शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

कोरोनाचा धोका वाढला, जिल्ह्यात आणखी 11 रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2022 05:00 IST

जिल्ह्यातील कोरोना रुग्ण घटल्यानंतर जनजीवन पूर्वपदावर आले आहे. त्यातच शाळा-महाविद्यालये सुरळीत सुरू होत असतानाच पुन्हा कोरोना रुग्ण वाढू लागल्याने चिंता वर्तविली जात आहे. गुरुवारी जिल्ह्यात नऊ कोरोना रुग्ण निष्पन्न झाले होते. शुक्रवारी त्यात आणखी ११ नव्या रुग्णांची भर पडली. शुक्रवारी बाधित निघालेल्या रुग्णांमध्ये यवतमाळ येथील चार रुग्णांसह दारव्हा तालुक्यातील दोन, दिग्रस तालुक्यातील तीन, तर नेर व राळेगाव तालुक्यातील प्रत्येक एका रुग्णाचा समावेश आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मध्यंतरी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला होता. मात्र, मागील काही दिवसांत पुन्हा कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. गुरुवारी जिल्ह्यात नऊ नव्या रुग्णांची नोंद झाल्यानंतर शुक्रवारी त्यात आणखी ११ पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडल्याने जिल्हावासीयांची चिंता वाढत आहे. नागरिकांनी त्रिसूत्री नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. जिल्ह्यातील कोरोना रुग्ण घटल्यानंतर जनजीवन पूर्वपदावर आले आहे. त्यातच शाळा-महाविद्यालये सुरळीत सुरू होत असतानाच पुन्हा कोरोना रुग्ण वाढू लागल्याने चिंता वर्तविली जात आहे. गुरुवारी जिल्ह्यात नऊ कोरोना रुग्ण निष्पन्न झाले होते. शुक्रवारी त्यात आणखी ११ नव्या रुग्णांची भर पडली. शुक्रवारी बाधित निघालेल्या रुग्णांमध्ये यवतमाळ येथील चार रुग्णांसह दारव्हा तालुक्यातील दोन, दिग्रस तालुक्यातील तीन, तर नेर व राळेगाव तालुक्यातील प्रत्येक एका रुग्णाचा समावेश आहे. या ११ रुग्णांमध्ये चार महिला असून सात पुरुषांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता नागरिकांनी कोरोना त्रिसूत्री नियमांचे पालन करण्याची गरज आहे. कोरोनाचा पहिला, दुसरा व तिसरा डोस घेऊन पूर्ण लसीकरण करावे, स्वत:सह कुटुंबीयांना सुरक्षित करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. 

पॉझिटिव्हिटी दर ९ वर - शुक्रवारी नव्या ११ रुग्णांची नोंद झाली. त्यापूर्वी गुरुवारी नऊ बाधित आढळले होते. या नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या २७ एवढी झाली आहे. यातील तीन रुग्ण जिल्ह्याबाहेरील आहेत. दरम्यान जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर ९ इतका झाला असून दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर २.५६ आहे, तर मृत्यू दर २.२८ इतका आहे.

आजवर १८०३ जणांचा मृत्यू- कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही, यासाठी यवतमाळकरांनी विशेष दक्षता घेण्याची गरज निर्माण झाली आहे. आजवर जिल्ह्यात कोरोनामुळे तब्बल १८०३ मृत्यूची नोंद झाली आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत गेल्यानंतर गंभीर रुग्णांचे प्रमाणही वाढते. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही यासाठी सर्वांनाच दक्षता बाळगावी लागणार आहे. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या