शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

...तर तीन महिन्यांनी आम्ही पुन्हा येवू; संपकरी कर्मचाऱ्यांचा सरकारला इशारा

By रूपेश उत्तरवार | Updated: March 21, 2023 19:31 IST

समितीकडून समाधानकारक तोडगा न निघाल्यास पुन्हा तीव्र स्वरूपात आंदोलन होईल, असा कर्मचाऱ्यांचा सरकारला दिला आहे. 

यवतमाळ : जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी राज्य कर्मचारी समन्वय समितीच्या नेतृत्वात कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. राज्यस्तरावर हा संप मागे घेतल्याची घोषणा झाली; परंतु ज्या मुद्यासाठी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता, त्याचे ठोस उत्तर मिळाले नसल्याचे सांगत मंगळवारीही येथील आझाद मैदानावर कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. दुपारनंतर मात्र संप मागे घेण्यात आला. तीन महिने सरकारच्या निर्णयाची वाट पाहू, सकारात्मक निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलनासाठी येवू असा इशारा समन्वय समितीचे निमंत्रक डॉ. रवींद्र देशमुख यांनी दिला. त्यानंतर कर्मचारी कामावर परतले. 

जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी कर्मचारी ठाम होते. सात दिवसांपासून सर्व कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले होते. मंगळवारी कर्मचाऱ्यांच्या महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते; परंतु मुंबईमध्ये समन्वय समितीचे विश्वास ताटकर यांनी सोमवारी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर आंदोलन मागे घेण्याची भूमिका जाहीर केली. यामुळे जिल्हास्तरावरील आंदाेलन मंगळवारी परत घेण्यात आले. तत्पूर्वी यवतमाळच्या आझाद मैदानावर कर्मचाऱ्यांची सभा झाली. या सभेमध्ये कर्मचाऱ्यांनी आंदोलन परत घेतल्याबाबत राज्यस्तरावरील पदाधिकाऱ्यांबाबत तीव्र नाराजी व्यक्ती केली.

स्थानिक पातळीवर कुणाला विश्वासात न घेता आंदोलन मागे घेतल्या गेल्याचा आरोप समन्वय समितीचे निमंत्रक डॉ. रवींद्र देशमुख यांनी यावेळी केला. नियुक्त केलेल्या समितीकडून समाधानकारक तोडगा न निघाल्यास पुन्हा तीव्र स्वरूपात आंदोलन होईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. 

गत आठ दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाचे नेतृत्व राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष नंदू बुटे, नदीम पटेल, मधुकर काठोळे, किशोर पाेहणकर, आशिष जयसिंगपुरे, प्रवीण बहादे, संतोष राऊत, अरविंद देशमुख, सतीश काळे, संजय यवतकर, मंगेश वैद्य, पुरुषोत्तम ठोकळ, नीरज डफळे, भुमन्ना बोमकंटीवार, विजय बुटके यांनी केले. आंदोलनात सरकारी, निमसकरी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते.

आंदोलनस्थळी ३०० कर्मचाऱ्यांनी केले रक्तदानजुन्या पेन्शनसाठी कर्मचाऱ्यांनी येथील आझाद मैदानावर आठ दिवस आंदोलन केले. दरम्यान आंदोलनस्थळी समन्वय समितीच्या वतीने रक्तदानाचा उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये ३०० कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले. यामुळे गरजवंत रुग्णांना उपचार करताना मोलाचा आधार लागण्यास मदत होणार आहे.

 

टॅग्स :Yavatmalयवतमाळ