शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

...तर तीन महिन्यांनी आम्ही पुन्हा येवू; संपकरी कर्मचाऱ्यांचा सरकारला इशारा

By रूपेश उत्तरवार | Updated: March 21, 2023 19:31 IST

समितीकडून समाधानकारक तोडगा न निघाल्यास पुन्हा तीव्र स्वरूपात आंदोलन होईल, असा कर्मचाऱ्यांचा सरकारला दिला आहे. 

यवतमाळ : जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी राज्य कर्मचारी समन्वय समितीच्या नेतृत्वात कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. राज्यस्तरावर हा संप मागे घेतल्याची घोषणा झाली; परंतु ज्या मुद्यासाठी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता, त्याचे ठोस उत्तर मिळाले नसल्याचे सांगत मंगळवारीही येथील आझाद मैदानावर कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. दुपारनंतर मात्र संप मागे घेण्यात आला. तीन महिने सरकारच्या निर्णयाची वाट पाहू, सकारात्मक निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलनासाठी येवू असा इशारा समन्वय समितीचे निमंत्रक डॉ. रवींद्र देशमुख यांनी दिला. त्यानंतर कर्मचारी कामावर परतले. 

जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी कर्मचारी ठाम होते. सात दिवसांपासून सर्व कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले होते. मंगळवारी कर्मचाऱ्यांच्या महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते; परंतु मुंबईमध्ये समन्वय समितीचे विश्वास ताटकर यांनी सोमवारी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर आंदोलन मागे घेण्याची भूमिका जाहीर केली. यामुळे जिल्हास्तरावरील आंदाेलन मंगळवारी परत घेण्यात आले. तत्पूर्वी यवतमाळच्या आझाद मैदानावर कर्मचाऱ्यांची सभा झाली. या सभेमध्ये कर्मचाऱ्यांनी आंदोलन परत घेतल्याबाबत राज्यस्तरावरील पदाधिकाऱ्यांबाबत तीव्र नाराजी व्यक्ती केली.

स्थानिक पातळीवर कुणाला विश्वासात न घेता आंदोलन मागे घेतल्या गेल्याचा आरोप समन्वय समितीचे निमंत्रक डॉ. रवींद्र देशमुख यांनी यावेळी केला. नियुक्त केलेल्या समितीकडून समाधानकारक तोडगा न निघाल्यास पुन्हा तीव्र स्वरूपात आंदोलन होईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. 

गत आठ दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाचे नेतृत्व राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष नंदू बुटे, नदीम पटेल, मधुकर काठोळे, किशोर पाेहणकर, आशिष जयसिंगपुरे, प्रवीण बहादे, संतोष राऊत, अरविंद देशमुख, सतीश काळे, संजय यवतकर, मंगेश वैद्य, पुरुषोत्तम ठोकळ, नीरज डफळे, भुमन्ना बोमकंटीवार, विजय बुटके यांनी केले. आंदोलनात सरकारी, निमसकरी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते.

आंदोलनस्थळी ३०० कर्मचाऱ्यांनी केले रक्तदानजुन्या पेन्शनसाठी कर्मचाऱ्यांनी येथील आझाद मैदानावर आठ दिवस आंदोलन केले. दरम्यान आंदोलनस्थळी समन्वय समितीच्या वतीने रक्तदानाचा उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये ३०० कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले. यामुळे गरजवंत रुग्णांना उपचार करताना मोलाचा आधार लागण्यास मदत होणार आहे.

 

टॅग्स :Yavatmalयवतमाळ