शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

कोरोनाचा धोका वाढला, जिल्ह्यात आणखी 11 रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2022 05:00 IST

जिल्ह्यातील कोरोना रुग्ण घटल्यानंतर जनजीवन पूर्वपदावर आले आहे. त्यातच शाळा-महाविद्यालये सुरळीत सुरू होत असतानाच पुन्हा कोरोना रुग्ण वाढू लागल्याने चिंता वर्तविली जात आहे. गुरुवारी जिल्ह्यात नऊ कोरोना रुग्ण निष्पन्न झाले होते. शुक्रवारी त्यात आणखी ११ नव्या रुग्णांची भर पडली. शुक्रवारी बाधित निघालेल्या रुग्णांमध्ये यवतमाळ येथील चार रुग्णांसह दारव्हा तालुक्यातील दोन, दिग्रस तालुक्यातील तीन, तर नेर व राळेगाव तालुक्यातील प्रत्येक एका रुग्णाचा समावेश आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मध्यंतरी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला होता. मात्र, मागील काही दिवसांत पुन्हा कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. गुरुवारी जिल्ह्यात नऊ नव्या रुग्णांची नोंद झाल्यानंतर शुक्रवारी त्यात आणखी ११ पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडल्याने जिल्हावासीयांची चिंता वाढत आहे. नागरिकांनी त्रिसूत्री नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. जिल्ह्यातील कोरोना रुग्ण घटल्यानंतर जनजीवन पूर्वपदावर आले आहे. त्यातच शाळा-महाविद्यालये सुरळीत सुरू होत असतानाच पुन्हा कोरोना रुग्ण वाढू लागल्याने चिंता वर्तविली जात आहे. गुरुवारी जिल्ह्यात नऊ कोरोना रुग्ण निष्पन्न झाले होते. शुक्रवारी त्यात आणखी ११ नव्या रुग्णांची भर पडली. शुक्रवारी बाधित निघालेल्या रुग्णांमध्ये यवतमाळ येथील चार रुग्णांसह दारव्हा तालुक्यातील दोन, दिग्रस तालुक्यातील तीन, तर नेर व राळेगाव तालुक्यातील प्रत्येक एका रुग्णाचा समावेश आहे. या ११ रुग्णांमध्ये चार महिला असून सात पुरुषांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता नागरिकांनी कोरोना त्रिसूत्री नियमांचे पालन करण्याची गरज आहे. कोरोनाचा पहिला, दुसरा व तिसरा डोस घेऊन पूर्ण लसीकरण करावे, स्वत:सह कुटुंबीयांना सुरक्षित करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. 

पॉझिटिव्हिटी दर ९ वर - शुक्रवारी नव्या ११ रुग्णांची नोंद झाली. त्यापूर्वी गुरुवारी नऊ बाधित आढळले होते. या नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या २७ एवढी झाली आहे. यातील तीन रुग्ण जिल्ह्याबाहेरील आहेत. दरम्यान जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर ९ इतका झाला असून दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर २.५६ आहे, तर मृत्यू दर २.२८ इतका आहे.

आजवर १८०३ जणांचा मृत्यू- कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही, यासाठी यवतमाळकरांनी विशेष दक्षता घेण्याची गरज निर्माण झाली आहे. आजवर जिल्ह्यात कोरोनामुळे तब्बल १८०३ मृत्यूची नोंद झाली आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत गेल्यानंतर गंभीर रुग्णांचे प्रमाणही वाढते. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही यासाठी सर्वांनाच दक्षता बाळगावी लागणार आहे. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या