शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
3
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
4
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
5
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
6
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
7
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
8
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
9
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
10
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
11
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
12
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
13
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
14
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
15
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
16
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
17
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
18
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
19
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
20
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार

...तर तीन महिन्यांनी आम्ही पुन्हा येवू; संपकरी कर्मचाऱ्यांचा सरकारला इशारा

By रूपेश उत्तरवार | Updated: March 21, 2023 19:31 IST

समितीकडून समाधानकारक तोडगा न निघाल्यास पुन्हा तीव्र स्वरूपात आंदोलन होईल, असा कर्मचाऱ्यांचा सरकारला दिला आहे. 

यवतमाळ : जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी राज्य कर्मचारी समन्वय समितीच्या नेतृत्वात कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. राज्यस्तरावर हा संप मागे घेतल्याची घोषणा झाली; परंतु ज्या मुद्यासाठी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता, त्याचे ठोस उत्तर मिळाले नसल्याचे सांगत मंगळवारीही येथील आझाद मैदानावर कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. दुपारनंतर मात्र संप मागे घेण्यात आला. तीन महिने सरकारच्या निर्णयाची वाट पाहू, सकारात्मक निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलनासाठी येवू असा इशारा समन्वय समितीचे निमंत्रक डॉ. रवींद्र देशमुख यांनी दिला. त्यानंतर कर्मचारी कामावर परतले. 

जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी कर्मचारी ठाम होते. सात दिवसांपासून सर्व कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले होते. मंगळवारी कर्मचाऱ्यांच्या महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते; परंतु मुंबईमध्ये समन्वय समितीचे विश्वास ताटकर यांनी सोमवारी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर आंदोलन मागे घेण्याची भूमिका जाहीर केली. यामुळे जिल्हास्तरावरील आंदाेलन मंगळवारी परत घेण्यात आले. तत्पूर्वी यवतमाळच्या आझाद मैदानावर कर्मचाऱ्यांची सभा झाली. या सभेमध्ये कर्मचाऱ्यांनी आंदोलन परत घेतल्याबाबत राज्यस्तरावरील पदाधिकाऱ्यांबाबत तीव्र नाराजी व्यक्ती केली.

स्थानिक पातळीवर कुणाला विश्वासात न घेता आंदोलन मागे घेतल्या गेल्याचा आरोप समन्वय समितीचे निमंत्रक डॉ. रवींद्र देशमुख यांनी यावेळी केला. नियुक्त केलेल्या समितीकडून समाधानकारक तोडगा न निघाल्यास पुन्हा तीव्र स्वरूपात आंदोलन होईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. 

गत आठ दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाचे नेतृत्व राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष नंदू बुटे, नदीम पटेल, मधुकर काठोळे, किशोर पाेहणकर, आशिष जयसिंगपुरे, प्रवीण बहादे, संतोष राऊत, अरविंद देशमुख, सतीश काळे, संजय यवतकर, मंगेश वैद्य, पुरुषोत्तम ठोकळ, नीरज डफळे, भुमन्ना बोमकंटीवार, विजय बुटके यांनी केले. आंदोलनात सरकारी, निमसकरी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते.

आंदोलनस्थळी ३०० कर्मचाऱ्यांनी केले रक्तदानजुन्या पेन्शनसाठी कर्मचाऱ्यांनी येथील आझाद मैदानावर आठ दिवस आंदोलन केले. दरम्यान आंदोलनस्थळी समन्वय समितीच्या वतीने रक्तदानाचा उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये ३०० कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले. यामुळे गरजवंत रुग्णांना उपचार करताना मोलाचा आधार लागण्यास मदत होणार आहे.

 

टॅग्स :Yavatmalयवतमाळ