळतील या आशेवर अनेकांनी हातउसने कर्ज घेऊन पायवा बांधून घेतला. परंतु, अद्याप प्रशासनाकडून दुसऱ्या हप्त्याचे पैसे सोडण्यात आलेले नाहीत. त्यामुळे कर्जबाजारी झालेल्या गरीब लाभार्थ्यांना आपल्या घरकुलाचे स्वप्न चक्काचूर होण्यासोबतच कर्ज चुकते करण्याचीही काळजी भेडसावत आहे. ‘ज्ञानदेवे रचियेला पाया, तुका झालासे कळस’ हा अभंग ठाऊक असलेल्या लाभार्थ्यांना आता ‘गरिबांनी रचियेला पाया, तू का अडविला कळस?’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.

दुसऱ्या हप्त्याच्या प्रतीक्षेतील लाभार्थी-

तालुका : मंजूर घरकूल : दुसरा हप्ता नाहीआर्णी : ९६३ : ८४८बाभूळगाव : १७८८ : १५८१दारव्हा : २१८८ : २१७५दिग्रस : ८९६ : ८५४घाटंजी : १९१२ : १३३६कळंब : १४२४ : ११६८केळापूर : १७८७ : १३५२महागाव : ९२० : ८२१मारेगाव : १६७७ : १४३१नेर : १६७१ : १५९०पुसद : १८९१ : १५७५राळेगाव : २६२९ : २१७९उमरखेड : ३४६६ : ३०२४वणी : २७१४ : २५११यवतमाळ : २३०८ : १७२४झरीजामणी : १७६५ : १३८५

प्रशासन काय म्हणते...

याबाबत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या म्हणण्यानुसार, जिल्ह्यात मोदी आवास योजनेत एकंदर २९ हजार ९९९ घरकुलांना मंजुरी देण्यात आलेली आहे. २८ मार्च रोजी निधीचा पहिला हप्ता रिलिज केला गेला. त्यातही नमुना आठ न जोडणारे, चुकीचे बँक खाते देणारे, राष्ट्रीयीकृत बँकेचे खाते न देणारे अशा ३४२३ लाभार्थ्यांचा पहिला हप्ताही सोडण्यात आलेला नाही. तर दुसऱ्या हप्त्याचा निधी पायव्याचे बांधकाम झाल्यावरच रिलिज केला जाणार आहे. ही प्रक्रिया आता सुरू झाली आहे. आतापर्यंत या योजनेतून २४ घरकुलांचेच बांधकाम पूर्ण झाले आहे. तर २९ हजार ९७५ बांधकामे सुरु आहेत.

टॅग्स :YavatmalयवतमाळGovernmentसरकार