शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

सूर्याचा वाढला ताप... शाळा २० मार्चपासून सकाळ पाळीत!

By अविनाश साबापुरे | Updated: March 19, 2024 20:50 IST

शिक्षणाधिकाऱ्यांचा आदेश : चिमुकल्यांना दिलासा.

यवतमाळ : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठी वाढ नोंदविली जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शाळा बुधवार २० मार्चपासून सकाळ पाळीत भरविल्या जाणार आहेत. यामध्ये प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शाळांचा समावेश आहे.

याबाबत शिक्षणाधिकारी प्रकाश मिश्रा यांनी मंगळवारी सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना आदेश बजावले आहेत. हा आदेश सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना लागू राहणार आहे. बुधवारपासून सकाळी ७ ते दुपारी १२ वाजतापर्यंत शाळा भरविण्याचे आदेश आहेत. या कालावधीत ३० मिनिटांची एक या प्रमाणे एकंदर आठ तासिका घ्याव्या लागणार आहेत. तर उर्वरित एक तासात १० मिनिटांची लघु विश्रांती तसेच ५० मिनिटांची दीर्घ विश्रांती या प्रमाणे नियोजन करण्यात आले आहे. 

मागील आठवड्यापासून जिल्ह्यात तापमानाचा पारा ३१ ते ३५ अंशांपर्यंत गेलेला आहे. सकाळी ११ वाजतापासूनच सूर्य कोपू लागलेला आहे. यामुळे ग्रामीण भागासह शहरातील चिमुकल्यांनाही प्रचंड काहिली सहन करावी लागत आहे. दुपारच्या सत्रात ११ ते ५ वाजतापर्यंत वर्गात बसून राहताना विद्यार्थ्यांच्या शरीराला अक्षरश: घामाच्या धारा लागत असल्याचे शिक्षक सांगत आहेत. हा त्रास लक्षात घेऊन शिक्षण विभागाने प्राथमिक आणि उच्च प्राथमिकच्या शाळा सकाळ पाळीत भरविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे शिक्षणाधिकारी प्रकाश मिश्रा म्हणाले. या निर्णयामुळे जिल्ह्यातील चिमुकल्या विद्यार्थ्यांना काही अंशी दिलासा मिळाला आहे. मात्र दुपारी १२ वाजता शाळेतून घरी जाताना त्यांना उन्हाचा त्रास सहन करावा लागणार आहे. तसेच सकाळ पाळीतील शाळेचा निर्णय मागील आठवड्यातच घ्यायला हवा होता, असेही शिक्षक वर्तृतळातून बोलले जात आहे. 

टॅग्स :Yavatmalयवतमाळ